विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देताना विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला झुकते माप का ? दिले जात आहे, असा परखड सवाल माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी ठाकरे- पवार सरकारला केला आहे.Why is Western Maharashtra, Konkan more inclined to compensate farmers than Vidarbha? ; Question from former Agriculture Minister Anil Bonde to governent
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी २६५० कोटी रूपयाच्या मदतीचा जीआर काढला. मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पुरता मर्यादित आहे का आहे का? असा प्रश्न राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी उपस्थित केला.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत,असे असताना विदर्भातील फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने मदतीचे आदेश काढले.मात्र पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांना मदत जाहीर केली नाही, त्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात करायची का ? असा प्रश्न राज्याचे माजी कृषिमंत्री यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App