राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे त्याची गत जेफ्री एपस्टीनसारखी होऊ नये यासाठी त्याला कायम कॅमेऱ्याखाली ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा, असे ते म्हणालेत. राज्यातील 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचा दावाही आव्हाड यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी विधानसभा सभागृहात पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) च्या सर्वांगीण विकासाबाबत माझी भूमिका ठामपणे मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार करताना मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. “अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा खळबळजनक इशारा तटकरे यांनी दिला आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर तटकरे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत तसह तपासाचे तपशीलही मांडले. आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवर देखील फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देत आपण अपघाताच्या चौकशीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यात कोणाच्या बापालाही सोडणार नसल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना दिले आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात आज एका अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला आहे.
पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा सविस्तर अहवाल अखेर विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत समितीने सावध पवित्रा घेतला आहे. अहवालात त्यांच्या नावाचा थेट कारवाईसाठी उल्लेख नाही. मात्र, “भविष्यातील फौजदारी तपासात जर अधिक लोकांचा सहभाग किंवा पुरावे आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते,” असे समितीने नमूद केल्याने हा विषय अद्याप संपलेला नाही, हे स्पष्ट होते.
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये पसरत असलेल्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते
सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात.
स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही, हिंदू बहुल भारतात हिंदुंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदुंना त्यांच्या महान वारशाची आणि अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??, असा सवाल रोहित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आणि सोशल मीडिया पोस्ट मुळे समोर आला.
राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता मार्च महिना संपत आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसांपासून हजेरी लावत आहे. दुसरीकडे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.
राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दगडखाणी आणि गौण खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा करत सांगितले की, गौण खनिज क्षेत्रातील मागील पाच वर्षांतील उत्खननाचे तीन महिन्यांत ईटीएस (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट सिस्टीम) द्वारे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणानंतर अवैध उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत मंगळवारी केली. ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित करीत या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे त्यांनी म्हटले.
आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले. त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केला, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुण्याच्या परिसरातील नव्या वस्त्या आणि वसाहतींमध्ये मोठा जनसंपर्क साधला.
अजित पवार यांच्या अपघातानंतर 2 महिने झाली तरी तपास अधिकाऱ्यांकडे स्मरणपत्र दिलेले नाही, सीआयडीकडे काय चाललयं हे माहिती नाही. राज्यात आम्ही विविध ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेही झालं नाही, पण कर्नाटकमध्ये आम्ही जाऊन आलो.
पुणे महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प आज महापालिकेच्या मुख्य सभेत सादर करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी १५,६६९ कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडले. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांनी यापूर्वी १३,९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते, त्यात स्थायी समितीने १,६७४ कोटी रुपयांची भर टाकून पुणेकरांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत.
आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केले, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल, असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली आणि त्यामधून प्रवास केला.
भोंदू बाबा अशोक खरात बरोबर “पवार संस्कारितांचे” कारनामे; पण सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस तर दाभोळकरांचा वारसा सांभाळणारे!!, असला प्रकार आज समोर आला.
केंद्रातले मोदी सरकार ज्यावेळी महिला आरक्षण सुधारणा कायदा म्हणजेच नारीशक्ती वंदन 2029 मध्येच अस्तित्वात आणणार, त्यावेळी 400 पारचा नारा हा फक्त नारा उरणार नाही तर ती गरज बनणार आणि देशाचे राजकारण 360 अंशांमध्ये बदलणार. हे फार मोठे राजकीय परिवर्तन देशांमध्ये येत्या तीन वर्षांमध्ये घडवून येणार.
आपल्या आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. “माझं जवळपास ३५ कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, म्हणूनच आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्युनर कारमध्ये फिरत आहे,” अशी जाहीर कबुलीच संजय गायकवाड यांनी दिली आहे. या विधानामुळे राजकीय क्षेत्रातील ‘कमिशन संस्कृती’ आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.
दुधामध्ये पाण्याची आणि घातक पदार्थांची भेसळ करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता “मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिले. अंधेरीतील दूध भेसळ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर मंत्र्यांनी संबंधित घोषणा सभागृहात केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरच्या मोर्चात काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र, पण ठाकरे सेना आणि शप राष्ट्रवादी दोघांपासून विभक्त!!, असेच चित्र आज नागपूरात दिसले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App