वृत्तसंस्था
मेलबर्न : टी-२० विश्वचषक स्पर्धेत नवा ट्वीस्ट आला आहे. आता स्पर्धेत मोठा उलटफेर झाला असून नेदरलॅंड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आयत्यावेळी अवसानघात हा दक्षिण आफ्रिकेला लागलेला शाप आहे. यामुळे पुन्हा एकदा तो संघ “चोकर” ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले आहे. नेदरलॅंड दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केल्याने ‘ब’ गटातील संपूर्ण समीकरण बदलले आहे. India in the semi-finals of the T-20 World Cup
BCCI चा ऐतिहासिक निर्णय; भारतीय स्त्री – पुरुष क्रिकेटर्सना समान वेतन!!
भारतीय संघ उपांत्य फेरीत
गेल्या अनेक विश्वचषक स्पर्धेत साऊथ आफ्रिका हा बलाढ्य संघ कधी पावसामुळे तर कधी ऐनवेळी खराब प्रदर्शन करून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा आणि ब गटातून पहिला संघ ठरला आहे. गट अ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश झाला आहे.
नेदरलॅंडच्या विजयाने समीकरणे बदलली
नेदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्याने गट ब ची समीकरणे बदलली आहेत. भारताने थेट उपांत्य फेरी गाठली असून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश या दोघांपैकी एक संघ गट ब मधून भारतासमवेत उपांत्य फेरीत पोहोचेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App