CJP चे आंदोलन ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मोदी सरकार पुढे मांडल्या तीन मागण्या; वाचा, त्या कोणत्या??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन काँग्रेसच्या ताब्यात घेतल्यानंतर आज काँग्रेसचे मुख्यालय इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार पुढे तीन मागण्या मांडल्या. Rahul Gandhi

राहुल गांधी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत.

१. पहिली आणि पूर्णपणे रास्त मागणी म्हणजे, शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरलेले आणि भ्रष्ट म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवावे. ही १००% रास्त मागणी आहे. यात काहीही चुकीचे नाही. ही व्यवस्था चालवण्यास आपण असमर्थ आहोत, हे त्यांनी भारत आणि जगाला दाखवून दिले. त्यांच्या कारकिर्दीत एकापाठोपाठ एक परीक्षांचे पेपर फुटले.

२. दुसरी मागणी अशी आहे की, ज्यांनी आमच्या विद्यार्थ्यांवर हात उचलला – मग ते आदेश देणारे असोत किंवा प्रत्यक्ष कृती करणारे – त्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदार धरले पाहिजे.

३. तिसरी गोष्ट म्हणजे, जी व्यक्ती ही संपूर्ण व्यवस्था चालवत आहे आणि जी या सर्वांसाठी अंतिमरीत्या जबाबदार आहे, त्या व्यक्तीने जे काही घडले त्याबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. धर्मेंद्र प्रधान यांनी अक्षरशः भारताची सर्वात मोठी संपत्ती नष्ट केली आहे. आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. म्हणूनच आम्ही या मागण्यांचे पूर्ण समर्थन करतो आणि रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

राहुल गांधी म्हणाले, “शिक्षण घेऊन, डॉक्टर किंवा वकील बनून किंवा एखादे कौशल्य आत्मसात करूनही, अचानक तुम्हाला असे सांगितले जाते की तुमच्यासाठी जी दारे उघडी असायला हवी होती — म्हणजेच देश आणि सरकारकडून तुम्हाला मिळायला हवा असलेला रोजगार किंवा उपजीविकेचे साधन, ती दारेच बंद आहेत. उत्पादन क्षेत्र (मॅन्युफॅक्चरिंग) बंद झाले आहे; आजूबाजूला पाहिले तर सर्वत्र केवळ चिनी उत्पादनेच दिसतात. उद्योजकताही बंद झाली आहे; बँकांकडून मिळणारा पैसा कोणाला मिळतो ते पाहा — केवळ दोन-तीन मोठ्या कंपन्यांनाच बँकांचा सर्व पैसा मिळतो. त्यामुळे उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला ते शक्य होत नाही. कॉर्पोरेट नोकऱ्या आणि आयटी (IT) क्षेत्रातील रोजगार एआय (AI) मुळे नष्ट होत आहेत. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण केले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे केवळ ‘सरकारी नोकरी’ हाच एक पर्याय उरतो. तुम्ही त्यांना एक दार देता, बाकी सर्व दारे बंद करता, आणि मग ती सरकारी नोकरीची प्रक्रियाही अशा प्रकारे हाताळता की ती अत्यंत खर्चिक बनते. आणि तरीही, त्यांनी रस्त्यावर उतरू नये अशी तुमची अपेक्षा असते? तुम्ही कोणत्या जगात वावरत आहात??

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहोत. काल माझ्या तोंडातून रक्त येत होते. पेपरफुटी विद्यार्थ्यांची चर्चा या मुद्द्यांमध्ये जितेंद्र सिंह यांना काहीही महत्त्व नाही. ते काहीही बोलू शकतात, पण या चर्चेत त्यांचा काहीही संबंध नाही किंवा ते महत्त्वाचे नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. पहिली मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडावे. दुसरी मागणी म्हणजे ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तिसरी मागणी म्हणजे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे… जितेंद्र सिंह यांना जी काही कल्पना (फँटसी) रंगवायची असेल, ती ते रंगवू शकतात. मला त्याबद्दल काहीही वाटत नाही किंवा त्याची पर्वा नाही.”

राहुल गांधी पुढे म्हणाले, “सरकार माझ्याशी कशा प्रकारे वागले गेले, हा माझ्यासाठी गौण मुद्दा आहे. मला त्याची पर्वा नाही. सरकार माझ्याशी यापेक्षा पाचपट वाईट वागले तरी मला काही फरक पडत नाही. विद्यार्थ्यांवर काय ओढवले आहे, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि या मुलांवर जी वेळ आली आहे आणि त्यांना जी किंमत मोजावी लागली आहे, या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे माझ्याबाबत तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. पाचदा करा, दहादा करा; मला काही फरक पडत नाही. उलट, मला ते आवडते कारण त्यातून मी शिकतो. सरकारच्या आरोपांची सुद्धा मला पर्वा नाही. सरकारच्या आरोपांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.”

 

Rahul Gandhi says, “They (students) have some demands

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात