परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परळी हादरून गेली होती. त्या दिवसापासून मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीला या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लावले गेले; मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा ठाम आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत असून तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार असल्याने जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार निवृत्त होत असल्याने ही जागा आपल्याकडेच राहावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आग्रह आहे
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट केला. ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज घडली. काँग्रेसने महाराष्ट्रातल्या राज्यसभा जागेवर आपला अधिकार सांगितला. त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची ऑफर दिली. पण त्यामुळे शरद पवारांचा राज्यसभेत जाण्याचा मनसूबा काँग्रेसने परस्पर उधळून लावला.
अमेरिका आणि इजरायल यांनी इराणवर हल्ला करून इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनी याला संपविल्यानंतर तिथे इस्लामिक राजवट बदलायची नांदी झाली
महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी “एकमेव” उमेदवार शरद पवार असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांना अखेर त्यांना इतर उमेदवारांच्या स्पर्धेत आज उभे करावे लागले.
राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली आणि थेट घरपोच मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली मंडळ, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली.
विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना (कामकाज क्र. ४) अंतर्गत मा. प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील व्यावसायिक अवैध बांगलादेशी घुसखोरीच्या वाढत्या प्रश्नाबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या विषयावर शून्यसहिष्णुतेची भूमिका घेत आक्रमक कारवाई सुरू केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सर्व 7 जागांसाठी महायुतीचे उमेदवार उतरवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी अतिरिक्त 20 मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परिणामी, विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या हाती 7 पैकी एकही जागा न लागण्याची शक्यता आहे.
युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी बसलेले आहेत, संजय राऊत यांनी त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. देशाची मान खाली जाईल अशी वक्तव्य तुम्ही करु नका, भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सक्षम आणि समर्थपणे पुढे जात आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100 टक्के घातपात असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने सादर केलेल्या अहवालावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एएआयबी अजित पवारांचे विमान झाडाला धडकून खाली कोसळले अशी तकलादू थेअरी देत असेल, तर त्यामुळे अजितदादांचा घातपात झाला हे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.
राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘पॉश’ (PoSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आल्यानंतर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांच्या अंतर्गत समितीचे (Internal Committee – IC) ‘विशेष ऑडिट’ करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले असून, ३० दिवसांच्या आत ऑडिट अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता, हे भाविक तेथे अडकल्याची दाट शक्यता राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सर्व यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात 17 कामगार ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना पूर्ण होत असतानाच, हवाई उड्डाण मंत्रालयाच्या ‘एएआयबी’ (AAIB) तपास यंत्रणेने या घटनेचा २२ पानांचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला आहे. विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते एका झाडाला धडकले होते, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे. या प्राथमिक अहवालात अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी, अपघाताला कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत मनोज जरांगे पाटील यांना थेट धमकी दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर कार्यक्रम खल्लास… जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय,” अशा आशयाची ही पोस्ट सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कुणीही पतंगबाजी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. या प्रकरणी आपण मृत व्यक्तीच्या पद व प्रतिष्ठेचा तथा त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला हवा, असे ते म्हणालेत.
भक्ती चळवळीने समाजातील दोष दूर करत तथाकथित वंचित आणि उपेक्षित समाजाला नेतृत्त्वाची संधी दिली. परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात जेव्हा राजकीय व्यवस्था कोलमडली होती, तेव्हा भक्ती आंदोलनानेच खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले, असे प्रतिपादन भारतीय संतवाड़मयाचे अभ्यासक डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले.
अजित पवारांच्या विमाना अपघाता संदर्भात DGCI ने आपला प्राथमिक अहवाल आज जाहीर केला त्यामध्ये 22 पाने आहेत.
समाजात अनेक समस्या असून त्या सोडविण्याचे आणि समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य सामाजिक संस्था करत आहेत. ‘मी अधिकारी नाही, तर कार्यकर्ता आहे
आदित्य ठाकरे बरोबर बोलत आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी आज पुन्हा रेटली शरद पवार यांची राज्यसभा उमेदवारी!!, असे आज संजय राऊत यांच्या नियमित पत्रकार परिषदेत घडले. पण संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यातले between the lines न वाचता साधे तपशील जरी वाचले तरी शरद पवारांची राज्यसभा खासदारकी अवघड आहे हेच राजकीय वास्तव आज समोर आले.
मुंबईत सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विविध विभागांच्या बैठकांचा आणि नियोजनाचा धडाका सुरू आहे. याच दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आणि ब्रीफिंग बोलावले होते. मात्र, मंत्र्यांचे स्पष्ट आदेश असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मंत्र्यांच्या ब्रीफिंगला दांडी मारणे आणि शासकीय कामात कसूर करणे ही बाब गंभीर मानत अखेर त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या तपासाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व 23 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आरोपपत्रात लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची जागा सोडण्यास ठाम नकार दिला आहे. आम्ही राज्यसभेच्या जागेवरील आमचा दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आमच्या आमदारांनी आपली भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली आहे, असे ते म्हणालेत.
अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सरकार FIR दाखल करून घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे त्यामागे काहीतरी काळेबेरे आहे असा संशय निर्माण होतोय, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. अजित पवारांच्या अपघाताविषयी FIR का नोंदवला जात नाही? या प्रकरणी सरकार का अडथळे आणत आहे? सरकार एका FIR ला का घाबरत आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी या प्रकरणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या घटनेने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणावरून विधानसभेत राजकीय रणकंदन माजले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात चुकीची आकडेवारी देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत, भाजप आमदार योगेश सागर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App