वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना ५ सप्टेंबर रविवारपासून करोना चाचणीलाही सामोरे जावे लागणार आहे. दोन लसीचे डोस किंवा ७२ तास आधी कोरोना चाचणी अहवालाची अट सरकारने कायम ठेवली आहे. यापैकी काही नसल्यास एसटी, रेल्वे स्थानकाबाहेर किंवा गावागावांत कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे. Corona Virus Infection Test Is Mandatory For Those Going To Konkan For Ganesh Festival
रेल्वे, एसटी, जलमार्गे येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाकडून काटेकोर लक्ष ठेवले आहे. बस स्थानकातप्रवाशांची माहिती संकलित करून चालक-वाहक तालुक्याच्या एसटी आगारात जमा करतील. ही माहिती तहसील कार्यालयात रोज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. खासगी बसमधून आलेल्या प्रवाशांची माहितीही संकलित केली जाणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा, वाहतूक पोलिस, आमदार यांची बैठक बोलावली आहे. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App