आपला महाराष्ट्र

भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

काकांबरोबर खरे खोटे भांडण करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा आता खरा चटका जाणवतोय.

Fadnavis

Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यापैकी दोन प्रमुख निर्णय हे तुकडा बंदी अधिनियम सुधारणा आणि झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये क्लस्टर योजना लागू करण्यासंदर्भात आहेत. तुकडा बंदी अधिनियमातील सुधारणेमुळे महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर दुसऱ्या निर्णयानुसार एसआरएमध्ये क्लस्टर योजना राबवण्यास मंजुरी मिळाली आहे. या दोन महत्त्वाच्या निर्णयांसह बैठकीत इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

Raj Thackeray

Raj Thackeray : महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही; राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून, या विधानामुळे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आम्ही युतीसाठी तुमच्याकडे कुठे आलोय, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे.

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- छगन भुजबळांमुळे ओबीसींचे वाटोळे होणार; जातीवाद डोक्यात असल्याने मराठ्यांवर अन्याय केला

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. भुजबळ यांनी जरांगे यांच्या ‘अभ्यास’, ‘शिक्षण’ आणि ‘मराठ्यांचे नेतृत्व’ यावर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर, आता मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.

Maratha reservation

Maratha reservation : मोठी बातमी : 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Maharashtra Govt Announces

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा: तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Fadnavis government

तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा, मुंबईत झोपडपट्टी समूह पुनर्विकास; फडणवीस सरकारचे निर्णय

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठे पॅकेज देण्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज अनेक धोरणात्मक निर्णय घेतले त्यामध्ये तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा आणि मुंबईत झोपडपट्टी समूह पुनर्विकास या दोन महत्त्वपूर्ण निर्णय यांचा समावेश आहे.

Manoj Jarange Patil,

Manoj Jarange Patil, : मनोज जरांगे यांची टीका- छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा अलीबाबा; ओबीसींचा खरा घात ओबीसी नेत्यांनीच केला

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा अलीबाबा म्हणून केला. विजय वडेट्टीवार सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर जे काही बोलत आहेत, ते छगन भुजबळांचे शब्द आहेत. या लोकांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात. ओबीसींनी यावर चिंतन केले पाहिजेत. या लोकांनीच त्यांचा खरा घात केला आहे, असे ते म्हणालेत.

Gopichand Padalkar

BJP MLA Padalkar : गोपीचंद पडळकरांचा बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप- जेलमध्ये धर्मांतराचे काम; महापुरुषांचे फोटो काढले, कीर्तनही बंद

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता बीड कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसेच जेलमधील कीर्तन बंद करण्यात आले असून कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयाचे आमिष दाखवले जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

अजितदादांच्या पुण्यातल्या दादागिरीला भाजपचा कोलदांडा; प्रभाग रचनेत राष्ट्रवादीलाच फटका, पण महायुतीत अजितदादा करणार काय??

पुणे महापालिकेतली प्रभाग रचना करताना भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातल्या दादागिरीला चांगलाच कोलदांडा घातला.

Maharashtra

Maharashtra : राज्यातील नगरपरिषद, नगरपालिकांची सोडत जाहीर; 17 नगरपरिषदा SC, 34 नगरपरिषदा OBC, तर 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याीतल नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी ही सोडत मंत्रालयात काढण्यात आली. या प्रक्रियेनंतर 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal :लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीची कमतरता; मंत्री भुजबळांनी म्हटले- अनेक गोष्टी करता येणार नाहीत

राज्यात आर्थिक ओढाताण अधिक तीव्र होत चालली असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी यांसारख्या योजनांवरील निधीअभावाची स्पष्ट कबुली दिली आहे. “लाडकी बहीण योजना 35 ते 40 हजार कोटी रुपयांवर जाते, त्यामुळे काही गोष्टी यंदा करता येणार नाहीत,” असे सांगत भुजबळ यांनी सरकारच्या आर्थिक मर्यादांचा उल्लेख केला. निधीअभावामुळे योजनांमध्ये ओढाताण होणार असल्याचेही भुजबळ म्हणालेत.

Devendra Fadnavis

धोरणात्मक सुधारणांमुळे उद्योगांचीना गरुड भरारी; ग्रीन स्टील निर्मिती प्रोत्साहनासाठी लवकरच नवे धोरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.

Bhushan Gawai

Bhushan Gawai : सरन्यायाधीशांवरील हल्ला देशासाठी धोक्याची घंटा; शरद पवारांनी दिला इशारा; लोकशाही, संविधान अन् देशाचा घोर अवमान

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला देशासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायवस्थेचाच नव्हे तर लोकशाही, संविधान व संपूर्ण देशाचा घोर अवमान आहे, असे ते म्हणालेत. राज्यातील इतरही अनेक नेते तथा प्रतिष्ठित व्यक्तींनी गवईंवर त्यांच्या न्यायदालनात झालेल्या कथित हल्ल्याचा जोरकस शब्दांत निषेध केला आहे.

