विशेष प्रतिनिधी
रांची : झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी पीएमओ, गृह मंत्रालय, ईडी संचालक, झारखंड पोलीस आणि इतरांना टॅग केले आहे.Former CM Babulal Marandi expressed fear that ED people may be attacked in Jharkhand like Bengal
काही दिवसांपूर्वी 5 जानेवारी रोजी हल्ल्याचा सापळा रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या कामासाठी काही सुपारीबाज गुंड ठेवल्याची माहिती मिळाल्याचे मरांडी यांनी सांगितले. ईडीचे कार्यालय असलेल्या विमानतळ परिसरात त्यांना ठेवण्यात आले होते.
मरांडी म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप करण्याचा किंवा रोख रकमेचे आमिष दाखवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच त्यांना धमकावलेही जात आहे.
बंगाल के तर्ज़ पर झारखंड में भी ईडीके लोगों पर भविष्य में हमला करवाने की संभावना से इंकार नहीं किया जा सकता। सूत्रों के मुताबिक़ बीते 5 जनवरी को इस काम के लिये कुछ भाड़े के गुंडों को तैयार कर हवाई अड्डा के पीछे वाले इलाक़े में बुलाकर रखा गया था। सर्वविदित है कि इससे पहले ईडी… — Babulal Marandi (Modi Ka Parivar) (@yourBabulal) January 7, 2024
बंगाल के तर्ज़ पर झारखंड में भी ईडीके लोगों पर भविष्य में हमला करवाने की संभावना से इंकार नहीं किया जा सकता। सूत्रों के मुताबिक़ बीते 5 जनवरी को इस काम के लिये कुछ भाड़े के गुंडों को तैयार कर हवाई अड्डा के पीछे वाले इलाक़े में बुलाकर रखा गया था।
सर्वविदित है कि इससे पहले ईडी…
— Babulal Marandi (Modi Ka Parivar) (@yourBabulal) January 7, 2024
बाबूलाल मरांडी यांनी X वर काय लिहिले?
बाबुलाल मरांडी यांनी X वर लिहिले की, ‘बंगालप्रमाणेच झारखंडमध्ये भविष्यात ईडीच्या लोकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी या कामासाठी काही भाड्याचे गुंड तयार करून विमानतळाच्या मागील भागात ठेवण्यात आले होते. यापूर्वीही ईडीच्या अधिकाऱ्यांना खोट्या खटल्यात अडकवण्याचे, समाजकंटकांकडून धमक्या देण्याचे आणि काही महिलांना वेठीस धरण्याचे षडयंत्र तुरुंगातूनच रचले जात होते, हे सर्वश्रुत आहे, परंतु त्याचा पर्दाफाश झाल्याने तो डाव फसला. होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने अशा कटकारस्थानांवर बारीक नजर ठेवण्याची विनंती केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला झाला होता, जेव्हा हे पथक तपासासाठी राज्यात पोहोचले होते.
छापेमारीच्या वेळी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय तापमान वाढले आहे.
एकीकडे विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही सूचित केले आहे की, ते सर्व घटनात्मक पर्यायांचा विचार करतील आणि या प्रकरणावर योग्य ती कारवाई करतील. भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील घटनेचे वर्णन संघराज्य रचनेवर थेट हल्ला असे केले आहे, तर काँग्रेसने राज्यात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तथापि, सत्ताधारी टीएमसीने हे आरोप फेटाळून लावले आणि केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना भडकावल्याचा आरोप केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App