• Download App
    The Focus India

    Latest News

    Punjab Police : पंजाबला हादरवण्याचा कट उधळला; जालंधरमध्ये आयएसआय-समर्थित बीकेआयचा दहशतवादी अटक; 1.3 किलो आयईडीही जप्त

    पंजाब पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI द्वारे चालवल्या जाणाऱ्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादाच्या नेटवर्कविरोधात कारवाई करत, काउंटर इंटेलिजन्स जालंधर आणि जालंधर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे.

    Read more

    संसदेतली कोंडी संपायची उद्या शक्यता; परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलणार राहुल + प्रियांका!!

    नीट परीक्षेतली पेपर फुटी आणि त्यानंतर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे काँग्रेस सह सर्व विरोधकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी संसदेची कोंडी केली होती. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कामकाज होऊ दिले नव्हते. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर संसदेतील कोंडी फुटायची शक्यता निर्माण झाली असून केंद्र सरकारने मांडलेल्या परीक्षा सुधारणा विधेयकावर उद्यापासून संसदेत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Siddaramaiah : सिद्धारामय्यांची घोषणा- 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही; म्हणाले- राजकारण भ्रष्ट झाले; दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपद सोडले होते

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे की, ते 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. मात्र, ते राजकारणात सक्रिय राहतील आणि जनतेचे प्रश्न मांडत राहतील. त्यांनी शनिवारी मंड्या जिल्ह्यातील के.आर. पेट येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की, राजकारण आता पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे आणि प्रामाणिक राजकारणासाठी जागा राहिलेली नाही.

    Read more

    Hormuz : होर्मुझमध्ये तेलवाहू जहाजाची सागरी सुरुंगाला धडक; जहाजाला आग, युद्ध सुरू झाल्यापासून पहिला अपघात

    होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका तेलवाहू जहाजाने सागरी सुरुंगाला धडक दिल्याने आग लागली. इराणची वृत्तसंस्था तस्निमच्या वृत्तानुसार, तेहरानने निश्चित केलेल्या सागरी मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने प्रवास करत असताना त्या जहाजाने सुरुंगाला धडक दिली.

    Read more

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले-भारत इनोव्हेशनचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे; अडथळे निर्माण केल्यास सैन्य सज्ज

    कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापनदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारत नवनवीन कल्पनांचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे मार्ग शोधत आहे. भारत जहाजे डिझाइन करत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी डिझाइनमध्ये गुंतलेला आहे. भारत स्टार्टअप इकोसिस्टम उभारत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी इकोसिस्टम उभारत आहे. भारत सेमीकंडक्टर बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती हल्लेखोर तयार करत आहे.

    Read more

    माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचे संसदेत जोरदार स्वागत; विरोधकांना झोंबल्या मिरच्या!!

    केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान आज पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. संसद भवनात प्रवेश करताच भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे घोषणाबाजी करत उत्साहात स्वागत केले.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले-आंदोलकांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला; शहांना पत्र लिहिले; CJP ची सूचना- पेपरफुटीमध्ये 10 वर्षांची शिक्षा व्हावी

    राहुल गांधींनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सांगितले की, 20 जुलै रोजी झालेल्या CJP च्या संसद मार्चदरम्यान पोलिसांनी जाणूनबुजून लोकांना लक्ष्य केले आणि पॅलेट गनने हल्ला केला. यामुळे 19 वर्षांच्या साहिल लोचबची डोळ्यांची दृष्टी गेली.

    Read more

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाले असून, या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर आता एक नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला असला तरी, भविष्यात या पदावर खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते का, या सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला थेट ‘घरचा आहेर’ दिला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर देशात लाठीचार्ज अन् संतापाची लाट पसरली नसती,” अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली.

    Read more

    Mohan Bhagwat : लिव्ह-इन रिलेशनशिपवर सरसंघचालक भागवत म्हणाले – यात कोणतीही जबाबदारी नसते, विवाह जीवनात शिस्त आणतो

    सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, विवाह जीवनात शिस्त आणतो आणि धर्म व जबाबदारीची भावना निर्माण करतो. याउलट, लिव्ह-इन संबंधांमध्ये लोक जबाबदारीपासून पळ काढत केवळ सुख शोधतात.

    Read more

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली

    नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य ‘तिरंगा रॅली’ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संपूर्ण आंदोलनावर आणि ठाकरे बंधूंवर कडाडून टीका केली आहे.

    Read more

    Jayant Patil : धर्मेंद्र प्रधानांच्या नेतृत्वाखाली मराठा इतिहासाशी छेडछाड; हा राजीनामा मराठ्यांचा इतिहास पुसणाऱ्यांना धडा, जयंत पाटलांची टीका

    नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी या राजीनाम्याचे स्वागत करत तो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, प्रधान यांच्या कार्यकाळात एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच प्रधानांचा राजीनामा मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धडा असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

    Read more

    CJP, E20 जनता पार्टीच्या बरोबरीने RHA चा पण उदय, तब्बल 39 लाख फॉलोवर्स!!; RHA म्हणजे काय??, त्या आंदोलनाचा हेतू काय??; वाचा सविस्तर!!

    कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर यशस्वी झाल्याचे मानले गेले. त्या पाठोपाठ E20 जनता पार्टीचा सुद्धा उदय झाला.

    Read more

    Eknath Shinde : राहुल गांधींना पंतप्रधान निवासावर घातपात घडवायचा होता; महाराष्ट्राने नाकारलेले लोक दिल्लीत जाऊन आगीत तेल ओतत होते – एकनाथ शिंदे

    नीट’ परीक्षा घोटाळा ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ कठोर पावले उचलली आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी उद्या संसदेत नवा कायदा मांडला जाणार असून, त्यात १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद असणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे मूळतः अराजकीय होते; मात्र राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील पराभूत नेत्यांनी देशात बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखी अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनाचा राजकीय वापर केला, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

    Read more

    E20 janata party : मोदींना हरवू आणि हलवू शकत नाही म्हणून त्यांच्या विश्वासू मंत्र्यांवर हल्लाबोल!!

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर जेन झी च्या दंडात बेटकुळ्या फुटल्यानंतर जेन झी ने पुढचे टार्गेट ठेऊन वाटचाल चालू केली. त्यातूनच E20 janata party प्रसवली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट करणे चालू केले.

    Read more

    PM Modi : मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणणार; परीक्षा सुधारणांसाठी हायपॉवर टास्क फोर्स स्थापन, इन्फोसिसचे नीलेकणी होणार अध्यक्ष

    पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. मोदी म्हणाले – मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला, ते तुरुंगात सडत आहेत.

    Read more

    Finance Minister : अर्थमंत्री म्हणाल्या- आयटी विभागाने सामान्य लोकांना त्रास देऊ नये; आपल्या ताकदीने घाबरवू नका; जनतेच्या भल्यासाठी काम करा

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाला सामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सामान्य लोकांना त्यांच्या कामासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नका.

    Read more

    Supreme Court : संसद मार्चमध्ये पोलिसांच्या कारवाईविरोधात सोमवारी सुनावणी; सुप्रीम कोर्टात 2 याचिका दाखल; पोलिसांवर अवाजवी बळाचा वापर केल्याचा आरोप

    सर्वोच्च न्यायालय सोमवारी दोन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. या याचिकांमध्ये आरोप आहे की, NEET पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अत्याचार केले. या याचिका २० जुलैच्या संसद मार्चशी संबंधित आहेत, जो कॉकरोच जनता पार्टीने आयोजित केला होता.

    Read more

    Devendra Fadnavis : ‘मी महाराष्ट्रातच राहणार!’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम

    शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे, फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. गेल्या महिन्याभरापासून, विशेषतः उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून आणि सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांमुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. मात्र, या सर्व तर्क-वितर्कांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णविराम लावला असून, “मी सध्या मुंबईतच असून यापुढेही महाराष्ट्रातच राहणार आहे,” असे स्पष्ट करत केंद्रात जाण्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

    Read more

    Trump : ट्रम्प यांची इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्यापासून माघार; सल्लागारांचा इशारा, देशात इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता

    अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्याच्या आपला निर्णय तूर्त स्थगित केला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला होता की, मोठ्या प्रमाणावरील लष्करी कारवाईमुळे अमेरिकेच्या ‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने संपू शकतो.

    Read more

    मोदींचा व्हिडिओतून तिसऱ्यांदा थेट विद्यार्थ्यांशी संवाद; नंदन निलकेणींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ मधून तिसऱ्यांदा विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. नीट पेपर फुटी विरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी मोदींनी व्हिडिओ करून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला होता.

    Read more

    धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींची स्तुती; शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती आणि त्याच दिवशी शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!, या दोन समांतर राजकीय घडामोडी आज घडल्या.

    Read more

    TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांच्या बिहारमध्ये मुसक्या आवळल्या:8 हजारांचा पेपर फोडून दीड कोटीला विकण्याचा कट उधळला

    महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला त्याच्या एका साथीदारासह बिहारमधील पाटणा येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भिवंडी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही फिल्मी स्टाइल धाडसी कारवाई केली.

    Read more

    Pandharpur Ashadhi Ekadashi : पंढरपुरात सुरक्षेवर तैनात असलेल्या गंगाखेडच्या जवानाची आत्महत्या; शासकीय महापूजेच्या सुमारास सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

    आषाढी एकादशीच्या पावन पर्वणीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी जमा झालेली असतानाच एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रामेश्वर ध्रुपद साबणे (वय ३०, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे जीवनयात्रा संपवलेल्या जवानाचे नाव आहे.

    Read more

    Priyanka Praise : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर बॉलिवूडची प्रतिक्रिया; आलिया म्हणाली- जेन-झीने इतिहास घडवला; प्रियंकाने नवीन पिढीचे कौतुक केले

    शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगातील अनेक मोठ्या व्यक्तीमत्त्वे उघडपणे पुढे आली आहेत. आलिया भट्ट, शबाना आझमी, प्रकाश राज, प्रियंका चोप्रा, स्वरा भास्कर, तिलोत्तमा शोम, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, ईशान खट्टर, अभिषेक बॅनर्जी, वीर दास, समय रैना, विजय वर्मा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.