राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले- आक्रमणही त्यामुळेच होत आहेत कारण आपण झोपलो आहोत आणि विभागलेलो आहोत. आपण खरंच एकच आहोत, पंथ-संप्रदायापेक्षा वेगळे आहोत. संस्कृती, देश, समाजाच्या नात्याने आपण एक आहोत. ज्ञान नसेल तर तो भेद मानतो.
अमेरिका, इजराइल विरुद्ध इराण संघर्षामुळे जागतिक बाजारावर मोठा परिणाम झालाय. या परिस्थितीचा फटका भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावरही जाणवत आहे.वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा!!, हाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा असल्याची राजकीय वस्तुस्थिती आता समोर आलीय.
मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पुराव्याशिवाय केवळ व्हॉट्सॲप चॅटच्या आधारावर घटस्फोटाचा आदेश दिला जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने महिलेच्या कौटुंबिक न्यायालयातील अपीलावर सुनावणी करताना हे सांगितले.
सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचू शकले!!, अशी राजकीय वस्तुस्थिती काल समोर आली. किंबहुना ते राजकीय रहस्य काल उलगडले. राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी inside story म्हणून या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांची निवडणूक बिनविरोध झाली असली, तरी महाविकास आघाडीतील (मविआ) अंतर्गत धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. “मविआमध्ये सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष असूनही आम्हाला डावलून तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला संधी मिळाली,” अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. या निर्णयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आता २०२९ पर्यंत पुन्हा संधी मिळणे कठीण असल्याचे सांगत त्यांनी आपली सल व्यक्त केली.
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे.
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली. फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एकूण चार स्तंभांवर आधारित आहे. त्यात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासनावर भर दिला आहे. या प्रत्येक स्तंभात 4 उपक्षेत्र असून, अशा 16 उपक्षेत्रांवर आधारित हा अर्थसंकल्प वाचा आहे तसा…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा 2026 – 27 चा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र शासन संपूर्ण देशातच काय, पण जगातही Infra Man म्हणून ओळख आहे
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आज मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्राचा 2026 – 2027 सालचा अर्थसंकल्प सादर करावा लागला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा 2026 – 27 चा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र शासन संपूर्ण देशातच काय पण जगातही Infra Man म्हणून ओळख आहे.
मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ नमाज पठणाची परवानगी देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि कोणत्याही ठिकाणी नमाज पठण करणे हा धार्मिक अधिकार मानला जाऊ शकत नाही.
इराण विरोधात अमेरिका आणि इजरायलने सुरू केलेल्या आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचे वाटप थांबवण्यात आले आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालक आणि वाहकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना, उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवले आहे. ज्योदी वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज संध्याकाळी साडेसहा वाजता ‘मातोश्री’वर जाणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेसने पाठिंबा दिला. विशेष म्हणजे तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांनी आपल्या घरूनच अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक अधिकारी पवारांच्या निवासस्थानी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने ५१ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडत देशाच्या ७.४ टक्क्यांच्या तुलनेत ७.९ टक्के विकासदराची विक्रमी झेप घेतली. ५१ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणारे महाराष्ट्र देशातील नंबर १ राज्य ठरले आहे. कारण उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था २९.७८, प. बंगाल २८.८४, कर्नाटक २८.८४ तर तामिळनाडूची ३१.१९ लाख कोटी रुपयांची आहे. गुरुवारी सादर झालेल्या २०२५-२६ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकडा समोर आला.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहासमोर ठेवला. याचसोबत महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी विधेयकाला देखील मंजूरी देण्यात आली आहे.
आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देऊन एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर पाऊल उचलले असून, भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, हा राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळच्या उमेदवारी अर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता आपला अर्ज दाखल केला आहे.
ज्या दिवशी म्हणजेच 5 मार्च 2026 रोजी पवार कुटुंबातल्या दोघांना बिनविरोध राज्यसभेत पाठविले, त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने धर्मांतर विरोधी – लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. याच फडणवीस सरकारमध्ये बाहेरून पवार कुटुंबात आलेल्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असे काही नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असे वाटत असते.
राज्यात पुन्हा एकदा ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. यात भौगोलिक माहिती प्रणालीची मदत घेत शिवरस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक दिला जाणार आहेच, पण त्याच सोबत आता या रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना घोषणा केली आहे. या रस्त्यांवरून भविष्यात वाद उद्भवू नये यासाठी डिजिटल रेकॉर्डही तयार करण्यात येणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App