वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात फास्टॅगला आता बायबाय करण्यात येणार असून जीपीएस ट्रेकिंगद्वारे टोलवसुली केली जाणार आहे. याबाबतच्या देशात चाचण्या सुरू झाल्या असून लाखो वाहनांचा सहभाग घेतला आहे. सुमारे १.३७ लाख वाहनांचा चाचण्यांत सहभाग घेतल्याचे वृत आहे. Bye bye to Fastag now; Toll collection by GPS; Tests begin in the country; Involvement of millions of vehicles
फास्टॅगचा जागी जीपीएस ट्रॅकिंगद्वारे टोलवसुलीची नवी यंत्रणा आणली जाईल, ती काही युरोपीय देशांत यशस्वी झाली आहे. तिला ‘सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम’ म्हणतात. ती लागू केल्यानंतर देशभरातून टोल प्लाझा हटवले जातील. सरकारने २०२० मध्येच दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमध्ये व्यावसायिक ट्रकमध्ये ऑन बोर्ड युनिट व इस्रोच्या नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमच्या मदतीने एक पथदर्शी प्रकल्प सुरू केला होता, तो यशस्वी ठरला आहे.
आता केंद्र सरकारने नवी यंत्रणा लागू करण्यासाठी काही चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यात देशभरातील १.३७ लाख वाहनांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात ३८,६८०, दिल्लीत २९,७०५, उत्तराखंडमध्ये १४,४०१, छत्तीसगडमध्ये १३,५९२, हिमाचल प्रदेशात १०,८२४ आणि गोव्यात ९,११२ वाहनांचा चाचण्यांत समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, मणिपूर, सिक्कीम आणि लडाखमध्ये सध्या प्रत्येकी एका वाहनावर चाचणी सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App