आपला महाराष्ट्र

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात; पुणे स्थानकाजवळ रेल्वे डबा रुळावरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही

पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik : मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम; पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणालेत. सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

TCS corporate Jihad

TCS corporate Jihad : माजी खासदार इम्तियाज जलील निदा खान आणि तिच्या कुटुंबाच्या भेटीला; तरीही फरार निदा पोलिसांना सापडेना!!

नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली, त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून ती तिच्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.

TCS

TCS corporate Jihad : मालेगावात धर्मांतराचे रॅकेट, निदा खानच्या सुनावणी दरम्यान तपासात धक्कादायक वास्तव समोर!!

नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून मी तुझ्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडत आहे. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.

ममतांच्या प्रचारासाठी फक्त केजरीवाल; बाकीचे प्रादेशिक नेते गपगार!!

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत ममता बॅनर्जींनी अक्षरशः एकाकी प्रचार केला.

Bageshwar Baba

Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही; कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो- धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे.

Kalpanaraje Bhonsle

Kalpanaraje Bhonsle : मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकणे धोक्याची घंटा, NCERTच्या निर्णयावर कल्पनाराजे भोसलेंचा संताप

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे ही धोक्याची घंटा असून, हे असेच चालत राहिले तर भविष्यात शिवरायांच्या इतिहासावर पडदा पाडण्याचा प्रयत्न होईल,” अशी भीती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik : ‘व्यावहारिक मराठी’वरून टक्कर; सरकार–रिक्षा-टॅक्सी संघटनांची आज निर्णायक बैठक; 2 मेपासून परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सरकार आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक होणार असून, यातून तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CM Fadnavis

CM Fadnavis : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी; म्हणाले – ‘हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार’, 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा चमत्कार असल्याचे सांगत राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Sambhaji Chhatrapati

Sambhaji Chhatrapati : धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती; छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केले पाहिजे,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल, यात शंका नाही; राम मंदिर बांधण्याबाबतही लोकांना शंका होती, त्याचप्रमाणे हे ध्येयही आता निश्चित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल आणि यावर कोणालाही शंका नसावी. ते म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा लोक अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्मितीबद्दल संशयात होते. ते याला अशक्य मानत होते.

Rohit Pawar

Rohit Pawar : हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये; आमदार रोहित पवार संतापले- ‘भोंदू बागेश्वर’ म्हणत बंदीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख ‘भोंदू’ असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवराय थकले व राजपाट समर्थांकडे दिला हे भोंदू बागेश्वर यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. ते पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नये. त्यांच्यावर राज्यात बंदी घातली पाहिजे, असे ते आपला संतप्त सूर आळवत म्हणालेत.

Fadnavis

Fadnavis : बागेश्वर बाबांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका; उद्धव ठाकरेंच्या भेटीचे वृत्तही फेटाळले, म्हणाले- लपून भेटण्याची गरज नाही

नागपूरमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. या कथनामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

फडणवीस – ठाकरे भेटीची सोडली पुडी; पण संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी??

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची पुडी एका सोशल मीडिया अकाउंटने सोडली. पण त्यामधून संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी झाली??, […]

Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय:राष्ट्रवादीत ‘थ्री लेअर’ सूत्रांची अंमलबजावणी; पार्थ-जय पवारांवर नवी जबाबदारी, नेतृत्वाचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता तीन पातळ्यांवर विभागण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्ष अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही नवी रचना लागू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

Sadavarte

Sadavarte : अमित ठाकरेंना मारहाणीचा बॅच मिळालाय का?:वकील गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल? ‘राज ठाकरेंची औलाद’ म्हणत साधला निशाणा

: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संपात मराठी रिक्षा चालकांची अडवणूक करणाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंची औलाद मारण्याची भाषा बोलते. अमित ठाकरे हवालदार झालेत? की आरटीओचे शिपाई? त्यांना कुणालाही मारहाण करण्याचा बॅच मिळालाय का? असे ते म्हणालेत.

Maharashtra Weather Alert

Maharashtra Weather Alert : उष्णतेचा कडाका आणि वादळी पावसाचा इशारा; राज्यात ‘दुहेरी’ हवामानाचा ताण, पुढील 4 दिवस निर्णायक

राज्यात सध्या हवामानाने दोन टोकांचे रूप धारण केले आहे. एका बाजूला प्रखर उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाने धोकादायक पातळी गाठली असून अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.

The Fadnavis government

महाराष्ट्राच्या पोलीस दलाची गुणवत्ता जागतिक पातळीवर नेण्याचा फडणवीस सरकारचा संकल्प; राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

३६ वी ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६’ चा उद्घाटन सोहळा आज मुंबईतील कालिना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस दलाचे मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

Manohar Bhonsle

Manohar Bhonsle : बाळू मामाचा अवतार सांगणारा मनोहर भोसले पुन्हा गजाआड; कुर्डुवाडी पोलिसांकडून भोंदूगिरीप्रकरणी बेड्या

स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसलेला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या ताज्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर भोसलेवर याआधीच करमाळा आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय बारामती आणि दौंड पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीचे गुन्हे नोंदवण्यात आले असून, आजच्या कारवाईमुळे त्याच्यावरील गुन्ह्यांची मालिका अधिक गडद झाली आहे.

Sanjay Nirupam

Sanjay Nirupam : केवळ ऑटो-टॅक्सीवाल्यांनाच मराठीची सक्ती का? कॉर्पोरेट-डिलिव्हरी बॉईजचे काय? लायसन्स रद्द करणे अन्याय- संजय निरुपम

केवळ ऑटो-टॅक्सी वाल्यांना मराठी सक्तीचा निर्णय का? कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे मोठ्या कंपन्यामध्ये काम करणारे सर्व लोकं मराठीमध्ये बोलतात का? स्विगी, झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय मराठी बोलतात का? सर्वांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे झाला पाहिजे, असे शिवसेना नेते संजय निरुपम यांनी म्हटेल आहे. हे काही आम्ही मतदान मिळावे म्हणून करत नाही, लोकांचा रोजगार जावू नये यासाठी आम्ही काम करत आहोत.

Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी; ‘शिवाजी कोण होता’ वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादात दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत प्रकरणात माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले गेले. या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे ते म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण; ठाणे – भिवंडी – कल्याण विस्तारित मेट्रो ५ मार्गासाठी १८,१३० कोटींचा निधी मंजूर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. मेट्रो – ५ ( ठाणे – भिवंडी – कल्याण ) प्रकल्पातील विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस आता जास्तच घराणेशाहीच्या कोंडीत; सुनेत्रा पवारांनी वाढ केली दोन्ही मुलांच्याच जबाबदारीत!!

राष्ट्रवादी काँग्रेस आता जास्तच घराणेशाहीच्या कोंडीत; सुनेत्रा पवारांनी वाढ केली दोन्ही मुलांच्याच जबाबदारीत!!, ही राजकीय घडामोड घडल्याचे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान झाल्यानंतर समोर आली.

Sanjay Nirupam

Sanjay Nirupam : रिक्षाचालकांना मराठी सक्तीवरून शिंदे गटातच ठिणगी; संजय निरुपम यांचे सरनाईकांना पत्र, फेरविचार करण्याची मागणी

राज्यातील टॅक्सी, रिक्षा तसेच ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीतच संवाद साधणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवत फेरविचाराचे पत्र प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट; हर्षवर्धन सपकाळांनीही घेतली ‘मातोश्री’वर भेट

राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसने आधीच अनुकूलता दर्शवली असताना, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती केल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्याच नावाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात