त्याग, पराक्रम आणि सेवा समाजघडणीसाठी आवश्यक आहे. महिलांमध्ये ऋजुता असते.त्यामुळे सेवेची प्रेरणा मुळातच त्यांच्या अंगी असते.
राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त असलेली ५०१२ सहायक प्राध्यापकांची आणि विद्यापीठांमधील ६०० अशा एकूण ५६१२ पदांची भरती प्रक्रिया येत्या जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (२१ फेब्रुवारी) येथे दिली.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेत जावे, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र त्याच वेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे,
मालेगाव येथील न्यायालयात शनिवारी घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः उपस्थित राहिले. मात्र यावेळी वातावरण आधीपेक्षा वेगळे होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली.
देशातील ३७ आणि महाराष्ट्रातील ७ राज्यसभेच्या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उमेदवारीवरून मोठे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक खुलासा केला. “अजितदादांना शरद पवारांनीच राज्यसभेवर जावे अशी इच्छा होती,” असे म्हणत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेला छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा खोडून काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेदेपाचे व्हीएसआर विमान कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप करत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. त्यामुळे पीडित देशमुख कुटुंबीयांनी त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “अजित सृष्टी” उभारण्याचा प्रस्ताव मान्य झाला.
आजोबांचा नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला!!, हेच राजकीय चित्र आज दिल्लीतून समोर आले. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारी विषयी गेले
एक 4 वर्षीय चिमुरडा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे रात्रभर वर्गखोलीतच कुलुपबंद अवस्थेत अडकल्याची भयंकर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्याचा कसून शोध घेण्यात आला. अखेर पोलिसांच्या सूचनेनुसार, शाळेचे कुलूप उघडण्यात आल्यानंतर हा मुलगा अंगणवाडीतच भीतीने थरथरत बसल्याचे दिसून आले. या घटनेमुळे पालकवर्गात एकच खळबळ माजली आहे.
मोदी – शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा आणि विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!, असलाच प्रकार रोहित पवारांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून समोर आला.
राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर नाड्या काँग्रेस हायकमांडच्या हातात आणि ते जर सुनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, तर नाड्या भाजपच्या हातात!!, हीच शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरच्या निवडणुकीतली खरी गोष्ट असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ येथे ‘AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर संवाद साधला.
राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के आहे; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!!, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीतले चित्र स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवार महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार म्हणून उभे राहणार की कुठला वेगळाच मार्ग अवलंबणार??, यावर दाट संशय निर्माण झाला.
एकीकडे महाराष्ट्रात दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरून राजकीय घमासान सुरू असताना तसेच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार पैदा झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातल्या धबडग्याच्या पलीकडे जाऊन राजधानी दिल्लीतल्या भारत मंडप मध्ये सुरू असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI समिटमध्ये महाराष्ट्रासाठी मोठी मुशाफिरी केली
मुंबईत ते गुजरात असा बुलेट ट्रेनचा मोठा प्रकल्प येणाऱ्या काळात सुरू होणार आहे. यावरून गुजराती लोक मुंबईत येऊन व्यवसाय सुरू करणार आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जावे लागणार अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांनी मोठे विधान केले आहे. येत्या काळात बुलेट ट्रेन सारखा मोठा प्रकल्प सुरू होणार असून यातून गुजरातमधील लोकांनी महाराष्ट्रात येऊ नये तर महाराष्ट्रातील लोकांनी देखील गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल होतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या मते, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता. त्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता या दाव्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही काही शंका व्यक्त करण्यात आल्या.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड केल्याचा दावा केला आहे. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलिस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना 17 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. मात्र पैसे देऊनही अपेक्षित काम झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या मोठ्या वर्दळीचा गैरफायदा घेत होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमा शुल्क विभागाने 4 ते 11 फेब्रुवारी 2026 दरम्यान धडक कारवाई केली. या सात दिवसांच्या विशेष मोहिमेत कोट्यवधी रुपये किमतीचे सोने आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी तस्करी करणाऱ्या 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विमानतळावरील कडक सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तस्करीचे हे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडली होती 28 जानेवारी रोजी. त्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. तसेच हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला, अपघातामागची नेमके कारणं काय आहेत? असे विविध प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार या विमान अपघताचा तपास सुरू करण्यात आला असून याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
स्वावलंबन आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने, पुण्यात शनिवार, २१ फेब्रुवारीला ‘नारी तू नारायणी’ या विशेष पूर्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र सेविका समिती आणि ज्ञानभारती यांच्या वतीने आयोजित ही परिषद कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत कार्यवाहिका शैलजा देशपांडे यांनी दिली.
महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे “वजीर” बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी “प्यादी”!! हीच महाविकास आघाडीतल्या दोन वजीरांची अवस्था झाली आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेत खासदार होणार का?? आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा आमदार होणार का??
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी येथील ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मराठा सेवा संघ – अभिवादन सभा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
शरद पवारांचा “डाव” काँग्रेसने ओळखला, म्हणूनच घातला त्यांच्या नावाला खोडा!!, अशी राजकीय घडामोड आज घडली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या मार्फत शरद पवारांनी स्वतःच्याच नावाचा “वजीर” पुढे सरकवला
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App