सोयाबीन आयातीच्या अफवेमुळे भाव प्रति क्विंटल २००० रुपयांनी घटले, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

नवी दिल्ली : गेल्या एक आठवड्यापासून 15 लाख मेट्रिक टन जीएम सोया आयातीचा मुद्दा तापला आहे. विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील शेतकरी याबद्दल नाराज आहेत, कारण ते सोयाबीनचे सर्वात मोठे उत्पादक आहे. मात्र, सोयाबीन आयातीची अधिसूचना कोणीही दाखवत नाही. सरकारनेही या अफवेवर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. असे असूनही किंमत 2000 रुपये प्रति क्विंटलने कमी झाली आहे. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, जेव्हा शेतकऱ्याचे पीक तयार होते, तेव्हा अशी अफवा का पसरवली जाते, की सरकारच असा निर्णय घेतंय. soybean price fall 2000 per quintal so far after rumours of 15 lakh tonnes Soyabean import


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या एक आठवड्यापासून 15 लाख मेट्रिक टन जीएम सोया आयातीचा मुद्दा तापला आहे. विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील शेतकरी याबद्दल नाराज आहेत, कारण ते सोयाबीनचे सर्वात मोठे उत्पादक आहे. मात्र, सोयाबीन आयातीची अधिसूचना कोणीही दाखवत नाही. सरकारनेही या अफवेवर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. असे असूनही किंमत 2000 रुपये प्रति क्विंटलने कमी झाली आहे. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, जेव्हा शेतकऱ्याचे पीक तयार होते, तेव्हा अशी अफवा का पसरवली जाते, की सरकारच असा निर्णय घेतंय. soybean price fall 2000 per quintal so far after rumours of 15 lakh tonnes Soyabean import

राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाच्या मध्य प्रदेश युनिटचे उपाध्यक्ष राहुल राज म्हणाले की, 2 ऑगस्ट रोजी सोयाबीन 9544 रुपये क्विंटल होते. 10च्या संध्याकाळपर्यंत ते 7618 रुपयांवर आले. तर यावर्षी शेतकऱ्यांनी त्याचे बियाणे पाच हजार ऐवजी 10 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केले होते. महागडे बियाणे, महागडे डिझेल, खते, कीटकनाशके आणि महाग मजूर यांनी काम पूर्ण केले आहे. आता शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू लागला होता, त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला.

पेरणीच्या वेळी सोयाबीनचे बियाणे महाग का?

मध्य प्रदेशात यावर्षी 58 लाख 54 हजार हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. अतिवृष्टी होण्यापूर्वीच अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सप्टेंबरमध्ये पीक तयार होईल. अशा वेळी काही लोक मिळून किंमत कमी करत आहेत. जर सरकारला आयात करायचे असते, तर ते जून-जुलैमध्ये पेरणी होत असताना केले असते. जेणेकरून शेतकऱ्यांना स्वस्त सोयाबीन बियाणे मिळाले असते. सोयाबीन आयात करू नये, असे आवाहन राहुल राज यांनी सरकारला केले आहे.

पोल्ट्री असोसिएशनकडून आयातीची मागणी

काही दिवसांपूर्वी पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने स्वस्त दरात सोयामील आयात करण्याची मागणी सरकारकडे केली होती. सोयामील हे सोयाबीनच्या बियांपासून बनवलेले उत्पादन आहे, जे पोल्ट्री उद्योगात पशुखाद्य म्हणून वापरले जाते. या मागणीनंतरच सोयाबीन आयातीसाठी सट्टा लावला जात आहे.

सरकारने ग्राहक आणि शेतकरी दोघांचे हित पूर्ण केले पाहिजे : ठक्कर

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर सांगतात की, देशात फक्त 1.5 टक्के तेलबियांचे उत्पादन होते. तर त्याचे तेल खाणारे 98.5 टक्के लोक आहेत. हे 1.5 टक्के लोकांच्या हित करायचे की 98.5 टक्के ग्राहकांचे आहे हे सरकारला ठरवावे लागेल. सोयाबीनचा बाजार दर अजूनही एमएसपीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्या हिताचा समतोल राखून निर्णय घ्यावा. पूर्वी सोयाबीन अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून येत होते.

soybean price fall 2000 per quintal so far after rumours of 15 lakh tonnes Soyabean import

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात