Chief Minister Fadnavis : शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विभागाचा 100 दिवसांचा आराखडा सादर

Chief Minister Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chief Minister Fadnavis  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत बोलताना शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलावीत, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.Chief Minister Fadnavis

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा. शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा, अशा सूचना फडणवीस यांनी दिले आहेत.



पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी. समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापि, कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे आधार लिंक लवकर पूर्ण करावे तसेच शाळांच्या विकासासाठी समग्र शिक्षाच्या निधीचा वापर करावा, अशी सूचना केली. राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा/अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार. राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025-26 पासून लागू करणार. पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास करणार. सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार. शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण करणार, अशा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.

Maharashtra will again come to the forefront in school education; Chief Minister Fadnavis is confident

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात