वृत्तसंस्था
मुंबई : दोन वर्षांच्या खंडानंतर दहीहंडी उत्सव होत असल्याने मुंबई महानगर क्षेत्र परिसरात शुक्रवारी (१९ ऑगस्ट) ‘ढाक्कुमाकू’च्या तालावर हंडीचा काला गोविंदापेक्षा राजकारण्यांनीच लुटला. आगामी पालिका निवडणुका तसेच राज्यातील सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा राजकीय दहीहंडीला मोठे उधाण आले होते. मात्र, कोरोनामुळे गोविंदा पथकांची संख्या घटली असून ‘ईडी’ कारवाईच्या धास्तीने गोविंदाच्या बक्षिसांचा आकडाही निम्म्यावर आल्याचे दिसून आले. दरम्यान, राष्ट्रवादीने यंदा दहीहंडीतून काढता पाय घेतला असून त्यांना ईडीची भीती असल्याचे बोलले जात आहे. मुंबई भाजपतर्फे पहिल्यांदाच 370 ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन झाले. त्याबरोबरच सेनेच्या बंडखोर गटाच्या दहीहंड्या मोठ्या संख्येने होत्या.153 Govinda injured in Dahi Handi festival in Mumbai; Many are still hospitalized
मुंबईत जन्माष्टमीनिमित्त पारंपारिक दहीहंडीच्या उत्सवात दीडशेहून अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दहीहंडी उत्सवातील खेळात सहभागी होणाऱ्या लोकांना गोविंदा म्हणतात.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) माहिती दिली आहे की दहीहंडी उत्सवात 153 गोविंदा जखमी झाले आहेत, त्यापैकी 23 अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि 130 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोविंदांच्या दुखापतींची माहिती देताना बीएमसीने असेही म्हटले आहे की या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App