गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. एक एप्रिलपासून घरगुती, औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेचे दर ७ ते १० टक्क्यांनी कमी होणार आहेत. वीज नियामक आयोगाने याबाबतचे निर्देश दिले आहेत. महावितरणचा दरवाढीचा प्रस्ताव आयोगाने फेटाळला आहे. त्यामुळे एका घराचे लाइट बिल सरासरी १०० ते १५० रुपयांनी कमी होऊ शकते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक पार पडली.
महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा पक्ष या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देईन.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी काल राजधानी नवी दिल्लीत पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक झाली.
गुढीपाडवा उद्यापासून चैत्री नवरात्र सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरचे शोरमा नॉनव्हेज स्टॉल बंद करा असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एल्गार पुकारलाय.
मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी कॉमेडियन कुणाल कामरा यांस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदामुळे कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सौगात ए मोदी या उपक्रमावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपकडूनही उद्धव ठाकरेंना जोरदार पलटवार केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता भाजप आमदार चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीतातून टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेसेनेत अजूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिवसैनिकांनी कुणालच्या मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या काळ्यास्कॉर्पिओत एकूण १९ पुरावे सीआयडीलाआढळले आहेत. कारचा फॉरेन्सिकतपासणी अहवाल आला असून डाव्यादरवाजाच्या काचेवरील दोन ठसे आरोपीसुधीर सांगळेचे असल्याचे समोर आलेअाहे. या गुन्ह्यातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि सुदर्शन घुले या तिघांनी पुण्याच्या मॅजिस्ट्रेटसमोर कबुली जबाबदिला होता. त्यांच्या कबुलीजबाबाची प्रत आरोपीच्या वकिलांना दिली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे गप्प बसले. त्यांच्या शिवसेनेची सगळी बाजू विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांभाळली.
दिशा सालियान हिचे आई-वडील यांनी काल पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या खूनामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याची तक्रार दिली आहे, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत संविधानातील चर्चेत सहभागी होऊन आपले मत मांडले. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे समाजात मोठे परिवर्तन झाल्याचे स्पष्ट केले. संविधानाला धोका नाहीये. धोका झाला होता, तो आता संपलेला आहे. पुढील निवडणुकांसाठी नवीन काही तरी मुद्दा काढा, नवीन नरेटीव्ह तयार करा, दुसऱ्या गोष्टींवर आपली ऊर्जा खर्च करावी,
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘मिस्टर बिन’ म्हणून केला. ‘मिस्टर बिन’नी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती, पण आम्ही ती सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावरून विरोधकांवर टीकेची झोडही उठवली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. दोन्ही सभागृहांत सध्या संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. या अधिवेशनात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा घेण्यात आली. आता विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार 30 जून 2025 रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘गारगाई धरण प्रकल्प’ यासंदर्भात आढावा बैठक आणि मौजे भांडूप, मुंबई येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, राज्यातील नागरिकांना किमान 5 किमीच्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत.
धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांचा “शाब्दिक खेळ” देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला आणीबाणीतला “गेम”!! आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधींचा आणीबाणीतला गेम उलगडून सांगितला. विधानसभेत संविधान गौरव या विषयावरच्या विशेष चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी संविधानाच्या विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख केलाच, पण त्याचबरोबर आज आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने बोंबा मारणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.
“लाल संविधानी” कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विडंबनातून टार्गेट केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्याच्याविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेल्यानंतर दोन्ही काका – पुतणे कधीतरी एक होतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विविध डिजिटल पोर्टल्सचे उदघाटन केले. महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MBOCW)च्या सेस पोर्टलचे तसेच कामगार विभागाच्या बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टीम (BMMS) आणि बॉयलर परीक्षांसाठी डिजिलॉकर सुविधेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसतानाही भास्कर जाधवांची विरोधी पक्षनेते पदासाठी घायकुती; तरी सरकारने त्यांच्या इच्छेवर फेरले पाणी!!, असे चित्र आज विधानसभेत दिसले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App