विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
राज्य निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा तो कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचे आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट टाळली. तसेच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर झालेल्या छापेमारीवरही भाष्य केले.
अमेरिकेत सध्या गाजत असलेल्या ‘एपस्टाईन फाईल्स’ची माहिती बाहेर आल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. या राजकीय उलथापालथीत कदाचित येत्या महिनाभरात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झालेला पाहायला मिळेल,” असे सूचक आणि खळबळजनक विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आणि सोशल मीडियावरील एका ट्विटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी कराड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांतच चढाओढ दिसून आली. प्रचारसभांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या आणि टीकाटिप्पणी करण्याची स्पर्धा सुरू असताना मतदारांना प्रलोभने देणारी महायुतीतील बड्या नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासह एकूण २० जणांच्या भाषणांची निवडणूक आयोगाकडून तपासणी होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरू असताना मध्येच मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या बाता सुरू झाल्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या धीरगंभीर नेत्याने ही पुडी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत सोडली. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या Epistine files चा हवाला देऊन डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्याचे पडसाद भारतातून उमटून मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असा बादरायणी संबंध जोडला.
राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ताबडतोब निवडणूक आयोगाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रातल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत महायुतीतले सगळे घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांनी विरोधात उभे राहिले
एकीकडे महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकींची रणधुमाळी उडाली असताना दुसरीकडे मुंबईत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा हाय प्रोफाईल विवाह सोहळा निवडक आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने वेगवेगळी कायदेशीर कारणे देऊन महाराष्ट्रातल्या 22 नगराध्यक्षांच्या हाय प्रोफाईल निवडणुका अचानक पुढे ढकलल्या.
विरोधक आता केवळ माझे राजकारणच नाही, तर मलाच संपवण्याच्या मागे लागले आहेत. मी काम करण्याच्या लायकच राहिलो नाही, तर तुमचे काम कोण करणार? अशा कठीण प्रसंगी तुम्ही माझी साथ देणार की हात सोडणार?” असा थेट सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीकरांना अत्यंत भावनिक साद घातली आहे. परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरकतनगर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची चांगलीच फजिती झाली. भर सभेत भाषण करताना खडसे यांची जीभ घसरली आणि त्यांनी उपस्थितांना चक्क “भाजपला मतदान करा,” असे आवाहन केले. खडसेंच्या या विधानामुळे व्यासपीठावर आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. नंतर कार्यकर्त्यांनी आठवण करून देताच खडसेंनी सारवासारव करत “तुतारीलाच मतदान करा,” अशी दुरुस्ती केली. मात्र, तोपर्यंत हे वक्तव्य राजकीय चर्चेचा विषय बनले होते.
“भाजपचे आयुष्य केवळ दुसऱ्यांची घरे फोडण्यात चालले आहे. विधानसभेला माझ्या घरातील माणूस फोडला, आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्याही घरात फूट पाडली. भाजप हा आता पूर्णपणे ‘बाटलेला’ पक्ष झाला असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सिन्नरमधील प्रचार सभेत कोकाटे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रंग चांगलाच चढलेला असताना, महायुतीतीलच मित्र पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी केलेल्या विधानानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीत आरपीआयला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागते, अशी खंत व्यक्त केली.
माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत,” या विधानावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सारवासारव केली आहे. “ते विधान मी ओघात बोललो होतो. तिजोरी माझ्या किंवा कुणाच्या बापाची नाही, ती जनतेची आहे. तसेच माझ्यापेक्षा जास्त अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच आहेत,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
महाराष्ट्रातील नगरपंचायती, नगरपालिकांची निवडणूक शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी “सोडून” दिली.
आंतरिकजिव्हाळा आणि निखळ प्रेमाच्या बळावर भय्याजी काणे यांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत शिक्षणाचे रोपटे ईशान्य भारतात लावले. विरोधकांना न जुमानता, गरीब, स्थानिकांना कुठलीही लालूच न दाखवता आत्मीतयतेने आपलेसे करून घेतले.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला होता. सांगली जिल्ह्यात काही प्रमाणात काँग्रेसची ताकद होती. पण नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातून फारसा प्रतिसादच मिळाला नाही. पवारांनी सुद्धा या निवडणुकीतला रस काढून घेतला त्यामुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात एक मोठी पॉलिटिकल स्पेस निर्माण झाली त्या पॉलिटिकल स्पेस मध्ये बाकी कुठल्याही पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जास्त शिरकाव केल्याचे चित्र समोर आले.
राज्यातल्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असताना पुणे जिल्ह्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नांगी टाकली. एकेकाळी फक्त पवार आणि पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार असून सुद्धा स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने आत्मविश्वास गमावला. म्हणूनच दोन-तीन ठिकाणचा अपवाद वगळता पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊ शकली नाही.
भाजपाच्या एका नेत्याच्या पत्नी आणि मुलीबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्ट पसरवल्याच्या आरोपाखाली मुंबई सायबर पोलिसांनी किरण सीताराम जाधव याला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीला फोर्ट कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती वकील अजय दुबे यांनी दिली
आम्ही सरसकट झाडे तोडत नाही, तर एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणार आहोत. त्यामुळे या विषयाचा उगीच राईचा पर्वत करू नका,” असे आवाहन राज्याचे मंत्री आणि कुंभमेळा कामांचे प्रभारी गिरीश महाजन यांनी केले आहे.
भांडणात पडणे हा भारताचा स्वभाव नाही, देशाच्या परंपरेने नेहमीच बंधुत्व आणि सामूहिक सलोख्यावर भर दिला आहे. भारताची राष्ट्रवादाची संकल्पना पाश्चात्त्य व्याख्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आमचा कोणाशीही वाद नाही. आम्ही भांडणांपासून दूर राहतो. जगाचे इतर भाग संघर्षाने भरलेल्या परिस्थितीत निर्माण झाले आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
‘राष्ट्रप्रथम’ नाही तर ‘भ्रष्टप्रथम’ आणि ‘मुस्लिम खतम’ हेच भाजपचे नवे स्लोगन आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार उत्तम जानकर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तब्बल 300 कोटी रुपये पाठवले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये वाटपासाठी आले असून, भाजप हा सध्याचा सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे,”
नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोनला काही किंमत नसते. जे काही आहे ते सर्व देवाभाऊच आहे. सगळ्या बहिणींचाही भाऊ आणि इतरांचाही भाऊ, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाला पुन्हा डिवचले आहे.
राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान 2 डिसेंबरला होईल. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचे भाकीत अनेकांनी वर्तविले. दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असे वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका अशा टप्प्याच्या वळणावर आल्या आहेत, की जिथून 2 डिसेंबर या तारखे नंतर राज्यात “राजकीय भूकंप” होण्याचे पतंग उडू लागले आहेत. ज्या “पवार बुद्धीच्या” माध्यमांना महाराष्ट्रातले फडणवीस सरकार अमान्य आहे, त्यांनीच या पतंगांना मोठी हवा देऊन ते उंच उंच हवेत उडवले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App