काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पेचावरून भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ” चंद्रपुरात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापित करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. वडेट्टीवारांची सध्या नाचता येईना अंगण वाकडं अशी अवस्था आहे,” असे परिणय फुके म्हणालेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले.
ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘कैसा हराया’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून दिला आहे. या माफीनाम्यात सहर शेखने आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमच्या (AIMIM) नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला राजकीय गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या वादात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली असून, त्यांनी सहर शेख यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. “सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून ती पक्षाचीच अधिकृत भूमिका आहे,” असे म्हणत जलील यांनी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार,” असे ते म्हणाले.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (ACB) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) केसमध्येही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. “छगन भुजबळांवरील सर्व प्रकरणे संपलेली नाहीत, त्यांना कोणतीही क्लीन चिट मिळालेली नाही. आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे त्यांनी सांगितले. तसेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर खुद्द संजय राऊत यांनीच या मौनाला पूर्णविराम दिला आहे. “मला पोटाचा कॅन्सर झाला होता,” असा धक्कादायक पण तितकाच धाडसी उलगडा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वैयक्तिक लढाईतून ते आता यशस्वीपणे बाहेर पडत असून, त्यांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानात पूर्ण ताकदीने एन्ट्री केली आहे.
एक नगरसेवक पद काय जिंकले, तर सगळा मुंब्रा हिरवा करायला निघालेल्या सहर शेखला माफी मागावी लागली, पण तिने मागितलेल्या माफी नंतर माझी खासदार इम्तियाज जलील यांना “कंठ” फुटला आणि त्यांनी सगळा महाराष्ट्र हिरवा करायची धमकी दिली.
महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारमध्ये भाजपने अजित पवारांच्या वाटाल्या दिलेल्या सत्तेच्या तुकड्याला आतून आणि बाहेरून असा दोन्हीकडून सुरुंग लावण्यात आल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींमधून उघड झाला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस दलासाठी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, स्थानिक गुन्हे शाखेतीलच एक कर्मचारी एमडी ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. नार्कोटिक विभागाची जबाबदारी सांभाळणारा हवालदार शामसुंदर गुजर याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या खाकीचाच हात ड्रग्स रॅकेटमध्ये असल्याचं उघड झाल्याने पोलिस प्रशासनाची विश्वासार्हता मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
बाळासाहेबांचे शब्द उसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा भाजप + AIMIM जोडगोळीला टोला!!, असे आज घडले. जब प्यार किया तो डरना क्या??, असे वंचित बहुजन आघाडीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहून एक व्हिडिओ शेअर केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) छगन भुजबळ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासाअंती आता ईडीने छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त केले आहे.
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध 10 स्तरांवरील शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात आले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फटका खाल्ल्यानंतर अजित पवार बनले “मवाळ”; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत करत आहेत
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच कणकवली पंचायत समितीतील एका घडामोडीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यातील वरवडे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांच्या जलाशयांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी केला जाणार आहे. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या धरणांवर मोठ्या प्रमाणावर तरंगते सौर प्रकल्प (फ्लोटिंग सोलर) उभारून महाराष्ट्राला हरित ऊर्जेत आघाडीवर आणण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेता पुन्हा एकदा शिवसेनेत परत येण्याचे संकेत दिले आहेत का अशी चर्चा होऊ लागली आहे. शिवसेना माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हत तर घर सोडणं होतं, असे ते म्हणाले आहेत.
शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सतत होणाऱ्या सुनावणीच्या पुढे ढकलण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. मुंबई विमानतळावर सरन्यायाधीशांचे स्वागत करतानाचे फोटो शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राऊत संतापले.
ठाकरे सेनेला मुंबईत नको भाजपची साथसंगत; पण चंद्रपुरात हवी सत्तेसाठी सोबत!!, अशी ठाकरे सेनेची दुहेरी राजकीय भूमिका आज समोर आली.
भारतातील कोणतीही भाषा संस्कृतशिवाय नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस : महापालिका टू जिल्हा परिषद व्हाया दावोस एक राजकीय प्रवास!!, अशाच शब्दांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या महिनाभरातल्या कर्तृत्वचे वर्णन करावे लागेल.
अंगार अजूनही पेटता आहे… विचार अजूनही जिवंत आहेत!!, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या सुरवातीलाच सूचक सोशल मीडिया पोस्ट केली.
दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026 मध्ये सहभागी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी इथून महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली आहे तसेच राज्याच्या कोणत्या भागात व कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक आली आहे, यांची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नाशिक : 29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या […]
29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. पण त्या पलीकडे जाऊन महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, पण त्यात अजितदादांचा सहभाग नगण्य असेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच निर्णायक भूमिका बजावतील.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App