२०२६ – २७ मध्ये होणारा नाशिक आणि त्रंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासकीय स्तरावरून होणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने विविध उपक्रम सुरू करायचे ठरविले असून सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरण पूरक आणि हरित व्हावा यासाठी सेवा समितीने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील वाद खूप वाढला आहे. मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात एकवटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी मुंबई काँग्रेसने एक समिती स्थापन केली. मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या समितीत स्थान मिळाले नाही, त्यामुळे पक्षाचे काही वरिष्ठ नेते संतप्त झाले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततेत आंदोलन होणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली.
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय महायुतीसरकारने रद्द केले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार देखील उपस्थित होते. आता यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया देणे सुरू केले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली, असे म्हटले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
हिंदी भाषा वाद हा सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा मुद्दा बनली आहे. विशेषतः विरोधी पक्ष सतत मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याबद्दल बोलत आहेत, तर सरकारवर मुलांवर हिंदी लादल्याचा आरोप करत ते त्यावर बहिष्कार घालत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, युगेंद्र आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का प्रभू यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुती सरकारमधील मंत्रीच हिंदी सक्तीच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. मनसेच्या एका बॅनरची चर्चा सुरू असून यामध्ये भाजपाचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो वापरण्यात आला आहे.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलो नसलो, तरी मी जनतेला सोन्याचे दिवस दाखविले आहे. शिवसेना हा मालक-नोकरांचा पक्ष नाही, तर सच्चा शिवसैनिकांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्ता आहे. हा पक्ष तुमचा आहे, इथे काही कुणी मालक नाही. राजा का बेटा राजा नहीं बनेगा असे श्रीकांत शिंदेही म्हणाले होते.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शनिवारी सांगितले की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडला आहे, तर राज ठाकरे स्वतःला कट्टर हिंदूत्ववादी म्हणतात. त्यामुळे विचारसरणीच्या संघर्षामुळे दोन्ही नेत्यांना एकत्र येणे कठीण आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या एका कुटुंबाने तब्बल 150 कोटींची जमीन भेट म्हणून दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणी परभणीच्या एका वकिलाने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे व त्यांचे आमदार सुपुत्र विलास भुमरे हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चा देखील काढणार आहेत. या मुद्द्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. मराठी अन्याय होता कामा नये ही आमची भावना आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अशातच आता हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करा आणि हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत.
खेलो इंडिया युवा स्पर्धा पाठोपाठ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतही सर्वसाधारण विजेतेपदकाचा करंडक महाराष्ट्राने पटकविला आहे. विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून कशा भाजायच्या राजकीय पोळ्या??, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था झाली आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे नामानिराळे; भाजपने स्वतःहून सत्तेच्या वळचणीला घेतलेले अजितदादा देखील फडणवीस सरकार विरुद्ध फिरले, पण narrative setting मध्ये भाजपचे नेते नेहमीप्रमाणे उणे पडले.
राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील याची पाठराखण केली होती. मात्र, आता हिंदी सक्ती नसताना ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक हिंदी भाषेवरून राजकारण केले जात आहे, अशी टीका सामंत यांनी केली आहे.
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना अखेर उपरती झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या टीकात्मक भाषणानंतर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सार्वजनिक समज दिल्यानंतर लोणीकर यांनी स्पष्ट केलं की, “माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांविरोधात बोलणार नाही.”
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यातील सुरू असलेल्या भाषा वादावरून महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने उद्धव आणि राज ठाकरे यांच्या दबावाखाली येऊ नये.
तारीख बदलून मोर्चा हा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??, असा सवाल राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेतून समोर आलाय. राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधातला आवाज बुलंद केल्यानंतर तो विषय महाराष्ट्रात ऐरणीवर आला.
शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये. यात राजकारण आणाल तर याद राखा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले.
माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!! हे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीने सिद्ध केले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांना वयावरुन हिणवत निकालात काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तावरे हे एकटे निवडून आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App