वृत्तसंस्था
बंगळुरू: हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रीकांत पुजारी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतरही कर्नाटकात राजकीय गदारोळ सुरूच आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले की, सीएम सिद्धरामय्या हे आयएसआयएसप्रमाणे कर्नाटक सरकार चालवत आहेत. तालिबान जसे अफगाणिस्तानात सरकार चालवते. श्रीकांत पुजारी यांना 31 वर्षे जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला असून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.Siddaramaiah is running government like ISIS, Union Minister Pralhad Joshi targets Karnataka CM
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणतात- श्रीकांत पुजारी यांच्याविरोधात 16 खटले प्रलंबित आहेत. पण, सिद्धरामय्या आता माफी मागणार का? 16 प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगणाऱ्यांवर काय कारवाई करणार? फक्त दुसऱ्या समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही एका समाजाला किती लक्ष्य करणार आहात? ते तुष्टीकरणाचे प्रतीक आहे. सरकार ISIS प्रमाणे चालत आहे. तालिबान जसे अफगाणिस्तानात आपले सरकार चालवत आहे. अशा प्रकारे कर्नाटकात सिद्धरामय्या आपले सरकार चालवत आहेत.
श्रीकांत पुजारी यांना कोर्टातून जामीन मिळाला
हुबळीचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रीकांत पुजारी यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने श्रीकांत पुजारींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 1992च्या हुबळी दंगलीप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी श्रीकांत पुजारी यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष भाजप बुधवारी रस्त्यावर उतरला. श्रीकांत पुजारी यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याला अपरिहार्य परिस्थिती वगळता सर्व सुनावणीच्या तारखांना संबंधित न्यायालयात हजर राहावे लागेल.
न्यायालयाने दिले हे आदेश…
तसेच याचिकाकर्ता फिर्यादीच्या साक्षीदारांना धमकावणार नाही आणि पुराव्याशी छेडछाड करणार नाही, असेही म्हटले आहे. तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होणार नाही, असेही सांगितले. याचिकाकर्ता पूर्वपरवानगीशिवाय संबंधित न्यायालयाचे कार्यक्षेत्र सोडणार नाही. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर कर्नाटकातील हुबळी येथे निदर्शने झाली होती. या हिंसाचारात 50 वर्षीय कारसेवक श्रीकांत पुजारी यांनाही आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणातच पुजारी यांना तब्बल 31 वर्षांनंतर अटक करण्यात आली. या अटकेवर भाजपने तीव्र आक्षेप व्यक्त केला. तसेच त्यांच्यावरील कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App