आपला महाराष्ट्र

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : ‘उजाडलेल्या गावाची पाटीलकी सोडतो म्हणण्यासारखं’; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या ऑफरवर फडणवीसांचा टोला

शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी असल्याचे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला आहे. “हे म्हणजे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असे म्हणण्यासारखे आहे. आता राहिलाच कोणता राजीनामा?” अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली

Sanjay Raut

Sanjay Raut : ‘त्यांच्या DNA मध्येच गडबड’; फुटलेल्या खासदारांवर राऊतांचा हल्लाबोल, ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून या’

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. शिवसेनेच्या बळावर निवडून आलेल्या खासदारांनी मतदारांशी आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्याचा आरोप करत, “हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar : ‘ना ईडीची भीती, ना पदाचा मोह’; ओमराजेंनी सांगितली शिंदेंसोबत जाण्याची कारणे, मातोश्रींबाबतही मोठं विधान

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ, पदाचा हव्यास किंवा चौकशी संस्थांची भीती नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी आपल्या भूमिकेचे सविस्तर स्पष्टीकरण दिले.

Mumbai BEST Strike

Mumbai BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; शिंदेंची मोठी घोषणा, वेतनवाढीसह ग्रॅच्युईटीचा मार्ग मोकळा

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू ठेवलेला संप अखेर मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे आजपासून बेस्ट बससेवा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे.

Maharashtra Monsoon Session

Maharashtra Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात 10 महत्त्वाची विधेयके; महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा, फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या आगामी अजेंड्याची माहिती दिली. या अधिवेशनात राज्य सरकार तब्बल 10 महत्त्वाची विधेयके मांडणार असून त्यामध्ये महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणारे महत्त्वपूर्ण विधेयकही समाविष्ट असणार आहे. विरोधकांनी संवादाचा मार्ग स्वीकारला तर प्रत्येक प्रश्नाला चर्चेतून उत्तर देण्यास सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Shiv Sena

Shiv Sena : अस्तित्वाची लढाई निर्णायक टप्प्यात! ठाकरेंना आणखी मोठा धक्का? दुपारी होणार महत्त्वाची घोषणा, शिंदे-फडणवीसांचे सूचक इशारे

महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून शिवसेना ठाकरे गटासमोर अस्तित्वाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठाकरे गटातील सहा खासदार बंडाच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली असून, ते दुपारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Kolkata massacre

कोलकाता हत्याकांडाचा पुसला कलंक; सुऱ्हावर्दी अवेन्यू रोडचे नाव बदलून केले गोपाल मुखर्जी रोड!!

कोलकाता हत्याकांडाचा कलंक आज तब्बल 80 वर्षांनी पुसला. कोलकत्याच्या सुऱ्हावर्दी अवेन्यू रोडचे नाव बदलून गोपाल मुखर्जी रोड केले. कोलकता महापालिकेने आज हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये खऱ्या अर्थाने हिंदूंचे राज्य सुरू झाल्याची द्वाही फिरली.

Maharashtra Assembly

Maharashtra Assembly : विधिमंडळ:पावसाळी अधिवेशन उद्यापासून; युती आक्रमक, विरोधक बॅकफूटवर, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही

महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे.

MP Omraje Nimbalkar

MP Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगरचे ‘किंगमेकर’ ठरणार ओमराजे, एका निर्णयावर ठरणार ठाकरे-शिंदेंची पुढील राजकीय लढाई

महाराष्ट्रातील शिवसेनेतील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळाले असून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडाचा मार्ग स्वीकारल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ओमराजेंच्या भूमिकेकडे लागले आहे. ते उद्धव ठाकरेंसोबत राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार, यावर ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : ओबीसी जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा:दुष्काळावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Prataprao Jadhav

Prataprao Jadhav : आदित्य ठाकरेंमध्ये स्वतःच्या वयापेक्षा जास्त अहंकार! अहंकारी लोकांमुळेच नेते ठाकरेंना सोडून गेले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा घणाघात

शिवसेना ठाकरे गटातील दुसऱ्या मोठ्या संभाव्य बंडामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Omraje nimbalkar

ओमराजे निंबाळकरांचा निर्णय म्हणे, दोन दिवसांनी; पण दोन दिवसांपूर्वीच त्यांनीच दिलेल्या उत्तरात निर्णयाचे दडलेय “रहस्य”!!

