मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
विशेष प्रतिनिधी
Mumbai मुंबईतील चेंबूर परिसरात पहाटेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. घरातील विद्युत वायरिंगमुळे आग झपाट्याने पसरली, त्यामुळे घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. ज्या घराला आग लागली त्या घराच्या खाली एक दुकान आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.Mumbai
या घटनेत कुटुंबातील सात जण आगीत जळून भस्मसात झाले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आगीमुळे घरातील सर्व सामान जळून खाक झाले. मुंबईतील शिवडी परिसरात शनिवारी रात्री उशीरा आगीची दुसरी घटना घडली. भारत औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीला आग लागल्याने येथे खळबळ उडाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
मुंबईतील चेंबूर येथील एका दुमजली इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीत तळमजल्यावर दुकान होते, तर वरच्या मजल्यावर कुटुंब राहत होते. अग्निशमन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना पहाटे 5.20 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात आग लागली आणि वरच्या मजल्यावर पसरली, असे त्यांनी सांगितले. वरच्या मजल्यावर झोपलेले कुटुंब आगीत जळून खाक झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App