Maharashtra Lockdown 2021 : देशातील एकूण कोरोना संसर्गापैकी महाराष्ट्रातील आकडेवारी सर्वात जास्त चिंताजनक आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान शासनाने कडक निर्बंधही लादले आहेत. लॉकडाऊनसदृश्य या निर्बंधांमुळे अनेक व्यापारी, हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. मुंबईत चाकरमान्यांचे अन्नदूत असलेल्या डबेवाल्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. एकूण 5 हजार डबेवाल्यांपैकी केवळ 200 ते 250 कार्यरत असून उर्वरित डबेवाल्यांचा रोजगार गेला आहे. Dabbawalas facing tough time due to fresh covid restrictions in maharashtra lockdown 2021
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील एकूण कोरोना संसर्गापैकी महाराष्ट्रातील आकडेवारी सर्वात जास्त चिंताजनक आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान शासनाने कडक निर्बंधही लादले आहेत. लॉकडाऊनसदृश्य या निर्बंधांमुळे अनेक व्यापारी, हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. मुंबईत चाकरमान्यांचे अन्नदूत असलेल्या डबेवाल्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. एकूण 5 हजार डबेवाल्यांपैकी केवळ 200 ते 250 कार्यरत असून उर्वरित डबेवाल्यांचा रोजगार गेला आहे.
कडक संचारबंदीमुळे अनेक खासगी कार्यालये बंद असून काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामुळे याचा थेट परिणाम चाकरमान्यांना डबे पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांवर झाला आहे. डबेच बंद झाल्याने अनेक डबेवाल्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
Mumbai | Dabbawalas facing tough time due to fresh covid restrictions in the state Out of 5,000 dabbawalas, only 400-500 were working. With new lockdown restrictions, only 200-250 are now left. We're again urging the govt for financial help: Vishnu Kaldoke, Mumbai Dabbawala spox pic.twitter.com/izYo2V7C5s — ANI (@ANI) April 15, 2021
Mumbai | Dabbawalas facing tough time due to fresh covid restrictions in the state
Out of 5,000 dabbawalas, only 400-500 were working. With new lockdown restrictions, only 200-250 are now left. We're again urging the govt for financial help: Vishnu Kaldoke, Mumbai Dabbawala spox pic.twitter.com/izYo2V7C5s
— ANI (@ANI) April 15, 2021
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना मुंबई डबावाला असोसिएशनचे प्रवक्ते विष्णू कलडोके म्हणाले, “5000 डबेवाल्यांपैकी फक्त 400-500 कार्यरत होते. नवीन लॉकडाऊनच्या कडक निर्बंधानंतर आता फक्त 200-250 शिल्लक आहेत. आर्थिक मदतीसाठी आम्ही पुन्हा सरकारला विनंती करत आहोत.”
राज्य सरकारने हा मिनी लॉकडाऊन जाहीर करतानाच हातावर पोट असणाऱ्या फेरीवाले, रिक्षावाल्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. परंतु राज्य सरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अनेक तळागाळातील घटकांना कोणतीही आर्थिक मदत मिळणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आता डबेवाल्यांच्या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Dabbawalas facing tough time due to fresh covid restrictions in maharashtra lockdown 2021
महत्त्वाच्याा बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App