वृत्तसंस्था
श्रीनगर : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, भारत पाकव्याप्त काश्मीरवरील आपला दावा कधीही सोडणार नाही. संरक्षण मंत्री म्हणाले होते की आम्ही पीओके परत घेण्यास वचनबद्ध आहोत, परंतु त्यांनी असेही सांगितले की या पावलासाठी भारताला बळाचा वापर करावा लागणार नाही. आता नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख नेते फारुख अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केले आहे.
फारुख अब्दुल्ला यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्याने बांगड्या घातल्या नाहीत, हे आपण विसरता कामा नये. यासोबतच अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35(ए) हटवल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
अब्दुल्ला यांचा पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पीओकेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर म्हटले आहे की, संरक्षण मंत्री म्हणत असतील तर पुढे जा. थांबवणारे आम्ही कोण, पण लक्षात ठेवा, त्यांनीही (पाकिस्तान) बांगड्या घातलेल्या नाहीत. त्याच्याकडे अणुबॉम्ब आहेत आणि दुर्दैवाने तो अणुबॉम्ब आमच्यावरच पडेल.
#WATCH | Srinagar, J&K: On Defence Minister Rajnath Singh's statement that 'PoK will be merged with India', JKNC Chief Farooq Abdullah says, "If the defence minister is saying it then go ahead. Who are we to stop. But remember, they (Pakistan) are also not wearing bangles. It has… pic.twitter.com/hYcGnwVxP2 — ANI (@ANI) May 5, 2024
#WATCH | Srinagar, J&K: On Defence Minister Rajnath Singh's statement that 'PoK will be merged with India', JKNC Chief Farooq Abdullah says, "If the defence minister is saying it then go ahead. Who are we to stop. But remember, they (Pakistan) are also not wearing bangles. It has… pic.twitter.com/hYcGnwVxP2
— ANI (@ANI) May 5, 2024
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ही मुख्य समस्या आहे. दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करून प्रश्न सोडवले पाहिजेत.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार?
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत फारुख अब्दुल्ला यांनी भाकीत केले असून अमरनाथ यात्रेनंतर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर होतील, असे सांगितले. एवढेच नाही तर पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत माजी मुख्यमंत्री म्हणाले की, कलम 370 रद्द केल्यानंतरही राज्यात दहशतवाद सुरूच आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील, अशी आशाही भारतीय संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. मात्र, याबाबत त्यांनी कोणतीही निश्चित वेळ दिलेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच AFSPA ची गरज भासणार नाही, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला. राजनाथ सिंह पीओकेबद्दल बोलले होते, त्यामुळे फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला पीओके परत घेण्याचे खुले आव्हान दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App