महाराष्ट्रातल्या मतदार याद्या शुद्धीकरणासाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढलेल्या सत्याच्या मोर्चात शरद पवार त्यांच्या वयोमानानुसार चालले नाहीत, पण ते त्या मोर्चाच्या सभेत मात्र सामील झाले. या मोर्चाचे मुख्य भाषण खुद्द त्यांनीच केले.
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आणि मनसे यांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या विरोधात भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. पण त्या आंदोलनाकडे भाजपच्याच प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले.
सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंवर फोकस; त्यांच्या मागे पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची फरफट!!, असे एक राजकीय चित्र आजच्या मुंबईतल्या सत्याच्या मोर्चातून पुढे आले.
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन, राज्याचे पोलिस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, हा संपूर्ण तपास एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून केला जाईल, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून अजितदादा करताहेत गेमा; वेळीच सावध व्हा!!, असं म्हणायची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजकीय करतुतीने आली.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
मतदार याद्यांमधील गंभीर घोळ, मतचोरी आणि दुबार नावांवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ऐतिहासिक सत्याचा मोर्चा निघणार आहे. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढत आहेत. सत्याचा मोर्चा, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनातून मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात आवाज उठवला जाणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू दीर्घकाळानंतर एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पोहोचणार आहे, जिथे नेत्यांची भाषणे होणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते झाला. शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीपूजन आणि मोळी टाकून गळीत हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक संगीत, शेतकऱ्यांचा उत्साह आणि कारखान्याच्या परिसरात उभा असलेला गजबजलेला माहोल यामुळे संपूर्ण परिसरात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी आणि कारखान्याच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करत राज्याच्या आर्थिक आणि कृषी धोरणांबाबत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली (पंजाब) येथे अटक केली आहे. हरियाणातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीत दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. ती शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी मोहालीच्या एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर २६ ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार ऊर्फ हॅप्पी यालाही अटक केली. त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुले जप्त केली. या कारवाईची पोलिसांनी एकत्रित माहिती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी दोन ठाकरे बंधू, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी उद्या संयुक्त मोर्चाचे आयोजन केले असले
सिनेमांची पंढरी मानली जाणारी मुंबई गुरुवारी पवई परिसरातील ओलीसनाट्याच्या सिनेस्टाइल थराराने हादरली. एका स्टुडिओत वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलेली १७ मुले, १ वृद्ध आणि १ अन्य व्यक्ती अशा १९ जणांना आरोपीने डांबून ठेवले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीतले प्रमुख नेते रा. सू उर्फ दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे अमरावतीत लोकार्पण करण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री येथे केली. कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना ‘कारणे दाखवा’
सत्तेसाठी किती चाटूगिरी करणार? मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे. यासाठी किती लाचारी करणार?
काही विशिष्ट कारणांवरून 17 मुले आणि दोन वृद्धांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. मुलांची सुटका करताना रोहित आर्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचे सांगितले गेले त्यामुळे प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा एन्काऊंटर झाला.
महाराष्ट्रातील तथाकथित मतचोरी विरोधात काढण्यात येणाऱ्या सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झाली. त्या बैठकीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हजर होते.
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’ वापरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. व्हीव्हीपॅटचा वापर करण्यासाठी सध्याच्या कायद्यांमध्ये कोणतीही तरतूदच नाही आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे तांत्रिक यंत्रणाही तयार नाही, असे आयोगाने ठणकावून सांगितले आहे. निवडणुका तातडीने घेण्याची मागणी करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांनाही आयोगाने एक प्रकारे कायदेशीर आणि तांत्रिक आव्हान स्पष्ट करून, व्हीव्हीपॅट वापरणे ‘सद्य:स्थितीत शक्य नाही’ असा संदेश दिला आहे.
स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या शरद पवारांना आता मात्र क्रिकेटमध्ये कुठल्या मंडळाच्या किंवा असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तींना कशी झाली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका व विविध प्राधिकरणांना वितरित करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन २०२३-२४ मध्ये वितरित केलेल्या आणि अद्याप खर्च न झालेल्या निधीचा उपयोग करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा अंतिम मुदतवाढ कालावधी देण्यात आला आहे. तारखेपर्यंत खर्च न झालेला निधी २० मार्च २०२६ पर्यंत शासनाकडे जमा करणे बंधनकारक राहील, असा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला.
Prahar leader Bachchu Kadu meet Chief Minister Devendra Fadnavis today discuss farmers debt waiver issues. Kadu warn VIDEOS action rail roko if discussion fail. Raju Shetti, Ajit Navale join meeting negotiate solution.
राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती घटकातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ वितरित करण्यासाठी रु. ४१०.३० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाने ३९६० कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. यातून ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी सदर निधी वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेला हा निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी आणि विभागप्रमुखांनी काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा तसेच निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थींसाठीच होईल याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत.
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची अधिकृत पुष्टी मिळाली आहे. पुणे पोलिसांनी यूके हाय कमिशनला पाठवलेल्या पत्रानंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हाय कमिशनकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ हा सध्या लंडनमध्ये आपल्या मुलासोबत राहत असून त्याचा व्हिसा 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत वैध आहे. घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असला तरी, तो परदेशातच असल्याने त्याच्या शोधासाठी यूकेतील स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी घायवळला तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली होती, आणि या प्रकरणी दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार सुरू आहे
मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतिक्षा असणारी प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, याच दिवशी मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. यानंतर, 14 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग: इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लिडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ या रिपोर्टचे प्रकाशन केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App