पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रस्तावित जागेत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, चौंडी (अहिल्यानगर) येथील जतन आणि संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महा-चतुर AI चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले.
आम आदमी पक्ष (AAP) सोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिला व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा म्हणाले की, AAP मध्ये विषारी कामाचे वातावरण (टॉक्सिक वर्क एन्व्हायर्नमेंट) निर्माण झाले होते. काम करण्यापासून आणि बोलण्यापासून रोखले जात होते. हा पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या लोकांच्या हातात अडकून राहिला आहे. हे लोक वैयक्तिक फायद्यासाठी काम करतात.
नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आपला निकाल राखून ठेवला असून, तो 2 मे रोजी दिला जाईल असे म्हटले आहे. ज्या 8 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यांपैकी निदा खान एक आहे.
नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे. यावर आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणालेत. सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.
नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली, त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून ती तिच्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.
नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून मी तुझ्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडत आहे. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत ममता बॅनर्जींनी अक्षरशः एकाकी प्रचार केला.
नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे ही धोक्याची घंटा असून, हे असेच चालत राहिले तर भविष्यात शिवरायांच्या इतिहासावर पडदा पाडण्याचा प्रयत्न होईल,” अशी भीती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सरकार आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक होणार असून, यातून तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा चमत्कार असल्याचे सांगत राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केले पाहिजे,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल आणि यावर कोणालाही शंका नसावी. ते म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा लोक अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्मितीबद्दल संशयात होते. ते याला अशक्य मानत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख ‘भोंदू’ असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवराय थकले व राजपाट समर्थांकडे दिला हे भोंदू बागेश्वर यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. ते पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नये. त्यांच्यावर राज्यात बंदी घातली पाहिजे, असे ते आपला संतप्त सूर आळवत म्हणालेत.
नागपूरमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. या कथनामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची पुडी एका सोशल मीडिया अकाउंटने सोडली. पण त्यामधून संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी झाली??, […]
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता तीन पातळ्यांवर विभागण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्ष अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही नवी रचना लागू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संपात मराठी रिक्षा चालकांची अडवणूक करणाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंची औलाद मारण्याची भाषा बोलते. अमित ठाकरे हवालदार झालेत? की आरटीओचे शिपाई? त्यांना कुणालाही मारहाण करण्याचा बॅच मिळालाय का? असे ते म्हणालेत.
राज्यात सध्या हवामानाने दोन टोकांचे रूप धारण केले आहे. एका बाजूला प्रखर उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाने धोकादायक पातळी गाठली असून अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.
३६ वी ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६’ चा उद्घाटन सोहळा आज मुंबईतील कालिना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस दलाचे मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसलेला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या ताज्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर भोसलेवर याआधीच करमाळा आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय बारामती आणि दौंड पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीचे गुन्हे नोंदवण्यात आले असून, आजच्या कारवाईमुळे त्याच्यावरील गुन्ह्यांची मालिका अधिक गडद झाली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App