विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं पण उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब आहे. त्यांची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. Criticism of Chandrashekhar Bawankule on uddhav thackeray
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही वचननामा जाहीह करण्यात आला. भाजप, शिंदे गटावर टीका करतानाचा उद्धव ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांच्या याच जाहीरनाम्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे.
अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब… — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 7, 2024
अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला.
अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 7, 2024
काय म्हणाले बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे ट्विटमध्ये म्हणाले की, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App