मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम आक्रमक, सोलापुरात ओवैसींची राष्ट्रवादी, शिवसेनेवर सडकून टीका

MIM aggressive for Muslim reservation, Owaisi's serious allegations against Shiv Sena in Solapur

Muslim reservation : महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे मुद्दे प्रलंबित असताना मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही तापू लागला आहे. एआयएमआयएम पक्षाचे असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जाणार आहे. औरंगाबादनंतर ओवैसींनी सोलापुरात मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. MIM aggressive for Muslim reservation, Owaisi’s serious allegations against Shiv Sena in Solapur


वृत्तसंस्था

सोलापूर : महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे मुद्दे प्रलंबित असताना मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही तापू लागला आहे. एआयएमआयएम पक्षाचे असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जाणार आहे. औरंगाबादनंतर ओवैसींनी सोलापुरात मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे.

मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी 11 डिसेंबर रोजी मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी (23 नोव्हेंबर) सोलापूरच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत त्यांनी मुस्लिमांचे मागासलेपण दाखवण्यासाठी काही आकडेवारीही सांगितली. मुस्लिम शैक्षणिकदृष्ट्या किती मागासलेले आहेत हे त्यांनी सांगितले. ठाकरे सरकारला सवाल करत ते म्हणाले, ‘मुस्लिमांनी तुमच्याकडे शिक्षणात आरक्षणाची मागणी केली आहे. आम्हाला आरक्षण का देत नाही? तुमची वाचा का बंद आहे?’

‘आम्हाला भाजपची बी टीम म्हणता, स्वत: शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं’

ओवैसी म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक म्हणायचे एमआयएमला मत देऊ नका. तुम्ही ओवैसींच्या नावावर मतदान कराल, पण त्याचा फायदा शिवसेना आणि भाजपला होईल.” त्याचा परिणामही अनेकांवर झाला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हटले. पण सत्तेत येण्याची वेळ आली तेव्हा हे लोक शिवसेनेसोबत गेले.”

१९९२चा विसर पडला का?

ओवैसी पुढे म्हणाले, ‘शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही. ते भाजपसारखे जातीयवादी आहेत. पवार साहेब सांगा शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का? राहुल गांधी मला सांगा, शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का? 1992 मध्ये काय झाले ते विसरलात का?

‘उद्धव ठाकरे बोलतात, आम्ही बाबरी पाडली, त्यांना लाज वाटली नाही!’

ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत ओवैसी म्हणाले, ‘सभागृहात उभे असताना उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही बाबरी मशीद पाडली. मग धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटली नाही का? त्यांनी शिवसेनेला धर्मनिरपेक्ष ठरवून आमच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला. तिघेही मिळून सरकार चालवत आहेत आणि धर्मनिरपेक्षता वाचवायची आहे असा आव आणत आहेत.

MIM aggressive for Muslim reservation, Owaisi’s serious allegations against Shiv Sena in Solapur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात