आपला महाराष्ट्र

Supriya Sule

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना ‘युती’चा प्रस्ताव; अजित पवार गटाच्या नेत्याचा दावा; ‘स्थानिक’च्या निवडणुकांत दोन्ही पवार एकत्र दिसणार?

\राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar

सोफ्यावर अदानी, खुर्चीवर फडणवीस; असले फोटो शेअर करावे लागतात यातच सगळे आले!!

सोफ्यावर अदानी, खुर्चीवर फडणवीस; नुसते फोटो शेअर करून काय होणार??, असा असावा विचारण्याची वेळ शरद पवारांनी शेअर केलेल्या फोटो मुळे आली, पण त्या पलीकडे जाऊन पवारांना असले फोटो शेअर करावेसे वाटतात किंबहुना शेअर करावे लागतात, यातूनच सगळे राजकीय रहस्य बाहेर आले!!, असे म्हणायची वेळ ही आली.

Jitendra Awhad

Jitendra Awhad : मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड, नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी केला पराभव

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विविध पदांवर नवीन चेहऱ्यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव करून विजय मिळवला. तर, सचिव पदासाठी उन्मेष खानविलकर यांनी शाह आलम शेख यांचा पराभव करत बाजी मारली. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली, त्यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केले. दरम्यान, एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण निवडणुकीसाठी एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, फुकटचा ताठा अन् नाव उबाठा; खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले!

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदानाच्या मुद्यावरून मराठवाड्याचा दौरा करत महायुती सरकारवर ‘दगाबाज’ म्हणत टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा उपरोधिक हल्लाबोलही केला.

सुनावणीची बतावणी, उद्धव सेनेकडून सुप्रीम कोर्टाची खिल्ली!!

मूळ शिवसेना हे नाव कोणाला आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला या विषयाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली

Pawar

काका – पुतण्याची “आतून” किंवा “बाहेरून” युती; पण दोन्ही बुडत्यांना वाचविणार का ऐक्याची काडी??

काका – पुतण्याची आतून किंवा बाहेरून युती; पण दोन्ही बुडत्यांना वाचविणार का ऐक्याची काडी??, असा सवाल पवार काका – पुतण्यांच्या राजकीय हालचालीवरून समोर येऊन राहिलाय.

भूखंडाचे श्रीखंड : अजितदादांना मूळात “तो” व्यवहार खरंच रद्द करायचाय की नाही??; त्यांच्या games मुळे राजकीय वर्तुळात संशय!!

पार्थ पवारच्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा व्यवहार अजित पवार यांना खरंच रद्द करायचाय की नाही??, याविषयी मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त होतोय.

भूखंडाचे श्रीखंड : पार्थ पवारवरचे बालंट टाळण्यासाठी कुणी आणि कोणत्या केल्या games??; तरीही अजितदादा अडकणार कसे??

पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या पार्थ पवाराच्या जमीन घोटाळ्यात त्याच्यावरचे बालंट टाळण्यासाठी नेमक्या कुणी आणि कशा “गेमा” केल्या

MNS Balasaheb Thorat

MNS Balasaheb Thorat : मनसेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसचा ठाम नकार; बाळासाहेब थोरात यांचा खुलासा

आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसकडून मोठा राजकीय संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Mukesh Ambani,

Mukesh Ambani, : मुकेश अंबानींच्या रिलायन्सची CBI चौकशी शक्य; ONGC पाइपलाइनमधून 13,700 कोटींच्या गॅस चोरीचा आरोप

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कडून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या विहिरींमधून १.५५ अब्ज डॉलर्स (सुमारे १३,७०० कोटी रुपये) किमतीच्या नैसर्गिक गॅस चोरीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

Kothrud h

कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण भोवले, महिला पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. कारवाईच्या मागणीसाठी या पीडित मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं.

Jyotirlinga area

महाराष्ट्रातील मंदिरांवर चढणार समृद्धी आणि सुरक्षेचा कळस; महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग परिसरात एकात्मिक सुरक्षा प्रणाली कार्यरत करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या विकासासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली.

Ajit pawar

अजितदादांच्या विरोधातल्या सगळ्या केसेस पुन्हा खुलणार??; पार्थच्या जमीन घोटाळ्यात राजीनाम्यासाठी दिल्लीतून दबाव??

