महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही घडामोड अत्यंत लाभदायक ठरणार आहे, असे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याबाबत अनिवार्य हा शब्द मागे घेण्यात आला आहे, परंतु सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारला सत्तेच्या वाट्यातला तुकडा म्हणून शरद पवारांनी परतीचा दोर कापला. ही राजकीय वस्तुस्थिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आली.
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कृषीसाठी AI धोरण मंजूर करण्यात आले. सोबतच आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली. इतकेच नाही तर ह्यात आता जोडीदारालाही मानधन मिळेल. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पातील कंपनीला भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्यामुळे शरद पवार आता भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये सामील होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी ब्रेक लावला आहे. संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणासोबतही युती करा, मात्र भारतीय जनता पक्षासोबत नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या मंत्रिमंडळ बैठकीची सुरुवात अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर राज्यातील पावसाळी परिस्थितीचा आणि खरीप हंगामातील पेरणी प्रगतीचा आढावा घेण्यात आला
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा थंडावली आहे. मात्र उद्धव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे. मनसेसोबत आल्यावर इज्जत वाचेल अस त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.
दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??, म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!, असे चित्र आज पिंपरी चिंचवड मधून समोर आले. सध्याच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस केव्हाही एकत्र येऊ शकतात
देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे महायुतीमध्ये असते तर आत्ता राष्ट्रपती झाले असते, असे वक्तव्य रामदास आठवलेंनी परत करून शरद पवारांच्या जुन्या जखमांवरल्या खपल्या पुन्हा एकदा काढल्या.
महाराष्ट्रात भाजपचे स्वबळ वाढवण्यासाठी फिल्टर न लावता अनेकांना पक्षात प्रवेश देण्यात येतोय, पण महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी उमेदवारी देताना मात्र चाळणी लागणार का??, असा सवाल तयार झालाय.
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. मागील 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विधानसभेत परिवर्तन केले, तसे महापालिकेत करावे लागेल, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पदावरील आपला हट्ट सोडला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामे मार्गी लागणे महत्वाचे आहे. त्यासाठी पालकमंत्रिपद हवेच असे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर ही टोलमाफी देण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मनोर, पालघर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फारच प्रतिष्ठेची केल्यानंतर तिच्यात चुरस निर्माण झाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे आव्हान अजितदादांना जड वाटायला लागले.
गुंठामंत्री आणि हुंडाबळी यामुळे मुळशी नावाचे गाव फार बदनाम झाले. जमिनीतले घोटाळे आणि गैरव्यवहार म्हणजे “मुळशी पॅटर्न”, जमीन हडपण्यासाठी आणि हुंड्यासाठी बळी घेणे म्हणजे “मुळशी पॅटर्न”, अशी नवी व्याख्या रुजली.
मावळमधील कुंडमाळा गावाजवळ मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, यातील 38 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली.
जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, साडेतीन वाजता अशी दुर्घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही सक्रिय झालो असून तेव्हापासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. तर आतापर्यंत 38 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेला लागून असलेल्या कुंडमाळा परिसरात रविवारी एक जुना लोखंडी पूल कोसळला. हा पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता, जिथे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूल कोसळला. हा पूल अनेक महिन्यांपासून वाहनांसाठी बंद होता
वयाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रराव तावरेंवर टीका केली, पण त्याआधी त्यांनीच चंद्ररावांच्या नाकदुऱ्या काढल्या होत्या ही वस्तुस्थिती समोर आली.
चिंचवड भागात आज (१५ जून) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल नदीत कोसळला, ज्यामुळे अनेकजण वाहून गेले आहेत.
महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत, महाविकास आघाडी होवो किंवा न होवो उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचे 300 चे गणित मांडून शाखाप्रमुख यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कामाला लावले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार आणि खासदार यांच्यात एकमेकांमध्ये नाही पायपोस; पण जयंत पाटील म्हणाले मुंबईत भाजपला आणखी लोकांची गरज!!, असला प्रकार समोर आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App