• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज; दहावा उमेदवार उतरवण्याची रणनीती

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह वाढत असतानाच, शिंदे गटाकडून मोठा राजकीय डाव टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी दहावा उमेदवार उभा करण्याचे संकेत दिल्याने या निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

    Read more

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक व असंवदेनशील कृत्य आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

    येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीने मंजुरी दिल्यानंतर, पाच मुख्य जागांसाठी आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव आणि अहिल्यानगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

    Read more

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!

    विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप निकाल एका झटक्यात पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त एक जागा येणार आहे, पण त्या जागेवरच उमेदवार ठरवताना सुद्धा राष्ट्रवादीची दमछाक झाली आहे.

    Read more

    जालना-नांदेड महामार्गाचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया येणाऱ्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

    Read more

    पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांची बाजी; महिला आणि पुरुषांनी जिंकली जनरल चॅम्पिअनशिप

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ’36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026′ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी बाजी मारली.

    Read more

    सुनेत्रा पवारच गैरहजर; मग मोदी बागेतले स्नेहभोजन पवार कुटुंबांमधल्या मतभेदांच्या भेगा बुजवू शकेल का??

    सुनेत्रा पवारच गैरहजर; मग मोदी बागेतले स्नेहभोजन पवार कुटुंबांमधल्या मतभेदांच्या भेगा बुजवू शकेल का??, असे विचारायची वेळ शरद पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमापूर्वी आली.

    Read more

    Sadavarte : परिवहन खातं पंक्चर झालं का? गुणरत्न सदवार्तेंचा प्रताप सरनाईकांसह राज ठाकरेंवर निशाणा

    मुंबईतील रिक्षाचालकांसाठी 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला असून, रिक्षाचालकांना तयारीसाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज ठाकरे यांना या मुदतवाढीवरून उपरोधिकपणे डिवचले आहे.

    Read more

    त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे पिंपरीत भूमिपूजन; आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या लढ्याला यश!!

    पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रस्तावित जागेत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे आज भूमिपूजन करण्यात आले.

    Read more

    अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचा विकास, पर्यटन आणि वारसा संवर्धनाला चालना; 681 कोटी रुपयांची तरतूद

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, चौंडी (अहिल्यानगर) येथील जतन आणि संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात बैठक संपन्न झाली.

    Read more

    महा-चतुर AI चॅटबॉट कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेसाठी नवे व्यासपीठ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महा-चतुर AI चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले.

    Read more

    Raghav Chadha : राघव चड्ढा म्हणाले- ‘आप’ काही भ्रष्ट-कॉम्प्रमाइज्ड लोकांचा पक्ष बनला; वैयक्तिक फायद्यासाठी काम करताहेत

    आम आदमी पक्ष (AAP) सोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिला व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा म्हणाले की, AAP मध्ये विषारी कामाचे वातावरण (टॉक्सिक वर्क एन्व्हायर्नमेंट) निर्माण झाले होते. काम करण्यापासून आणि बोलण्यापासून रोखले जात होते. हा पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या लोकांच्या हातात अडकून राहिला आहे. हे लोक वैयक्तिक फायद्यासाठी काम करतात.

    Read more

    Nashik TCS : नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:आरोपी निदा खानच्या जामिनावर 2 मे रोजी निकाल; न्यायालयात सुनावणी पूर्ण

    नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आपला निकाल राखून ठेवला असून, तो 2 मे रोजी दिला जाईल असे म्हटले आहे. ज्या 8 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यांपैकी निदा खान एक आहे.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- ादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा, शिवप्रेमी मोठ्या मनाने माफ करतील

    नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे. यावर आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात; पुणे स्थानकाजवळ रेल्वे डबा रुळावरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही

    पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

    Read more

    Pratap Sarnaik : मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम; पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत

    राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणालेत. सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

    Read more

    TCS corporate Jihad : माजी खासदार इम्तियाज जलील निदा खान आणि तिच्या कुटुंबाच्या भेटीला; तरीही फरार निदा पोलिसांना सापडेना!!

    नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली, त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून ती तिच्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.

    Read more

    TCS corporate Jihad : मालेगावात धर्मांतराचे रॅकेट, निदा खानच्या सुनावणी दरम्यान तपासात धक्कादायक वास्तव समोर!!

    नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून मी तुझ्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडत आहे. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.

    Read more

    ममतांच्या प्रचारासाठी फक्त केजरीवाल; बाकीचे प्रादेशिक नेते गपगार!!

    पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत ममता बॅनर्जींनी अक्षरशः एकाकी प्रचार केला.

    Read more

    Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही; कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो- धीरेंद्र शास्त्री

    नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे.

    Read more

    Kalpanaraje Bhonsle : मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकणे धोक्याची घंटा, NCERTच्या निर्णयावर कल्पनाराजे भोसलेंचा संताप

    राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे ही धोक्याची घंटा असून, हे असेच चालत राहिले तर भविष्यात शिवरायांच्या इतिहासावर पडदा पाडण्याचा प्रयत्न होईल,” अशी भीती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

    Read more

    Pratap Sarnaik : ‘व्यावहारिक मराठी’वरून टक्कर; सरकार–रिक्षा-टॅक्सी संघटनांची आज निर्णायक बैठक; 2 मेपासून परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव

    राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सरकार आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक होणार असून, यातून तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी; म्हणाले – ‘हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार’, 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा चमत्कार असल्याचे सांगत राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

    Read more

    Sambhaji Chhatrapati : धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती; छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

    बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केले पाहिजे,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

    Read more

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल, यात शंका नाही; राम मंदिर बांधण्याबाबतही लोकांना शंका होती, त्याचप्रमाणे हे ध्येयही आता निश्चित

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल आणि यावर कोणालाही शंका नसावी. ते म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा लोक अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्मितीबद्दल संशयात होते. ते याला अशक्य मानत होते.

    Read more