नाशिक शहरातील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत इस्लामी जिहाद चालू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि नोकरीची गरज असलेल्या तरुण महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर केवळ लैंगिक अत्याचारच करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या धार्मिक भावनांशीही क्रूर खेळ खेळला गेला. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने आता कठोर पावले उचलून सहा आरोपींना अटक केली.
काँग्रेसचे काही नेते बारामती विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राहुल गांधी यांना उतरवण्याची तयारी करत आहेत. जर काँग्रेस बारामती विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधींना बोलणार
नाशिक मध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी पुढे येत खरातविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे एकूण तक्रारींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे ऊर्फ बाळू आवारे याच्या जालन्यातील कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून, त्याच्या एका जवळच्या साथीदारालाही सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पुतळे तयार करणाऱ्या आणि बसवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. महेश सावंत यांच्या वतीने ॲड. अमित कारंडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, जी न्यायालयाने ग्राह्य धरली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचे परखड शब्दांत समर्थन केले आहे. पार्थदादा पवार यांचे विधान काँग्रेसला फारच झोंबले आहे. यामुळेच काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू सुरू असल्याच्या त्यांच्या विधानानंतर एरवी डबक्यात लपून बसलेली बेडके बाहेर पडून एकदम डऱ्याव डऱ्यावर करत आहेत, असे ते म्हणालेत.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करून तिला भांडवली बाजारात सूचीबद्ध करायचा निर्णय राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्राला स्वतंत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग म्हणजेच आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय सर्वांत महत्त्वाचा ठरला.
भारताचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!, हीच राजकीय घडामोड काल आणि आज दिसून आली.
महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करून तिला भांडवली बाजारात सूचीबद्ध करायचा निर्णय राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर? राज्यव्यापी आंदोलन औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर?” या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) प्रमुख शरद पवार यांच्यासह 19 नवीन आणि पुन्हा निवडलेल्या राज्यसभा सदस्यांनी सोमवारी शपथ घेतली. शरद पवार व्हीलचेअरवर शपथ घेण्यासाठी संसदेत पोहोचले.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या कॉल रेकॉर्ड्सवरून (CDR) आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “एका खासगी व्यक्तीला गोपनीय कॉल रेकॉर्ड्स कसे मिळू शकतात? हा ‘ब्रीच ऑफ प्रायव्हसी’चा (गोपनीयतेचा भंग) गंभीर प्रकार असून, दमानियांचीच चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. तसेच एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यांनाच प्रमुख करा” असा टोला लगावला.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी भोंदू अशोक खरात विरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. यामुळे खरातवर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. या गुन्ह्यामुळे भोंदू खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे.
कवडीची किंमत देत नाही” इथपासून ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”, या शब्दांतपर्यंत शरद पवारांचा पार्थ पवार वरचा राग कायम राहिल्याचे राजकीय सत्य शरद पवारांच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून आज समोर आले.
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतीने हादरवण्याचा ‘जैश-ए-मोहम्मद’ (JeM) या दहशतवादी संघटनेचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील कुर्ला आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली परिसरात संयुक्त मोहीम राबवून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दहशतवादी ‘टॉय कार’चा (खेळण्यातील कार) वापर करून भीषण स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पवारांच्या मक्तेदारीला आव्हान दिल्याबरोबर पवारांचा तीळपापड झाला. काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल हे दिसेल,
भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची (AI) एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. “सीडीआर कसा मिळवला याचे प्रात्यक्षिक मी माझ्या घरी करून दाखवते, उद्या सकाळी चहा प्यायला या,” असे खुले निमंत्रण त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.
राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा ‘हिंदू अस्मिते’चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या ‘फूट डालो आणि राज करो’ या कुटिल नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे,” अशा जळजळीत शब्दांत लोढा यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
खेळ बदलेल, दिशा बदलेल!” अशा उत्साहात महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली! खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांबसारख्या परंपरागत खेळांमध्ये राज्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला विराजमान झाल्याने हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.
बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्याच पवारांची धडपड; पण देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूत जाऊन राहुरीचा विषय मिटवला!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
पटेल + तटकरेंना शिव्या घाला बारामती सुनेत्रा पवारांचे नेतृत्व लादा!!, असला प्रकार आज बारामतीतून समोर आला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून, काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आकाश विश्वनाथ मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे असा थेट सामना रंगणार आहे.
राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका निनावी पत्राने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांना बीडमधून पाठवण्यात आलेल्या या पत्रात थेट राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रामुळे चाकणकर यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App