महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने ५१ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडत देशाच्या ७.४ टक्क्यांच्या तुलनेत ७.९ टक्के विकासदराची विक्रमी झेप घेतली. ५१ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणारे महाराष्ट्र देशातील नंबर १ राज्य ठरले आहे. कारण उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था २९.७८, प. बंगाल २८.८४, कर्नाटक २८.८४ तर तामिळनाडूची ३१.१९ लाख कोटी रुपयांची आहे. गुरुवारी सादर झालेल्या २०२५-२६ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकडा समोर आला.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहासमोर ठेवला. याचसोबत महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी विधेयकाला देखील मंजूरी देण्यात आली आहे.
आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देऊन एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर पाऊल उचलले असून, भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, हा राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळच्या उमेदवारी अर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता आपला अर्ज दाखल केला आहे.
ज्या दिवशी म्हणजेच 5 मार्च 2026 रोजी पवार कुटुंबातल्या दोघांना बिनविरोध राज्यसभेत पाठविले, त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने धर्मांतर विरोधी – लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. याच फडणवीस सरकारमध्ये बाहेरून पवार कुटुंबात आलेल्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असे काही नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असे वाटत असते.
राज्यात पुन्हा एकदा ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. यात भौगोलिक माहिती प्रणालीची मदत घेत शिवरस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक दिला जाणार आहेच, पण त्याच सोबत आता या रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना घोषणा केली आहे. या रस्त्यांवरून भविष्यात वाद उद्भवू नये यासाठी डिजिटल रेकॉर्डही तयार करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातील बीजांडांची बेकायदेशीररीत्या काढणी व विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या गंभीर प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. आमदार चित्रा वाघ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांच्या शोषणाचा हा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत, या रॅकेटमधील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Deputy CM Eknath Shinde facilitated the safe return of 164 Maharashtrians, including 84 students from Pune, who were stranded in the UAE due to the Iran-Israel war. Crediting PM Modi and Amit Shah for their leadership, Shinde coordinated two special flights from Fujairah to Mumbai to rescue citizens from Dubai and surrounding areas.
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी हो – नाही, नाही – हो, असे करत अखेरीस शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत सामील होऊ शकतात. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये संजय झा आणि विजय चौधरी उपस्थित होते. पक्षाचे वरिष्ठ नेते यांना वाटते की, नितीश यांनी दिल्लीला जाऊ नये.
राज्यसभेसाठी भाजपने आज उमेदवार यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे.
केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार संवेदनशील आहे. अतिशय विपरित परिस्थितीचा सामना करत लोकांना मायदेशी आणले जात आहे. महाराष्ट्रातील लोकांनाही परत आणले जात आहे. याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांना दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार, तरीही राष्ट्रवादी अस्वस्थ आणि बेजार!!, हीच राजकीय वस्तुस्थिती आज महाराष्ट्रासमोर आहे. कारण पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार असले तरी त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादीची खरी राजकीय सूत्रे आज कुठल्याच पवारांच्या हातात खऱ्या अर्थाने उरलेली नाही त्या सूत्रांमध्ये एक तर भाजपने आणि दुसरा त्यांच्याच राष्ट्रवादीतल्या भाजपला अनुकूल असलेल्या नेत्यांनी पक्का शिरकाव केलाय.
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही अधिकृत घोषणा केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सोशल मीडियाद्वारे महाविकास आघाडीच्या एकजुटीचा पुनरुच्चार करत या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार उद्या स्वतः अर्ज भरण्यासाठी विधानमंडळात जाण्याची शक्यता कमी असून, निवडणूक अधिकारी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता, आता पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता त्यांच्या शोधमोहिमेतील यशावरून मोजली जाणार आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याच्या कामगिरीवरच आता पोलिस ठाण्यांचे ‘नामांकन’ ठरवण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
राज्यात 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ झाल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समाेर आली आहे. या प्रकरणाचा तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ताटकाळत ठेवत काँग्रेस आणि शिवसेना यांनी अखेरच्या दिवशी त्यांना महाविकास आघाडीची राज्यसभा उमेदवार द्यायचे मान्य केले. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या, तेव्हा कुठे काँग्रेस हायकमांडने आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच्या उमेदवारीला मान्यता दिल्याची बातमी आली.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान दिसले असते, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाद्वारे एकप्रकारे त्यांनी या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विहिरीने करण्याची चर्चा थांबविण्याचा जयंत पाटलांनी लॉलीपॉप दिला आणि त्यातून शरद पवारांच्या उमेदवारीतला अडथळा दूर करायचा “डाव” खेळला, हीच राजाकीय वस्तुस्थिती आज राज्यसभा निवडणुकीचे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी म्हणजेच 4 मार्च 2026 रोजी समोर आली.
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. 2026 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लढतीकडे मोठ्या चाचणीच्या रूपात पाहिले जात आहे. अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेण्याची तयारी केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मनसेने स्वीकृत नगरसेवकपदाबाबत अपेक्षा व्यक्त केली होती; मात्र ती पूर्ण न झाल्यानेच हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचा गट भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागल्या दारी??, असा सवाल ऐन मोक्याच्या क्षणी समोर आलाय.
राज्यसभेच्या जागेसाठी आज मविआतील 3 पक्षांची बैठक होणार आहे. ती माहिती आम्ही दिल्लीला पाठवू. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मविआचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल. अद्याप कोणतेही नाव अंतिम झालेले नाही, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे तर आम्हाला राज्यसभा आणि उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची जागा घ्यावी, असा आमचा आग्रह होता, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
भाजपने महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांना पुन्हा एकदा चकवा दिला राज्यसभेसाठी दोन सरप्राईज नावे आणून भाजपच्या श्रेष्ठींनी मराठी माध्यमवीरांना पुन्हा एकदा तोंडावर पाडले.
इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी विविध यंत्रणांच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी आपल्या पातळीवर विशेष प्रयत्न सुरू केलेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App