गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती पेशाने डॉक्टर होती. इतरांचे प्राण वाचवणारी होती. स्वतःचं आयुष्य संपवेल असं कधी वाटलं नव्हतं. तिने आत्महत्या केली नाही तर ही तिची हत्याच आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.
जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले. त्याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
छत्रपती संभाजीनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्य करणारी कल्पना भागवत (वय 45) नावाची महिला अचानक पोलिस, एटीएस (Anti-Terror Squad) आणि आयबी (Intelligence Bureau) यांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.
ज्या जिल्ह्यातून पवार नेहमी टाकतात “डाव”; त्याच जिल्ह्यात तुतारीतून आवाज येत नाय; जिल्ह्यातल्या चार आमदारांनी मोडली तुतारी!!, अशी अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यात झाली.
पार्थ अजित पवारच्या जमीन घोटाळ्यात आत्तापर्यंत काँग्रेस सकट अनेक विरोधकांनी अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता, पण मनसे त्यापासून अलिप्त होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परस्पर अनावरण करण्याच्या प्रकरणात अमित ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी केस केली त्याबरोबर मनसेने फणा काढला आणि पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
महाराष्ट्रातल्या नगरपंचायती, नगरपरिषदांच्या काही निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना लोकशाही टिकण्याविषयी चिंता वाटायला लागली. त्यांनी पत्रकार परिषदांमधून आणि सोशल मीडिया पोस्ट मधून ती चिंता जाहीरपणे व्यक्त केली.
बारामती आणि माळेगाव या नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारापासून अजून तरी सुप्रिया सुळे दूर आहेत कारण इथेही शरद पवारांनी Game केली आहे.
अजित पवारांनी बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार उमेदवारांना 20 – 20 लाख रुपये देऊन त्यांना माघार घ्यायला लावली.
२६/११ च्या हल्ल्याच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित “ग्लोबल पीस ऑनर्स २०२५” कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. ते म्हणाले, “पाकिस्तानला माहित आहे की ते थेट युद्धात भारताला हरवू शकत नाहीत, म्हणून त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि दिल्ली बॉम्बस्फोट घडवून आणले.”
भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच, 7 फेब्रुवारी रोजी अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणालेत की, मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदार यांद्यावर विशेष लक्ष असू द्या. मतदार याद्या तपासून पाहा. मतदार खरा की खोटा? हे तपासून पाहा. रात्र वैऱ्याची आहे… त्यामुळे गाफील राहू नका, आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष असू द्या.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ शरद पवारांच्या कुटुंबात नगरपरिषदा निवडणुकीवरूनही संघर्ष उडाला.
शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी; काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!, हे राजकीय चित्र लवकरच दिसून येणार असून स्वतः शरद पवारांनीच या बातमीला वेगळ्या पद्धतीने कन्फर्मेशन दिले.
एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात भाजपने स्वबळाचा असा काही तडाखा दिलाय, की त्यामुळे अजितदादांना शरद पवारांचा पक्ष फोडावा लागला. उमेदवार आयात करावे लागले आणि आपल्या पारंपरिक विरोधकांशी तडजोड करावी लागली
काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
डहाणू नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही योजना म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. मी एकदा कमिटमेंट केली तर स्वतःचीही ऐकत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या योजना आणि नेतृत्वावर जनतेचा विश्वास टिकून असल्याचा दावा केला. डहाणूतील प्रचारसभेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले.
मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील जागावाटपाच्या चर्चेला राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या शनिवारच्या बैठकीतून अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली.
भाजपशी मतभेद झाल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाज घटकांशी स्वतंत्र संवाद ठेवला असून शिवसेना वेगवेगळ्या समाज घटकांचे मेळावे आयोजित करून आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे.
शिवसेना पक्षाच्या वतीने डहाणू नगर परिषदेच्या प्रचारासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचारभेत बोलताना डहाणूवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. या सभेला डाहाणूकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा रंगत आहेत. महाविकास आघाडीतून वेगळे पडलेल्या मुद्द्यांना आज पुन्हा नवी दिशा मिळू लागली आहे. काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना मनसेची साथ सोडून पुन्हा काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसला विश्वासात न घेता मनसेसोबत संपर्क वाढवल्याने काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप पूर्णपणे निवळलेली नाही. त्यामुळेच काँग्रेसने एकला चलो रेची तयारी सुरू केली होती. मात्र आता पुन्हा उद्धव ठाकरेंशी संवादाचे दरवाजे उघडण्याची तयारी दिसत आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) या गटाखाली दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेबाबत दाखल याचिकेवर आज सविस्तर सुनावणी झाली. महाराष्ट्रासह सर्वच स्तरांवर या प्रश्नावर मोठी चर्चा सुरू असताना, न्यायालयातील आजची प्रक्रिया विशेष लक्षवेधी ठरली.
मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मनसेला स्वीकारण्यासाठी काँग्रेसवर दबाव; त्या पक्षाचे “स्वबळ” खच्ची करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांनी वेगवेगळे महाराजांनी खेळला डाव!!, असे राजकारण आज मुंबईत दिसून आले.
राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत खून किंवा अत्याचारामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या एका वारसास ९० दिवसांत गट-क किंवा गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय नोकरी देण्याची कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे. तब्बल ९ वर्षे प्रलंबित ८८९ प्रकरणांत या निर्णयामुळे नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन ‘महसूल मुक्त’ आणि ‘सारा माफी’ने मोफत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट होईल आणि सामान्य कामगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App