ओमिक्राॅन पार्श्वभूमीवर तसेच नाताळ आणि नवीन वर्षाच्या पर्ट्यांमुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली.If the third wave were to come, it would be Omicran ; Health Minister Rajesh Tope’s warning
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात ओमिक्राॅनचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे.ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.
ओमिक्राॅन पार्श्वभूमीवर तसेच नाताळ आणि नवीन वर्षाच्या पर्ट्यांमुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली.तसेच ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.
तिसरी लाट जर येणार असेल तर ती ओमिक्राॅनचीच असेल. असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. पुढे टोपे म्हणले की , आताच जर आपण राज्यात खबरदारी घेतली नाही, तर रुग्णवाढीचा दर आणखी वाढण्याची भीती आहे.दरम्यान, लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App