केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भाजपने आज दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या राजकीय मुहूर्तावर तगड्या जबाबदाऱ्या सोपविल्या.
बिहार निवडणुकीपूर्वी, काँग्रेस पक्षाने बुधवारी पाटणा येथे “अति पिछडा न्याय संकल्प योजना” सुरू केली. राहुल गांधी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी आणि प्रमुख डावे नेते उपस्थित होते.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आल्याची घोषणा जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव युसूफ कटारिया आहे. २६ वर्षीय हा तरुण कुलगामचा रहिवासी आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी एलॉन मस्क यांच्या कंपनी एक्सने केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना म्हणाले की, सोशल मीडिया कंटेंटचे नियमन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषतः महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी केली. हा आरोपी शिक्षक असून काही दिवसांपूर्वीच दहशतवायांच्या संपर्कात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव युसूफ कटारिया आहे. २६ वर्षीय हा तरुण कुलगामचा रहिवासी आहे.
लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी बुधवारी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली. विद्यार्थ्यांची पोलिस आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली, यात चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले. तरुणान मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकयांनी केले आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारत “कोल्ड स्टार्ट” नावाचा एक मोठा लष्करी सराव करणार आहे. या सरावात ड्रोन आणि काउंटर-ड्रोन सिस्टीमची चाचणी घेतली जाईल. या सरावात आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद आणि कुठे सुधारणा आवश्यक आहेत याचे मूल्यांकन केले जाईल.
माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा पुतळा बसवण्याची परवानगी मागणारी याचिका घेऊन राज्याकडे आलेल्या तामिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फटकारले. या याचिकेत राजकारण्यांचे गौरव करण्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर का करावा, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले की, मानहानीला गुन्हेगारीमुक्त करण्याची वेळ आली आहे. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर २०१६ मध्ये जेएनयूच्या माजी प्राध्यापक अमिता सिंग यांनी एका माध्यम संस्थेविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर रोजी म्हटले की, काही उच्च न्यायालयांचे न्यायाधीश त्यांचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडत नाहीत आणि अशा न्यायाधीशांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले पाहिजे.
याला म्हणतात, अनुभवी काँग्रेसी झटका; योगींना मोदींचे वारस ठरवून मल्लिकार्जुन खर्गेंनी दिला शेजारी बसलेल्याला राजकीय फटका!!, असे म्हणायची वेळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्यामुळे आली.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) मुंबई पोलिसांना अभिनेता रणबीर कपूर आणि आर्यन खान यांच्या “द बॅडीज ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजच्या निर्मात्यांवर आणि नेटफ्लिक्सवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, कारण हा शो इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ चे उल्लंघन करतो असा आरोप केला आहे.
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी आसाराम बापूची पूजा आणि आरती करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गुजरात राज्यातील सुरतमधील एका सरकारी रुग्णालयातील आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात जणू काही शांततेचा मसीहा अवतरला; पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूग गिळून गप्प बसला!!, असाच भास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे झाला.
अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागेवर मशीद बांधण्याची योजना नाकारण्यात आली आहे. राम मंदिरापासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या सोहावल तहसीलमधील धनीपूर गावात ही मशीद प्रस्तावित आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवण्यात आपली भूमिका असल्याचे सांगत स्वतःला “शांतिदूत” म्हणत शांततेचे नोबेल पारितोषिक आपल्याला मिळायला हवे होते असेही ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली “शांततेची कड”; पण केली भारत चीन आणि सगळ्या युरोप वर आगपाखड!!, असला प्रकारात संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत घडला.
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सैनिकांनी दोन केंद्रीय समिती नक्षलवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी ४० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. सैनिकांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त केली. ही चकमक अबुझमदच्या जंगलात घडली.
अहमदाबाद विमान अपघातात वैमानिकाच्या चुकीबद्दलच्या चर्चांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी “खेदजनक ” म्हटले. केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडून उत्तरे मागितली.
पंतप्रधान मोदी सोमवारी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या दौऱ्यावर आहेत. ते प्रथम इटानगरला पोहोचले, जिथे त्यांनी ५,१०० कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली. ते म्हणाले, “काँग्रेसने अरुणाचल प्रदेशकडे दुर्लक्ष केले. आपला संपूर्ण ईशान्येकडील भाग वगळण्यात आला. जेव्हा मला सेवा करण्याची संधी देण्यात आली तेव्हा मी देशाला काँग्रेसच्या विचारसरणीपासून मुक्त केले. या राज्यात आमची प्रेरणा मतांची संख्या आणि जागांची संख्या नाही तर राष्ट्र प्रथमची भावना आहे.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले की, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) कोणत्याही लढाई किंवा हल्ल्याशिवाय आपोआप भारतात परत येईल. ते म्हणाले की, पीओकेचे लोक स्वतः स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि एक दिवस ते म्हणतील, “मीही भारत आहे.”
फ्रान्स, मोनाको, माल्टा, लक्झेंबर्ग आणि बेल्जियम यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांच्या बैठकीत सोमवारी रात्री उशिरा ही अधिकृत घोषणा करण्यात आली.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून आपल्या पक्षश्रेष्ठींना आपल्याला रिकामे न ठेवता काहीतरी काम अर्थात जबाबदारी देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या जाहीर विनंतीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या विनंतीवर विचार केला जाईल असे सूतोवाच केल्याने
नक्षलवादी केंद्रीय समिती आणि दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीने शांतता चर्चेची शक्यता नाकारली आहे. सोमवारी जारी केलेल्या संयुक्त प्रेस नोटमध्ये, दोन्ही संघटनांनी स्पष्ट केले की, ते शस्त्रे सोडणार नाहीत आणि शांतता चर्चेत सहभागी होणार नाहीत.
बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात तिने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App