शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरे यांची विलीनीकरणाला टांग!!, अशीच राजकीय घडामोडी आज राजधानीतून समोर आली.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दि. 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीलाच मोठ्या गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानिमित्ताने पवार कुटुंबाची “डबल गेमच” राजधानीतून समोर आली.
अंमलबजावणी संचालनालय (ED) लवकरच रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांना नवीन समन्स जारी करेल. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात चौकशीसाठी त्यांना पुन्हा बोलावले जाईल.
संवेदनशील माणूस घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणातूनच गुणवत्तावान समाज निर्माण होतो आणि असा प्रगल्भ समाजच राष्ट्राला बलशाली बनवतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ उपजीविका म्हणून नव्हे, तर आत्मीयतेने या पवित्र कार्यात झोकून दिले पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??, असा सवाल समोर आलाय.
राष्ट्रवादीच्या विलीनकरण संदर्भात त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याविषयी माझा बोलण्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीकडे तसा प्रस्ताव घेऊन येतील. त्यानंतर मात्र, नक्कीच याविषयी बोलणे योग्य ठरेल. मात्र, तोपर्यंत हवेत पतंगबाजी का करायची? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांना मंगळवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या एका व्हॉइस नोटद्वारे देण्यात आली आहे, यात आरोपीने कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
अजित पवारांच्या विमान घातपाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. अजित दादांचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही घटना सत्य आहे. आज अजितदादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अपघाताबतचे सविस्तर प्रेसेंटेशन रोहित पवार यांनी सादर केले.
महाराष्ट्रातल्या विविध कार्यालयांमध्ये प्रशासकीय सुधारणा व्हाव्यात. या सुधारणांचा जनतेला लाभ व्हावा या हेतूने फडणवीस सरकारने वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांची स्पर्धा घेतली. या उपक्रमांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर द्वारे जाहीर केला.
“धर्माचा मार्ग सोडून भौतिकतेचा स्वीकार केलेल्या जगाला सुविधा मिळाल्या, मात्र सुख दुरावले आहे. यामुळेच आज मानवासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा समन्वय साधून धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे खरे कल्याण होईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला पहिल्यांदाच उपस्थित राहिल्या.
मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यातील व्यावसायिक शहर लितानमध्ये तणाव कायम आहे. तरीही, मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे सध्या परिस्थिती शांत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तांगखुल नागा आणि कुकी समुदायांमधील हिंसक संघर्षांनंतर लितान आणि त्याला लागून असलेल्या मंगकोट गावातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर सुरू आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालात शिंदे सेनेला मागे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास, पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!,
जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल कुणी संशय आणि संदेह पसरवेल तितके दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण दूरच जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी यंदा १५ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य केंद्रांवर घेतली जाईल. मंडळाचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असले तरी, अंतर्गत गटबाजीवरून राजकीय वातावरण तापले आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सिंधुदुर्गाच्या जनतेने विश्वास दाखवला आहे, मात्र काही लोकांनी महायुतीत राहूनच ‘कमळ’ पाडण्याचे काम केले,” असा खळबळजनक आरोप मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. विशेषतः सावंतवाडी येथील बंडखोर अपक्षांच्या मुद्द्यावरून त्यांनी स्वपक्षातील आणि महायुतीतील काही नेत्यांना जाहीर इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. पण तब्येत फारशी सुधारणा न झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजप व महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजप पुन्हा एकदा नंबर वनचा पक्ष बनला आहे. या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि विशेषतः भाजपला बहुतांश ठिकाणी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत देखील महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. तर पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकांच्या निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याने खळबळ उडाल्यानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच नंबर 1; अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा; 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता!!
जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर निकालांपैकी 43 जागा जिंकल्या. त्यांनी बहुमताचा आकडा आधीच पार केला.
ग्रामीण महाराष्ट्र शरद पवारांना “मानतो”, हे राजकीय मिथक जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी उद्ध्वस्त केले; त्याचवेळी अजितदादांच्या ब्रँडची देखील मर्यादा या निकालांनी स्पष्ट केली.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चिल्ले पिल्ले असा उल्लेख करून त्यांना हिणवणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांना आपल्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा निवडून आणता आले नाही.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App