ठाकरे सरकारविरुध्द व्यापाऱ्यांचा एल्गार, लॉकडाऊन वाढविल्याने संताप


राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचा दावा करतानाच राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. एका बाजुला दुकाने बंद आणि दुसरी ई-कॉमर्स कंपन्यांकडून सर्रास विक्री सुरू आहे. या प्रश्नावर सरकारने तत्काळ तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे. Elgar of traders against Thackeray government, anger over increase in lockdown


प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचा दावा करतानाच राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. एका बाजुला दुकाने बंद आणि दुसरी ई-कॉमर्स कंपन्यांकडून सर्रास विक्री सुरू आहे. या प्रश्नावर सरकारने तत्काळ तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे.

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय दुदैर्वी असल्याचे म्हणत व्यापारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईसारख्या महानगरात रुग्णसंख्या कमी होत असतानाही निबंर्धांमध्ये सवलत देण्याचा विचार करण्यात आला नाही.



असंघटित व्यापाराचा विचार केल्यास ४ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत ७० हजार कोटींचा व्यवसाय बुडणार आहे. सामान्य व्यापाºयांना राज्य सरकारकडून कोणतेच अनुदान, करमाफी अथवा सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे या व्यापाऱ्यांचे जगणे अवघड झाल्याचे शहा यांनी म्हटले आहे

पारंपरिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली असताना, ई – कॉमर्स कंपन्या मात्र सर्रास नियमांचे उल्लंघन करून विक्री करत आहेत. नियम हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. व्यापारी संघटना याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे शहा यांनी सांगितले.

Elgar of traders against Thackeray government, anger over increase in lockdown

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात