महाविकास आघाडी सरकारचा कारभार शेतकरीविरोधी, राधाकृष्ण विखे- पाटील यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

संगमनेर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार सत्तेत आल्यापासून शेतकरीविरोधी राहिला आहे. अधिवेशनाला सामोरे जाण्याची त्यांची तयारी नाही. सरकार यापासून पळ काढते आहे. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.Radhakrishna Vikhe-Patil’s allegation that the Mahavikas Aghadi government is anti-farmer

कृषीपंपांचा वीजपुरवठा वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात येतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच वीजपुरवठा पूर्ववत करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार विखे पाटील बोलत होते.



विखे म्हणाले, सार्वभौम सभागृहात राज्यातील जनतेच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे, तिथे न्याय मिळाला पाहिजे. मात्र, दोन वर्षे झाली सभागृहच चालविले जात नाही. समाजातील कोणताच घटक या सरकारबद्दल सुखी नाही. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

परंतु सरकारला याचे काहीही घेणे-देणे नाही. सरसकट वीजजोडणी तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सत्तेत आल्यानंतर वीजबिल माफ करू, या दिलेल्या आश्वासनाचे भान सरकारला राहिलेले नाही. सरकार नियमबाह्य कृती करते आहे. दुदैर्वाने राज्यात महावसुली चालू असून महापाप करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे.

Radhakrishna Vikhe-Patil’s allegation that the Mahavikas Aghadi government is anti-farmer

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात