विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामाजिक आणि राजकीय शास्त्र क्षेत्रात काम करणारे लोकनीती-CSDSचे प्राध्यापक संजय कुमार यांनी महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात एक्स वर केलेली पोस्ट डिलीट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा जागांमधील मतांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली होती. एक्स वर ही पोस्ट डिलीट केल्यानंतर संजय कुमार यांनी माफीही मागितली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या टीमने डेटाचा चुकीचा अर्थ लावला होता. त्यांनी हे ट्विट 17 ऑगस्ट रोजी केले होते. भाजपने संजय कुमार यांच्यावर पोस्ट डिलीट केल्याबद्दल टीका केली आहे आणि म्हटले आहे की ही तीच संस्था आहे ज्यावर राहुल गांधी विश्वास ठेवतात. Lokniti-CSDS
काय म्हणाले संजय कुमार
खरं तर, १७ ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्टमध्ये संजय कुमार यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रातील दोन जागांवर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यांनी लिहिले होते की महाराष्ट्राच्या विधानसभा क्रमांक ५९ रामटेकमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चार लाख ६६ हजार २०३ मतदार होते. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्या दोन लाख ८६ हजार ९३१ राहिली. संजय कुमार यांच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या जागेवर एक लाख ७९ हजार २७२ म्हणजेच ३८.४५ टक्के मते कमी झाली. त्याचप्रमाणे त्यांनी देवळाली विधानसभा जागेचा डेटा दिला. त्यांच्या मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्रमांक १२६ देवळालीमध्ये चार लाख ५६ हजार ७२ मते होती. तर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या दोन लाख ८८ हजार १४१ इतकी कमी झाली. संजय कुमार यांच्या मते, देवळाली जागेवर एक लाख ६७ हजार ९३१ म्हणजेच ३६.८२ टक्के मते कमी झाली.
ट्विटबद्दल माफी मागितली आणि ते डिलीट केले
संजय कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र निवडणुकीवरील त्यांच्या ट्विटबद्दल माफी मागितली आणि ते डिलीट केले. त्यांनी लिहिले की, “महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित ट्विटसाठी मी मनापासून माफी मागतो. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा डेटाची तुलना करताना चूक झाली. आमच्या डेटा टीमने डेटा चुकीचा वाचला. ट्विट काढून टाकण्यात आले आहे. चुकीची माहिती पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.”
ही पाहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना हरणाऱ्या निवडणुकीत केलंय उभा!!
भाजपची संजय कुमार यांच्यावर टीका
भाजपने संजय कुमार यांच्यावर टीका केली आहे. भाजपने ही प्रामाणिक चूक म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर लिहिले की, “माफी मागितली आहे आणि संजय कुमार बाहेर आहेत. योगेंद्र यादव यांच्या या शिष्याने शेवटचे कधी काहीतरी बरोबर केले? महाराष्ट्राबद्दल काँग्रेसच्या खोट्या आरोपाला प्रोत्साहन देण्याच्या उत्सुकतेत, सीएसडीएसने पडताळणीशिवाय डेटा जारी केला. हे विश्लेषण नाहीये – हा उघड पक्षपात आहे. महाराष्ट्रातील मतदारांना खलनायक बनवण्यासाठी राहुल गांधी ज्या संस्थेच्या डेटावर अवलंबून होते त्यांनी आता कबूल केले आहे की त्यांचा डेटा केवळ महाराष्ट्राचाच नाही तर एसआयआरचा देखील चुकीचा होता.
निवडणूक आयोग विरुद्ध विरोधी पक्ष
सीएसडीएसचे संजय कुमार यांची माफी अशा वेळी आली आहे जेव्हा निवडणूक आयोग आणि विरोधी इंडिया अलायन्स पक्ष एकमेकांशी भिडले आहेत. विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत आहेत. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना या आरोपासाठी एका आठवड्यात माफी मागण्यास सांगितले आहे. विरोधी पक्ष निवडणूक आयोगाकडूनच माफी मागण्याची मागणी करत आहेत. वास्तविक, ७ ऑगस्ट रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील बेंगळुरू मध्ये लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी रविवारी बिहारचा दौरा सुरू केला आणि निवडणूक आयोगावर मते चोरण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना टोला
या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकनीती-CSDS या सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. त्यांनी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटा वर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधी यांनी आरोप केले होते. तसेच आमच्या सरकारला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्याच आज लोकनीती-CSDS ने या संदर्भात ट्वीट करून आमचे आकडे चुकीचे होते म्हणत माफी मागितली आहे. तसेच त्यांनी त्यांचे आकडे परत घेतले आहे. आता लोकनीती-CSDS च्या आकडेवारीवर अकांडतांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? हा प्रश्न आहे. मात्र राहुल गांधी यांच्याकडून अशी मला अजिबात अपेक्षा नाही. राहुल गांधी एक प्रकारे ‘सिरियल लायर’ आहेत. ज्या प्रमाणे सिरियल किलर असतात त्याप्रमाणे ते सिरियल लायर आहेत. त्यामुळे ते तेच खोटे रोज बोलतील. तसेच परत-परत तिच खोटी आकडेवारी मांडतील. याविषयी माझ्या मनात शंका नाही. मात्र जनतेसमोर आज सत्य स्पष्ट झाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App