ओमराजे निंबाळकर म्हणे, दोन दिवसांनी निर्णय जाहीर करतील. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार हे ते स्वतःच धाराशिव मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगतील. पण ओमराजे निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेल्या वक्तव्यात त्यांच्या निर्णयाचे “रहस्य” दडलेय. किंबहुना ते “रहस्य” सुद्धा नाही, तर ते उघड “राजकीय सत्य” बोलून गेलेत!!

Parbhani Yashwadi Temple

Parbhani Yashwadi Temple : परभणीतील यशवाडीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 5 भाविकांचा मृत्यू, 18 जण गंभीर जखमी

परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाले आहेत. शनिवार असल्याने मंदिरात कीर्तन आणि महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, त्याच वेळी हा सभामंडप कोसळला. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे:ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात-मळ्यात असो पण डुबायला नको – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

Fadnavis

Fadnavis : माहिती अधिकार हा पैसे कमावण्याचे साधन नाही:RTIमधील बदलांवर अण्णा हजारे संतप्त; फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा

देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा लागू व्हावा यासाठी ऐतिहासिक संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या नव्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने नुकतेच एक राजपत्र प्रसिद्ध करून माहिती अधिकार कायद्याच्या नियमांमध्ये अत्यंत जाचक आणि महागडे बदल केले आहेत. या बदलांमुळे माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त करत, अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.

Parbhani

Parbhani : दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत एटीएसचे 15 ठिकाणी छापे; 12 जण ताब्यात, पथकात संभाजीनगर व नांदेड एटीएसही

ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

Wadettiwar

Wadettiwar : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट,राज्य सरकारने यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवून कृती आराखडा बनवावा, वडेट्टीवार यांची मागणी

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेबाबत भूमिका घ्यावी लागली, मात्र जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नाही यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

Nashik Corporate

Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर,

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड‌्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली.

पवनराजे हत्याकांडाचा निकाल; काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना – भाजपच्या गळ्यात!!

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागला आणि काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना आणि भाजप यांच्या गळ्यात येऊन पडले!! पवनराजेंची हत्या झाली 2006 मध्ये. त्यावेळी महाराष्ट्रात राज्य होते

पवनराजे हत्या खटल्याचा निकाल लागला; पद्मसिंहांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!!; कुणी दिला शब्द??, कुणी रचले षडयंत्र??

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला आणि पद्मसिंह पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!! त्यामुळे पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदाचा शब्द कुणी दिला होता आणि कुणी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले??,

Pradeep Kurulkar

Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरविरुद्ध दोषारोप झाले निश्चित:जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीस सुरुवात

पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.

Keshav Upadhye

Keshav Upadhye : निकाल बाजूने आला तर लोकशाही, नाहीतर घोडेबाजार!कर्नाटक निवडणुकीवरून केशव उपाध्येंची विरोधकांवर टीका, क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसला झाला फायदा!

कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत निवडणूक प्रक्रियेतील दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Nitesh Rane

Nitesh Rane : आदित्य ठाकरे हे उबाठाचे अभिषेक बॅनर्जी; मंत्री नितेश राणेंची टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले

विशेष प्रतिनिधी मुबई : Nitesh Rane शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे […]

Amit Shah

कोल्हापुरात अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!

कोल्हापुरात येऊन अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!, ही राजकीय घडामोड आज कोल्हापुरात घडली.

Manoj Jarange

Manoj Jarange : आम्हाला येड्यात काढू नका, निर्णय लवकर मार्गी लावा!:आमदार लाड यांच्या भेटीनंतर जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान लाड यांनी सरकारच्या आतापर्यंतच्या कामांचा संपूर्ण ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ कागदपत्रांसह जरांगे यांच्यासमोर मांडला.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात