वृत्तसंस्था
धरणगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी पती-पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा, ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० घडली. दरम्यान, या पुरातून महिला बचावली आहे. पतीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. A bullock cart along with the Farmer couple is swept away in flood
धरणगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. भागवत भिका पाटील (५५) आणि त्यांची पत्नी मालूबाई पाटील (५०) हे बैलगाडीने शेतातून घराकडे परतत होते. बैलगाडी खैऱ्या नाल्यातून जात असतानाच पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यातच बैलगाडीसह पती-पत्नी वाहून गेले.
मालूबाई हिने एका झाडाला पकडून ठेवल्याने ती बचावली. पोलिस पाटील गुलाब सोनवणे व ग्रामस्थांनी पाणी पातळी खाली गेल्यावर जवळपास दोन किमी अंतरापर्यंत पाहणी केली; पण भागवत हे कुठेही आढळून आले नाहीत. नाल्यापासून काही अंतरावर दोन्ही बैल मृतावस्थेत तर बाजूला गाडीही पडलेली आढळून आली.
अंगावर वीज पडून महिला ठार
जामनेर येथे अंगावर वीज पडून जिजाबाई एकनाथ पाटील (५०, रा. हिंगणे पिंप्री, ता. जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला.जिजाबाई ह्या शेतातून घरी परतत असताना ही घटना घडली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App