महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. त्यात सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडवला आहे. अनेक मतदारसंघांत ही निवडणूकी महायुतीच्या 3 घटक पक्षांतच झाली. त्यामुळे तेथील निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण अखेर सारासार विचार करता महायुतीने ही निवडणूक आपल्या खिशात घातली आहे.
महाराष्ट्राच्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकांमध्ये जे मोठे यश मिळवले, 54 नगराध्यक्ष निवडून आणले
महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायत यांच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. पण ती साधी धोबीपछाड नव्हे, तर आकड्यांच्या हिशेबात महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा सुपडा साफ केला.
महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आकडेवारी मांडून भाजपच्या यशाचे रहस्य उलगडून सांगितले. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचे आहे, हा त्यांचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनात भाजपाने हे दणदणीत यश संपादन केले.
शरद पवारांच्या घराणेशाहीतल्या दोन तरुण शिलेदार यांचे कथित बालेकिल्ले त्यांच्या गावांमधल्या मतदारांनी उद्ध्वस्त केले.
दिल्लीतून महाराष्ट्रात आपल्या स्वार्थाचे राजकारण साधू पाहणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना गल्लीत मात्र मतदारांनी जोरदार धक्का दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या नगरपरिषदेतली सत्ता सुद्धा राखता आली नाही.
महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप महायुतीचा डंका वाजला, यात काही विशेष घडले नाही, तसा डंका तो वाजणारच होता. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतला प्रचार केला होता.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत. पवार कुटुंब जातीयवादी आहे. त्यांना दलित, मुस्लिम, ओबीसी व आदिवासी समाज चालत नाही. त्यांनीच छगन भुजबळांना तुरुंगात पाठवले. त्यांची धनंजय मुंडे यांनाही तुरुंगात पाठवण्याची इच्छा होती, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रातल्या नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपने इतर पक्षांवर कुरघोडी केली, तरी काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा पराभव केल्याचे चित्र दिसून आले.
आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राजकीय आखाड्यात मोठे भूकंप होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणारी मोठी घडामोड आज मुंबईत पार पडली. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून, अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.
राज्यातल्या 288 नगरपालिका नगरपंचायती नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप शिंदे सेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांनी जोरदार आघाडी घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एपस्टीन फाईल्स’बाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. “पंतप्रधानांबद्दल काहीही बोलून चर्चेत राहण्याचा हा पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न असून, त्यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी चव्हाणांवर तोफ डागली.
राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र, तर अन्य२८ महापालिकांमध्ये आघाडी करून निवडणूक लढवायला तयार असल्याची भूमिका आज काँग्रेसने मांडली. त्यामुळे ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पासून काँग्रेसने फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र तळ्यात मळ्यात आजही कायम राहिले.
शालिनीताई पाटील वयाच्या 94 व्या वर्षी कालवश झाल्या. काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या. शालिनीताईंनी आपल्या दीर्घायुष्यात अनेक राजकीय चढ-उतार बघितले. त्यात त्यांनी कधी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर कधी साक्षी भावाने सहभाग नोंदविला. त्या जीवनाच्या प्रत्येक काळात सक्रिय राहिल्या.
एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करणार नाही असे म्हणणाऱ्या भाजपने काही अंशी भूमिका बदलल्याची चिन्ह दिसत असून नबाब मालिकांच्या विषय बाजूला ठेवून महायुतीचे काम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचे समोर आ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन करून संवाद साधला.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडिओ पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरला आहे. त्यात चव्हाणांच्या दाव्याची री ओढत पाकने भारताला अर्ध्या तासातच पाणी पाजल्याचा दावा केला जात आहे. भाजपने पाक माध्यमांचा हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते बोलतात पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेसला पाकच्या मदतीची आशा, असे भाजपने म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते.
सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच पाच वर्षे आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला यावरूनच कळते कॉंग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्षनेता होणार म्हणून बसले होते. मात्र, बिचाऱ्यांचे दुर्दैव असल्याचा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख ‘दोन शून्यांची बेरीज’ असा केला आहे. युतीचा नारळ फुटण्यापूर्वीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील अशी सद्यस्थिती आहे, असा खोचक टोला लगावत शेलार यांनी या युतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून आता त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात त्यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘ऋषभायन 2’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यानिमित्त भरवलेल्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची नावे ब्राह्मी लिपीत लिहून मांडली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘ॲन्युअल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ पूजा पद्धती नसून एक जीवनदृष्टी, विचारपद्धती आणि व्यवस्थात्मक संस्कृती आहे, ज्यामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षे अखंड टिकून आहे. भारताचा सांस्कृतिक अभिमान हा दंतकथांवर नव्हे, तर ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहे. मात्र, या अभिमानाला आत्माभिमानाचे बळ देत आधुनिक काळात नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी नमूद केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App