Manoj Jarange

मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??

मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??, असा सवाल मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे समोर आला. गेल्या काही दिवसांमधला घटनाक्रम आणि मनोज जरांगे यांची आजची शरद पवारांवर थेट टीका यामुळे राजकीय संशय अधिक गडद झाला.

municipalities and municipal councils

नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची आरक्षणे जाहीर; तरीही युती आणि आघाडीची चर्चाही सुरू होईना!!

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (6 ऑक्टोबर) मुंबईत 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.

Manoj Jarange

मनोज जरांगे फिरले, आता अजितदादांचे राजकारण येवल्याचा अलिबाबा आणि परळी गॅंग संपवत असल्याचे आरोप केले

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने अजित पवारांच्याही राजकारणाचा देव्हारा बसवायची भाषा करणारे मनोज जरांगे आज फिरले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज वक्तव्य केले.

B. R. Shankaranand

इंडिया नव्हे भारत हाच नव्या शिक्षण धोरणाचा स्पष्ट संदेश , बी. आर. शंकरानंद यांचे प्रतिपादन

इंडिया शब्द मनातून काढून टाकून मन, वचन व कर्म या तीनहीमध्ये भारत बनवायचा आहे. भारतीय ज्ञान संपदेला केवळ शिक्षण क्षेत्रात नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात लागू करायचे.

Vijay Wadettiwar,

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- सर्व काही एकाच समाजाला, तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल

एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Shambhuraj Desai

Shambhuraj Desai : शंभुराज देसाई यांचा हल्लाबोल- उद्धव ठाकरे मी म्हणेन तेच खरे असे वागतात; मुख्यमंत्रिपदासाठी मविआची स्थापना

राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी शिवसेनेच्या चिन्हावरून आणि मुख्यमंत्रीपदावरून सातत्याने भूमिका मांडणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज सडकून टीका केली. घटना आणि कायद्याने दिलेले अधिकार मान्य न करता “मी म्हणतोय तेच खरं,” असा पवित्रा घेणे योग्य नाही, तसेच माझ्या मनात मुख्यमंत्रीपदाचा कोणताची विचार नव्हता, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी टीका केली. उद्धव ठाकरे हे फक्त आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना थोपवून धरण्यासाठीच अशी विधाने करत असल्याचे ते म्हणाले.

महायुती की स्वबळ, हे ठरण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी नाशिक मध्ये घातले लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वबळावर लढवायच्या हे ठरण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक मध्ये लक्ष घातले. इतर पक्षांमध्ये पदाधिकारी शिवसेनेत घेऊन स्वबळ वाढविले.

prakash ambedkar

prakash ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे; आरक्षणवादी जनतेला सोबत घ्या, सवर्णांना मतदान करू नका

ओबीसी लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने हाती घ्यावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. आगामी निवडणुकीत ओबीसीने आरक्षणवादी जनतेला सोबत घेऊन निवडणूक लढवावी, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच सवर्णांना मतदान करण्याऐवजी एससी-एसटी उमेदवारांना आणि ते नसतील तर मुस्लिमांना मतदान करावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पुण्यात पार पडले. या अधिवेशनात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. या अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

CM Fadnavis

CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज्यासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न; ऊर्जेच्या स्रोतांमध्ये परिवर्तन आवश्यक; ‘फ्लेक्स-इंजिन’नंतर सीएनजी मोठा बदल

सध्या जगासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न असून, याचे थेट परिणाम मराठवाड्यात जाणवत आहेत. यंदा मे महिन्यात पावसाळा सुरू होऊन ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सात-सात वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, केवळ पिकेच नव्हे तर जमिनीही खरडून गेल्यामुळे रबीचे पीक घेणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे अत्यावश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Raju Shetti

Raju Shetti : राजू शेट्टींचा इशारा- शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अन्यथा कुणाचीही दिवाळी सुखात होऊ देणार नाही!

अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुती सरकारला कडक इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अन्यथा किमान 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे तिप्पट नुकसानभरपाई द्या. दिवाळीपूर्वी ही मदत न मिळाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी नीट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

Prakash Ambedkar

OBC समाजाने सवर्णांना मतदान करू नये; सगळ्यांची राजकीय आणि सामाजिक ओळख OBC म्हणूनच निर्माण करावी; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळेच वक्तव्य करून मोठ्या राजकीय वादाला फोडणी दिली.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात