राज्यात बेकायदेशीरपद्धतीने व खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून, पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
नवी मुंबईतील सिडकोच्या ४५०० कोटींच्या जमीन घोटाळाप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या चाैकशीची घोषणा दोन महिन्यांपूर्वी झाली होती
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे आधीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे. यापूर्वीही आम्ही सांगितले होते की शेतकऱ्यांच्या गळ्याशी येत असेल तर सरकार काही निर्णय घेईल म्हणून आम्ही शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. ज्यामुळे कोणीही शेतकऱ्यांच्या घरी जात तगादा लावणार नाही, असे भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
लोहा नगरपरिषद निवडणुकीत शरद पवार नावाचा फायदा की तोटा??; कुणाला बसणार फटका??, असे विचारायची वेळ तिथल्या राजकीय घडामोडींनी आणली.
महाराष्ट्रातली नगरपालिका नगरपंचायतींची निवडणूक शिगेला पोहोचली पण तरीसुद्धा शरद पवारांनी अजून विरोधकांना “हा” सवाल का नाही विचारला
बुडत्याला दिसली आधाराची काडी; पवारांच्या नेत्याने पाहिली भविष्याची नांदी!!, असेच म्हणायची वेळ पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाषणामुळे आली.
एरवी स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्या शरद पवारांना ध्यानधारणेची पुस्तके भेट मिळाली आणि त्याबरोबर perfect political timing साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. देव देव करण्यापासून दूर राहिलेल्या शरद पवारांना ध्यान धारणेची पुस्तके भेट दिली आणि ती त्यांनी स्वीकारली याचे बरेच राजकीय अर्थ मुंबईच्या राजकीय वर्तुळात काढले गेले. शरद पवारांनी आत्तापर्यंत “राजयोग” साधायचे बरेच प्रयत्न केले, पण ते सगळे भौतिक पातळीवरचे होते. आता ध्यानधारणेने द्वारे तरी त्यांना या वयात “राजयोग” साध्य होईल का??, असा सवाल राजकीय वर्तुळातून समोर येतोय.
आयएएस अधिकारी असल्याचे भासवून ६ महिने शहरातील पंचतारांकित हॉटेलात राहिलेल्या कल्पना त्र्यंबकराव भागवत या महिलेचे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे ठरत आहे. कारण पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाइल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग तसेच हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठे आर्थिक व्यवहार सापडले.
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्री पदाचा 24 तासांत त्यांचा राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा ताबडतोब घ्यावा.
राज्याच्या फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मालेगाव मधले नेते दादा भुसे यांना राष्ट्रवादीच्या संस्कारांचे लागण झाल्याची चिन्हे दिसली. एकनाथ शिंदेंच्या पेक्षा दादा भुसे यांनाच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची तहान लागली.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीने बरेच झोल केले. याची सगळी यादी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविली.
बनावट आयएएस कल्पना भागवतचे अफगाणिस्तान-पाकिस्तान कनेक्शनचे धागेदोरे समोर येत आहेत. अफगाणी मित्र अशरफच्या भावाच्या पाकिस्तानातील रेस्टॉरंटसाठी कल्पनाने ३ लाख रुपये हवालामार्फत पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम तिने आधी अशरफला दिल्लीत पाठवली. तेथून त्याने मित्राच्या मदतीने ती हवालामार्फत पाकमध्ये पोहोचवली.
२५२ कोटी रुपयांच्या ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज जप्ती प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम उर्फ मोहम्मद सुहैल शेख याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे, अभिनेता-दिग्दर्शक सिद्धांत कपूर यांची मंगळवारी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षासमोर (एएनसी) ५ तास चौकशी केली गेली. सिद्धांत हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा पुत्र आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे.
बहुप्रतीक्षित मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील घोळ आता गंभीर पातळीवर पोहोचला आहे. नुकत्याच २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तब्बल ११ लाख दुबार मतदारांची नावे असल्याची बाब समोर आली आहे. काही मतदारांची नावे चक्क १०३ वेळा नोंदवली गेल्याचेही यादीतून दिसून येते.
गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती पेशाने डॉक्टर होती. इतरांचे प्राण वाचवणारी होती. स्वतःचं आयुष्य संपवेल असं कधी वाटलं नव्हतं. तिने आत्महत्या केली नाही तर ही तिची हत्याच आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.
जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले. त्याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
छत्रपती संभाजीनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्य करणारी कल्पना भागवत (वय 45) नावाची महिला अचानक पोलिस, एटीएस (Anti-Terror Squad) आणि आयबी (Intelligence Bureau) यांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.
ज्या जिल्ह्यातून पवार नेहमी टाकतात “डाव”; त्याच जिल्ह्यात तुतारीतून आवाज येत नाय; जिल्ह्यातल्या चार आमदारांनी मोडली तुतारी!!, अशी अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यात झाली.
पार्थ अजित पवारच्या जमीन घोटाळ्यात आत्तापर्यंत काँग्रेस सकट अनेक विरोधकांनी अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता, पण मनसे त्यापासून अलिप्त होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परस्पर अनावरण करण्याच्या प्रकरणात अमित ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी केस केली त्याबरोबर मनसेने फणा काढला आणि पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
महाराष्ट्रातल्या नगरपंचायती, नगरपरिषदांच्या काही निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना लोकशाही टिकण्याविषयी चिंता वाटायला लागली. त्यांनी पत्रकार परिषदांमधून आणि सोशल मीडिया पोस्ट मधून ती चिंता जाहीरपणे व्यक्त केली.
बारामती आणि माळेगाव या नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारापासून अजून तरी सुप्रिया सुळे दूर आहेत कारण इथेही शरद पवारांनी Game केली आहे.
अजित पवारांनी बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार उमेदवारांना 20 – 20 लाख रुपये देऊन त्यांना माघार घ्यायला लावली.
२६/११ च्या हल्ल्याच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित “ग्लोबल पीस ऑनर्स २०२५” कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. ते म्हणाले, “पाकिस्तानला माहित आहे की ते थेट युद्धात भारताला हरवू शकत नाहीत, म्हणून त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि दिल्ली बॉम्बस्फोट घडवून आणले.”
भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच, 7 फेब्रुवारी रोजी अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App