राज्यात 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ झाल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समाेर आली आहे. या प्रकरणाचा तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ताटकाळत ठेवत काँग्रेस आणि शिवसेना यांनी अखेरच्या दिवशी त्यांना महाविकास आघाडीची राज्यसभा उमेदवार द्यायचे मान्य केले. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या, तेव्हा कुठे काँग्रेस हायकमांडने आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच्या उमेदवारीला मान्यता दिल्याची बातमी आली.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान दिसले असते, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाद्वारे एकप्रकारे त्यांनी या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विहिरीने करण्याची चर्चा थांबविण्याचा जयंत पाटलांनी लॉलीपॉप दिला आणि त्यातून शरद पवारांच्या उमेदवारीतला अडथळा दूर करायचा “डाव” खेळला, हीच राजाकीय वस्तुस्थिती आज राज्यसभा निवडणुकीचे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी म्हणजेच 4 मार्च 2026 रोजी समोर आली.
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. 2026 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लढतीकडे मोठ्या चाचणीच्या रूपात पाहिले जात आहे. अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेण्याची तयारी केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मनसेने स्वीकृत नगरसेवकपदाबाबत अपेक्षा व्यक्त केली होती; मात्र ती पूर्ण न झाल्यानेच हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचा गट भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागल्या दारी??, असा सवाल ऐन मोक्याच्या क्षणी समोर आलाय.
राज्यसभेच्या जागेसाठी आज मविआतील 3 पक्षांची बैठक होणार आहे. ती माहिती आम्ही दिल्लीला पाठवू. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मविआचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल. अद्याप कोणतेही नाव अंतिम झालेले नाही, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे तर आम्हाला राज्यसभा आणि उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची जागा घ्यावी, असा आमचा आग्रह होता, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
भाजपने महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांना पुन्हा एकदा चकवा दिला राज्यसभेसाठी दोन सरप्राईज नावे आणून भाजपच्या श्रेष्ठींनी मराठी माध्यमवीरांना पुन्हा एकदा तोंडावर पाडले.
इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी विविध यंत्रणांच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी आपल्या पातळीवर विशेष प्रयत्न सुरू केलेत.
शरद पवारांची राज्यसभा खासदारकी; सुप्रिया सुळे, जयंत पाटील मातोश्रीच्या दारापाशी!!, अशी राजकीय घडामोड रात्री घडली. शरद पवारांना राज्यसभेचे खासदारकी द्या, अशी मागणी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्री बंगल्यावर जाऊन करावी लागली. पण उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना लगेच सकारात्मक प्रतिसाद दिल्याची अधिकृत बातमी नाही. उलट काँग्रेसने शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, तर विचार करता येईल, असे उत्तर त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्याचे बातम्यांमधून दिसून आले.
धुळवडीच्या सणानिमित्त प्रथेप्रमाणे आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला रंग लावून विनम्रपणे अभिवादन केले. पण एकनाथ शिंदे यांनीही धुळवड साधेपणाने साजरी केली.
भाजपने आज सहा राज्यांमधल्या राज्यसभेच्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली, पण महाराष्ट्रातल्या 6 उमेदवारांच्या नावाबद्दल मात्र सस्पेन्स कायम ठेवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची बिहार मधून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली.
मुंबई महापालिकेत महायुती सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा देत मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे युतीने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता मानली जात असून, नव्या महापौरांच्या माध्यमातून मुंबईकरांना ही मोठी भेट मिळाली आहे.
दुबईत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घातले लक्ष, जारी केला व्हॉटसॲप नंबर
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय अजित पवार यांनी एक भावनिक आणि संतप्त पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे, असे म्हणत त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य वैमानिकाच्या आसनावर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत असल्याचा दावा केला आहे. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. 2024 मधील कृषी विभागाच्या खरेदी-विक्री व्यवहारांशी संबंधित या प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2025 मध्येच मुंडे यांना क्लीन चिट दिली होती. या कोणत्याही व्यवहारांमध्ये धनंजय मुंडे यांचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांना या आरोपातून मुक्त केले होते.
पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमधील ‘डी-झोन’ भागात असलेल्या भघेरिया केमिकल्स (पूर्वीचे झेनित केमिकल्स) या कंपनीत आज दुपारी 2 च्या सुमारास भीषण वायू गळतीची घटना घडली. ओलियम वायूची ही गळती इतकी तीव्र होती की, तिचे पडसाद सुमारे दीड किलोमीटर परिसरापर्यंत उमटले आहेत. या वायू गळतीमुळे परिसरातील कामगार आणि स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, अनेकांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ अशा शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परळी हादरून गेली होती. त्या दिवसापासून मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीला या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लावले गेले; मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा ठाम आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत असून तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार असल्याने जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार निवृत्त होत असल्याने ही जागा आपल्याकडेच राहावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आग्रह आहे
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट केला. ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज घडली. काँग्रेसने महाराष्ट्रातल्या राज्यसभा जागेवर आपला अधिकार सांगितला. त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची ऑफर दिली. पण त्यामुळे शरद पवारांचा राज्यसभेत जाण्याचा मनसूबा काँग्रेसने परस्पर उधळून लावला.
अमेरिका आणि इजरायल यांनी इराणवर हल्ला करून इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनी याला संपविल्यानंतर तिथे इस्लामिक राजवट बदलायची नांदी झाली
महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी “एकमेव” उमेदवार शरद पवार असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांना अखेर त्यांना इतर उमेदवारांच्या स्पर्धेत आज उभे करावे लागले.
राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली आणि थेट घरपोच मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली मंडळ, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली.
विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना (कामकाज क्र. ४) अंतर्गत मा. प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील व्यावसायिक अवैध बांगलादेशी घुसखोरीच्या वाढत्या प्रश्नाबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या विषयावर शून्यसहिष्णुतेची भूमिका घेत आक्रमक कारवाई सुरू केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App