शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांचा अचानक पुळका आला. पण त्यांना स्वतःच्याच पक्षात कार्यकर्ते टिकवता येईना!!, अशी राजकीय परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उद्भवली.
मुंबई महानगरपालिका ही केवळ एक महापालिका नसून आशियातील सर्वात श्रीमंत सत्ताकेंद्र आहे. आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी ठरणार आहे. यावेळच्या रणधुमाळीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज यावर सुनावणी पार पडली असून, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अपात्र ठरणार नसून, हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष कमालीचा आग्रही असल्याचे दिसत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यात उभय नेत्यांत संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत तुतारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढतील, असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्याने हा दावा फेटाळला आहे.
नगरपालिका मधल्या विजयानंतर न थांबता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लागले पुढच्या कामाला. त्यांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अनेक मेळावे घ्यायला सुरुवात केली असून ठाणे शहरामध्ये उत्तर भारतीय समाजाच्या ओबीसी समुदायाची प्रातिनिधिक बैठक घेतली. त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे मेळावे घेतले पण त्याचवेळी महाविकास आघाडीतले वेगवेगळे नेते पत्रकार परिषदा घेण्यात किंवा पत्रकारांना बाईट देण्यात मग्न राहिले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या आणि छगन भुजबळांच्या राष्ट्रवादीची फरफट झाल्याचे चित्र नाशिक मध्ये बघायला मिळाले. भाजपने महायुतीत घ्यावे म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज धडपड करून पाहिली, पण त्यात त्यांना यश आले नाही.
महायुतीमध्ये भाजपने एकाकी पाडलेल्या अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडला दोन डगरींवर पाय ठेवायचे प्रयत्न चालवलेत खरे, पण यामुळेच ते घसरून पडणार नाहीत याची गॅरंटी कोण देणार??, असा सवाल तयार झालाय.
लवासा प्रकरणात कुटुंबाला दिलासा; पण मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ आणि अजित पवारांविरुद्ध फास आवळला!!, हे चित्र आज समोर आले.
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीच्या घोषणेसाठी मुहूर्त काढलेला नाही, पण हा एक नवीन प्रयोग असल्याकारणाने याची मोठ्या जल्लोषात वाजत गाजतया घोषणा होणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
महाराष्ट्रातील नगर परिषद, नगर पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता, राज्यातील एकूण राजकीय दिशादर्शक ठरले आहेत.
महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपंचायतीचे निकाल लागल्यानंतर कुणी कुठे बाजी मारली, याची वर्णने करताना मराठी माध्यमांनी पुणे जिल्ह्यात अजितदादांचा जलवा 17 पैकी 10 नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा!!, असे वर्णन केले.
“आम्ही केवळ विधानसभाच नाही, तर राज्यातील 70 नगरपालिका जिंकलो. नकली को किया ढेर, UBT को पता चला कोण असली शेर” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या यशानंतर ते मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे सर्वाधिक 213 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. त्यात सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडवला आहे. अनेक मतदारसंघांत ही निवडणूकी महायुतीच्या 3 घटक पक्षांतच झाली. त्यामुळे तेथील निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण अखेर सारासार विचार करता महायुतीने ही निवडणूक आपल्या खिशात घातली आहे.
महाराष्ट्राच्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकांमध्ये जे मोठे यश मिळवले, 54 नगराध्यक्ष निवडून आणले
महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायत यांच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. पण ती साधी धोबीपछाड नव्हे, तर आकड्यांच्या हिशेबात महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा सुपडा साफ केला.
महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आकडेवारी मांडून भाजपच्या यशाचे रहस्य उलगडून सांगितले. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचे आहे, हा त्यांचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनात भाजपाने हे दणदणीत यश संपादन केले.
शरद पवारांच्या घराणेशाहीतल्या दोन तरुण शिलेदार यांचे कथित बालेकिल्ले त्यांच्या गावांमधल्या मतदारांनी उद्ध्वस्त केले.
दिल्लीतून महाराष्ट्रात आपल्या स्वार्थाचे राजकारण साधू पाहणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना गल्लीत मात्र मतदारांनी जोरदार धक्का दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या नगरपरिषदेतली सत्ता सुद्धा राखता आली नाही.
महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप महायुतीचा डंका वाजला, यात काही विशेष घडले नाही, तसा डंका तो वाजणारच होता. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतला प्रचार केला होता.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत. पवार कुटुंब जातीयवादी आहे. त्यांना दलित, मुस्लिम, ओबीसी व आदिवासी समाज चालत नाही. त्यांनीच छगन भुजबळांना तुरुंगात पाठवले. त्यांची धनंजय मुंडे यांनाही तुरुंगात पाठवण्याची इच्छा होती, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रातल्या नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपने इतर पक्षांवर कुरघोडी केली, तरी काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा पराभव केल्याचे चित्र दिसून आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App