पद्मसिंह पाटलांच्या सत्काराची अफवा; राणा जगजीत सिंहांचे स्पष्टीकरण काय??
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला. न्यायालयाने त्या खटल्यातून पद्मसिंह पाटील आणि अन्य आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सोडले. त्यामुळे बरेच राजकारण घडले.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला. न्यायालयाने त्या खटल्यातून पद्मसिंह पाटील आणि अन्य आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सोडले. त्यामुळे बरेच राजकारण घडले.
गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातील एका न्यायालयाने आम आदमी पार्टी (आप) चे आमदार चैतर वसावा, त्यांची पत्नी आणि इतर 7 जणांना 7-7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण आणि खंडणी मागितल्याचा आरोप होता.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने मंगळवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग चौथ्या दिवशी आपले धरणे-प्रदर्शन सुरू ठेवले. यावेळी दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दहशतवाद्यांची B टीम असल्याच्या विधानाला उत्तर दिले.
उत्तर प्रदेशात मुसलमान मुख्यमंत्री करण्यासाठी अखिलेश यादवांवर दबाव; जातीय समीकरणांच्या आकड्यांचे फेकले “गौडबंगाल”!!, असे राजकीय चित्र समोर आले.
श्री सद्गुरू कृपेनें रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान होणारे श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा(चादर विधी) शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी अभिजित मुहूर्तावर संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत समितीने आज पत्रकार परिषदेत दिली. हा सोहळा महंत श्री भक्तीचरणदासजी महाराज, विरक्त साधू समाज नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध मठांचे साधू – महंत या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
Telegram is back on the Google Play Store in India after a 7-day temporary ban under Section 69A of the IT Act was lifted following the completion of the NEET-UG re-examination.
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत म्हटले की, चेंगलपट्टू न्यायालयात एक पत्नी आपल्या पतीला शोधत आहे.
इराणला युद्ध थांबवण्यासाठी तयार करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी ऑफर दिली आहे. स्वित्झर्लंडमध्ये सोमवारी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी इराणवरील निर्बंध हटवून जगभरात तेल विक्रीस मंजुरी दिली आहे. व्हेन्स म्हणाले, इराणद्वारे होर्मुझ उघडण्याच्या व त्यांच्या अणू केंद्रांच्या तपासणीस परवानगी देण्याच्या बदल्यात ही ऑफर दिली. ग्लोबल ऑइल ट्रॅकरच्या माहितीनुसार इराण आता दररोज सुमारे २० लाख बॅरल तेल विकू शकणार आहे.
युरोपमधील २६ देश उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहेत. फ्रान्स, स्पेन, ब्रिटनसह १५ देशांमध्ये उष्णतेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापैकी बहुतेक देशांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोहोचण्याच्या जवळ आहे.
सगळीकडून फटके मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर सुधारले. विधानसभेत दिलगिरी व्यक्त करते झाले!!
नीती आयोगाने मंगळवारी औषध उद्योग आणि जागतिक व्यापारावरील आपला ट्रेड वॉच क्वार्टरली अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार, भारत औषधांच्या कच्च्या मालासाठी 65% पर्यंत चीनवर अवलंबून आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज कायदेशीर वादात सापडले आहेत. बंगळुरू न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण कथितरित्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे बाळगण्याशी संबंधित आहे. त्यांच्या न्यायालयात हजर न राहिल्यानंतर न्यायालयाने हे पाऊल उचलले.
द्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यात बरेच राजकारण घडले, पण राष्ट्रवादीतले अस्तनीततले निखारे कधी विझवणार??, असा सवाल आज विधानसभेतल्या एका भाषणामुळे आला.
अदानी समूहाने विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पे गाठले. त्यांनी गुंतवणुकीचे विक्रम केले आणि देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घातली. यासंदर्भात अदानी समूहाच्या २०२६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सविस्तर माहिती दिली.
विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. ही बैठक महत्त्वाची आहे, कारण एक दिवस अगोदर दोन घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. मंगळवारी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राज्यसभा कार्यकाळ संपला होता आणि भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही.
पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न काढता याला मूक संमती दिली,” अशी टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या ९ ठिकाणांवर छापे टाकले. सेबीकडून सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर कंपनीवरील पाळत वाढली आहे.
भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखून त्यांची जमीन कोरडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी रोखल्याने पाकचे कंबरडे मोडले आहे.
धानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत
इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडासारखेच एक प्रकरण पुण्यात समोर आले आहे. ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.
कतारमधील सर्वात मोठ्या रास लाफान एलएनजी कॉम्प्लेक्समध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ६६ लोक जखमी झाले आहेत.
कुठलेही युद्ध जसे मानवाला हानी पोहोचवते तसेच ते नवनिर्माणाच्या संधी सुद्धा निर्माण करते. असेच इराण विरुद्ध अमेरिका या युद्धात सुद्धा झाले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे संपूर्ण जग इंधन टंचाईच्या विळख्यात लोटले गेले. भारतावर आर्थिक दुष्परिणाम झाला. भारतावर इंधन टंचाईचे वादळ घोंगावले. सर्वसामान्य भारतीयांना इंधन टंचाई बरोबरच महागाईला सामोरे जावे लागले. त्यातून रोजगाराच्या समस्या देखील उद्भवल्या. बचतीचे नवे मार्ग अवलंबायला लागले.
जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsAppच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. मेटाने (Meta) WhatsAppचे विद्यमान प्रमुख Will Cathcart यांच्याकडून जबाबदारी काढून भारतातील प्रसिद्ध फिनटेक उद्योजक Kunal Shah यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मेटाने कुणाल शाह यांच्या CRED या कंपनीत तब्बल 900 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 8,500 कोटी रुपये) गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
लखनऊ कोचिंग अग्निकांडात 15 लोकांचा बळी गेला. मरण पावलेल्यांमध्ये बहुतेक विद्यार्थी होते. हे लोक गेमिंग आणि ॲनिमेशन शिकण्यासाठी येत होते. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी सर्व विद्यार्थी दुपारच्या जेवणानंतर वर्गात होते. प्राथमिक तपासणीत असे समोर आले आहे की, इमारतीतून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग होता.
द्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यात बरेच राजकारण घडले, पण राष्ट्रवादीतले अस्तनीततले निखारे कधी विझवणार??, असा सवाल आज विधानसभेतल्या एका भाषणामुळे आला.
पश्चिम बंगाल मध्ये झालेली चूक काँग्रेस सुधारणार का??; उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आघाडी करणार का??, असे दोन सवाल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यामुळे आज समोर आले.
शिवसेनेच्या परिवारामध्ये ६ नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेतून फुटून आलेल्या खासदारांना दिला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिक मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पराभव झाला. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पाडला.
विधान परिषद निवडणुकांचा निकाल समोर आला. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीत मिठाचा खडा पडला. त्यामुळे विजयी अपक्ष उमेदवार गोकूळ गीते यांच्यावर माफी मागायची वेळ आली.
ओमराजे निंबाळकर म्हणे, दोन दिवसांनी निर्णय जाहीर करतील. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार हे ते स्वतःच धाराशिव मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगतील. पण ओमराजे निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेल्या वक्तव्यात त्यांच्या निर्णयाचे “रहस्य” दडलेय. किंबहुना ते “रहस्य” सुद्धा नाही, तर ते उघड “राजकीय सत्य” बोलून गेलेत!!
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागला आणि काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना आणि भाजप यांच्या गळ्यात येऊन पडले!! पवनराजेंची हत्या झाली 2006 मध्ये. त्यावेळी महाराष्ट्रात राज्य होते
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला आणि पद्मसिंह पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!! त्यामुळे पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदाचा शब्द कुणी दिला होता आणि कुणी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले??,
कोल्हापुरात येऊन अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!, ही राजकीय घडामोड आज कोल्हापुरात घडली.