आपला महाराष्ट्र

Maharashtra

महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी संघासह सगळीकडून मदतीचा ओघ; मुख्यमंत्री निधीलाही भरघोस मदत

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदतकार्य सुरू केले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना फूड पॅकेट्स व किराणा सामान किट वितरित केले. जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली तसेच खर्डा इथे सुद्धा मदत कार्य आणि धान्यवाटप करण्यात आले.

कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार, अन्यथा निवडणूकच होऊ देणार नाही; NCP नेत्याची दमबाजी!!

NCP म्हणजे दमबाजी – दमदाटी हे समीकरणच जणू बनले की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र सोडून वेगळेच ते समीकरण उदयाला आलेले दिसले.

change in the cabinet

change in the cabinet : राज्यात मंत्रिमंडळात बदल होणार? काही मंत्र्यांना नारळ मिळणार? चर्चांना उधाण

विशेष प्रतिनिधी पुणे : change in the cabinet : सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल यांच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, […]

Maharashtra

Maharashtra : राज्यातील सहा माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण; 62 लाख रुपयांचे होते इनाम

राज्यातील सहा जहाल माओवाद्यांनी 24 सप्टेंबरला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्यावर तब्बल 62 लाख रुपयांचा इनाम होता. यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील दोघे विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएस असून या सर्वांना आता शासनाकडूनच 52 लाख रुपये देण्यात येणार आहे. यावेळी रश्मी शुकला यांच्या हस्ते या माओवाद्यांच्या हाती संविधान सोपवण्यात आले.

Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीसांनी काढली राहुल गांधींच्या Gen Z दाव्यातली हवा; भारतीय युवकांवर व्यक्त केला विश्वास!!

लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नेपाळ मधल्या Gen Z चे अचानक कौतुक वाटायला लागले. भारतात तशीच “क्रांती” घडवावीशी वाटली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या दाव्यातील हवा काढून टाकली.

Devendra Fadnavis,

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- उद्या निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज, ठाकरे बंधू, आरक्षणाचा तिढा, निवडणुकांवरही भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, यावर चर्चांना उधाण आले असताना फडणवीस यांनी यावर भाष्य करताच चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. माझ्यावर पक्ष फोडल्याचे आरोप केले जातात. पण जर कोणी म्हटले की, मी ठाकरे बंधूंना एकत्र केले, तर त्याचे श्रेय घेण्यास मला आनंदच वाटेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.

Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरसह धाराशिव व लातूरच्या दौऱ्यावर होते. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

Maharashtra

Maharashtra : राज्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ; फडणवीस सरकारकडून मदत जाहीर

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा देखील पुराच्या विळख्यात अडकला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच शेतांमध्ये पुराचे पाणी गेल्याने पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशात आता सरकारने पुढाकार घेतला असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ देण्यात येत आहे.

CM Fadnavis

CM Fadnavis : अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पंचनाम्यासाठी ड्रोन व मोबाईल फोटोंना मान्यता

महाराष्ट्रात गत काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ आजपासून अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीसाठी राज्याच्या राजधानीबाहेर पडले आहे.

Manoj Jarange

Manoj Jarange : अतिवृष्टीच्या संकटातही मनोज जरांगे यांचे राजकारण, महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा

अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ पाहणी दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राजकारण सुरू केले आहे. सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

Jarange Patil

Jarange Patil : शेतकऱ्यांना 100% नुकसानभरपाई द्या; अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचा इशारा

महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!

महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!, असं म्हणायची वेळ सध्याच्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीमुळे आली.

निकष आणि नियमांचा अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत; शेतीच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांची घोषणा

मदतीचे निकष आणि नियम यांचा कुठलाही अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत देऊ, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून मदतीची घोषणा केली

ZP- Panchayat Samiti election

झेडपी- पंचायत समिती निवडणुकीचे बिगूल, मतदार यादी कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्री संजय शिरसाट आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आज संपूर्ण राज्याचा दौरा करत असून

Sharad Pawar

Sharad Pawar : पीक नाही तर जमिनीचेही नुकसान भरून काढा] शरद पवारांचे राज्य सरकारला आवाहन

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, अशी त्यांची आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.

BJP Workers

BJP Workers : मोदींचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवून केला सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याने डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भररस्त्यात साडी नेसवून सत्कार केला. यापुढे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची बदनामी केल्यास अशीच परिस्थिती होईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde : राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर गंभीर; एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच भागांत हाहाकार उडाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर गंभीर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर अत्यंत गंभीर आहे. यासंबंधी योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. सरकार या प्रकरणी कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ते म्हणालेत.

Maharashtra

Maharashtra : पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत मंजूर; राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा

मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप 2025 मधील पिकांच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे.

Devedra Fadanvis

ॲमेझॉनच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डिजिटल क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मुंबईतील डेटा सेंटरचे (ऑनलाईन) भूमिपूजन झाले. या माध्यमातून कंपनीने राज्यातील पहिल्या टप्प्यातील $8.4 बिलियनच्या गुंतवणुकीचा शुभारंभ केला. ही गुंतवणूक, राज्यात कार्यरत असलेल्या $3.7 बिलियनच्या डेटा सेंटर्स व्यतिरिक्त केली जाणार आहे.

Wet Drought

Wet Drought : ओला दुष्काळ म्हणजे काय ? आणि तो जाहीर झाल्यास काय होतं ?

विशेष प्रतिनिधी   पुणे : Wet Drought : यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणारा ठरला आहे. महाराष्ट्रात यंदा पावसाने थैमान घातले आहे. सरासरीपेक्षा जास्त […]

Aamshya Padavi

Aamshya Padavi : आरक्षणातील घुसखोरी रोखण्यासाठी ‘उलगुलान’ मोर्चा

विशेष प्रतिनिधी   नंदुरबार : Aamshya Padavi : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. […]

Fadnavis

Fadnavis : फडणवीस सरकारचे निर्णय, शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण ते म्हाडातून सामूहिक पुनर्विकास प्रकल्पांना मान्यता

विशेष प्रतिनिधी मुंबई : Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण ते म्हाडातून विकास प्रकल्पांना मान्यता, असे विविध निर्णय मंत्रिमंडळाने घेतले. […]

31 लाख 64 हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आधीच जीआर, 1829 हजार कोटी पोचलेत, मदतीचा ओघ सुरूच ठेवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द

महाराष्ट्रात आतापर्यंत 975.5 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा सरासरीच्या 102 % अधिक पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील.

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच थेट मदत!!

महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना अतिवृष्टी मध्ये प्रचंड नुकसान झाले परंतु शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत देण्यात येईल, अशी खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली‌

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात