ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल!

  • उद्या होणार सुनावणी; महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करावा, असे याचिकेत म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात आज आधीच प्रलंबित असलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सरन्यायाधीशांनी नकार दिला आहे. आता उद्या म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी इतर याचिकांसोबत एकत्रित करून त्यावर सुनावणी केली जाईल.Petition filed in Bombay High Court to cancel the ordinance giving reservation to OBCs



महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करावा, असे याचिकेत म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाचे सर्वेक्षण करून तोपर्यंत हे ओबीसी आरक्षण पुढे ढकलण्यात यावे, असेही म्हटले आहे.

23 मार्च 1994 च्या अध्यादेशाविरोधात मराठा समाजाच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. बाळासाहेब सराटे, प्रशांत भोसले आणि शिवाजी कवठेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. सध्या सरन्यायाधीशांनी सुनावणीस नकार दिला आहे, मात्र आता या प्रकरणाची सुनावणी इतर याचिकांसोबत जोडली जाणार आहे.

Petition filed in Bombay High Court to cancel the ordinance giving reservation to OBCs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात