अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच भागांत हाहाकार उडाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर गंभीर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर अत्यंत गंभीर आहे. यासंबंधी योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. सरकार या प्रकरणी कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ते म्हणालेत.
मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप 2025 मधील पिकांच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मुंबईतील डेटा सेंटरचे (ऑनलाईन) भूमिपूजन झाले. या माध्यमातून कंपनीने राज्यातील पहिल्या टप्प्यातील $8.4 बिलियनच्या गुंतवणुकीचा शुभारंभ केला. ही गुंतवणूक, राज्यात कार्यरत असलेल्या $3.7 बिलियनच्या डेटा सेंटर्स व्यतिरिक्त केली जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी पुणे : Wet Drought : यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणारा ठरला आहे. महाराष्ट्रात यंदा पावसाने थैमान घातले आहे. सरासरीपेक्षा जास्त […]
विशेष प्रतिनिधी नंदुरबार : Aamshya Padavi : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण ते म्हाडातून विकास प्रकल्पांना मान्यता, असे विविध निर्णय मंत्रिमंडळाने घेतले. […]
महाराष्ट्रात आतापर्यंत 975.5 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा सरासरीच्या 102 % अधिक पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील.
महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना अतिवृष्टी मध्ये प्रचंड नुकसान झाले परंतु शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत देण्यात येईल, अशी खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सक्षमीकरणाबाबत सादरीकरण बैठक पार पडली.
राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. या संकटाच्या काळात राज्य शासन आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, येत्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. परंतु, जयंत पाटील यांनी यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की जयंत पाटील गप्प बसले असतील पण मी गप्प बसणार नाही, असा इशारा पडळकर यांना दिला आहे.
भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या संबोधनावरून राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, बन यांनी राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अलीकडील अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समिती (MPC) सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची अपेक्षा आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आणि मराठा आरक्षणाची प्रक्रिया गतिमान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी होणार होती, परंतु तांत्रिक कारणांमुळे न्यायालयाने या याचिका ऐकण्यास नकार दिला.
विशेष प्रतिनिधी जालना : Manoj Jarange : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रायगड येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएच्या ‘मेट्रो मार्ग-4 व 4 अ, टप्पा-1, गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी पार पडली, यावेळी त्यांनी चाचणीचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते.
विशेष प्रतिनिधी सांगली : Nilesh Lanka : सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आयोजित केलेल्या ‘संस्कृती रक्षण मोर्चा’ सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर […]
नाव महाराष्ट्राच्या संस्कृती रक्षणाचे; मोर्चा मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि त्यात काँग्रेसचे नेते सामील!! हा राजकीय प्रकार आज सांगलीत घडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात आली, असा दावा करून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीत काढलेल्या मोर्चात मोठे शक्ती प्रदर्शन करून घेतले. या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह जयंत पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी खासदार विशाल पाटील सुद्धा सामील झाले होते. त्यामुळे या मोर्चाची चर्चा महाराष्ट्रभर रंगली.
विशेष प्रतिनिधी सांगली : Jitendra Awhad : त्यांच्यावर झालेल्या खालच्या पातळीच्या टीकेनंतरही जयंत पाटील शांत राहिले, परंतु मी तसे करणार नाही, असा इशारा आमदार जितेंद्र […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: Sada Saravankar : अमित ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवून मनसेला शिंगावर घेणारे सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांचे पाय धरून नमस्कार […]
संतोष देशमुख आणि वाल्मीक कराड प्रकरणाच्या फटक्यामुळे मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे “रिकाम्या” झालेल्या धनंजय मुंडे यांनी आज काम मागितले. छगन भुजबळांनी त्यांना लगेच कामाला लावले. असे आज रायगड मध्ये घडले.
युती दोन ठाकरे बंधूंची; पण माध्यमांमध्ये लढाई रंगली जागावाटपाच्या फॉर्मुल्याची!!, असे आज घटस्थापनेच्या म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडले. दोन ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या अनेक भेटीगाठी घेतल्या
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या संघर्षावर महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. आरक्षणावरील संघर्ष हा नैसर्गिक आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार टीका करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर आज जालन्यात काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आंदोलकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून भिवंडीतून तीन तरुणांना अटक केली आहे. या तरुणांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, त्यांनी सुमारे 3 लाख रुपये जमा करून पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App