पार्थ अजित पवारांचा जमीन घोटाळा बाहेर आल्यानंतर तो दाबण्यासाठी तो व्यवहारच रद्द करायचा प्रयत्न झाला. त्यासाठी 42 कोटी रुपयांचा दंड ठोठवायचाही प्रयत्न झाला. या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरच विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे अजितदादांच्या विरोधातल्या सगळ्या केसेस पुन्हा खुलणार??; पार्थच्या जमीन घोटाळ्यात राजीनाम्यासाठी दिल्लीतून दबाव??, दोन सवाल समोर आले

काँग्रेसला “पडका वाडा” म्हणून हिणवणाऱ्या पवारांच्या पुतण्यावर “भाजपच्या कुबड्या” म्हणवून घेण्याची वेळ!!

शरद पवार फार मोठे मुत्सद्दी आहेत. ते महाराष्ट्राचे राजकारण आपल्या बोटांवर खेळवतात. पवार नेहमीच डाव टाकतात, कुणाला धोबीपछाड देतात

Mahakumbh in Mumbai

भारतातील ‘स्टार्ट-अप कॅपिटल’ : महाराष्ट्र; मुंबईत Innovation महाकुंभ!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई द्वारे आयोजित व केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ चे उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण केले आणि ‘प्री-इनक्युबेशन सेंटर’ चे उदघाटन केले.

खेळाच्या राजकारणात पवार काका – पुतणे भाजपच्या दारात!!

शरद पवारांनी डाव टाकला, त्यांनी खेळी केली, धोबीपछाड दिला, कात्रजचा घाट दाखविला, अशा स्वरूपाने शरद पवारांच्या सगळ्या बातम्या त्यांच्या समर्थकांनी कितीही रंगविल्या

Raju Shetti

Raju Shetti : राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्यावर राजू शेट्टींचा हल्लाबोल; ऊस दर वाढवला असता तर तुमचे कर्जही आम्हीच फेडले असते!

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळींकडून कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची एक मालिकाच सुरू आहे. आता या यादीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भर पडली आहे. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी ‘आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,’ असे म्हणत मुक्ताफळे उधळली.

Nitesh Rane

Nitesh Rane : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान

जिल्ह्यात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरून हा संघर्ष वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आता जशास तसे उत्तर देत थेट आव्हान दिले आहे.

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : मातोश्री ड्रोन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; म्हणाले- बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का?

बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मातोश्रीच्या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर टीका केली आहे. कोणता सर्व्हे एखाद्याच्या घरात डोकावण्याची आणि दिसताच लगेच पळून जाण्याची परवानगी देतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Gadchiroli

नक्षलग्रस्त गडचिरोलीत विकासाची पेरणी; उद्योग, शिक्षण आणि रोजगाराच्या सोबतच आरोग्य क्रांती!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि एज्युकेशनल कॅम्पसची पायाभरणी आणि कोनशिला अनावरण संपन्न झाले. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यात विकासाची पेरणी झाली.

Parth Pawar

Parth Pawar : अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ; जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरावे लागणार

पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी आता पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे, अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे. अजित पवार यांनी या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर केला होता. मात्र, या व्यवहारासाठी पूर्वी आयटी पार्क उभारण्याच्या कारणावरून जी मुद्रांक शुल्क सवलत मिळाली होती, ती आता लागू होणार नाही, असं निबंधक कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

पार्थ पवारचा घोटाळा, मधल्या मध्ये जय पवारचा पत्ता काटला??

पार्थ पवारचा घोटाळा, मधल्या मध्ये जय पवारचा पत्ता काटला??, असा सवाल बारामतीतून समोर आला. राज्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या.

Aditi Tatkare

Aditi Tatkare : मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या- लाडकी बहीण योजनेतील केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर, परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय

राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेकांकडून केवायसीची मुदतवाढ मागणी होत आहे.

Narayan Rane

Narayan Rane : उद्धव, राज ठाकरेंमध्ये सत्तेत येण्याची क्षमता नाही, नारायण राणेंची टीका

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोघं भाऊ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र बोलत आहेत. पण सत्तेवर येण्याची ताकद त्यांच्यात नाही, असा टोला राणेंनी लगावला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी काहीच केलं नाही, त्यांचं अस्तित्व संपत चाललंय आणि आता त्यांच्या हाती फक्त भाषणे उरली आहेत, अशी टीका करत राणेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.

Pawar famil

भूखंडाचे श्रीखंड : पवार फॅमिलीचा झोलझाल, मोदी + फडणवीसांच्या गळ्यात घाल!!

पवार फॅमिलीचा झोलझाल, मोदी + फडणवीसांच्या गळ्यात घाल!!, असलाच प्रकार कोरेगाव पार्क जमीन घोटाळा बाहेर आल्यापासून काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांवरून दिसून राहिलाय.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात