पुणे, पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना आबा बागुल मात्र शिंदे सेनेत!!
एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
शरीफ हादीच्या मृत्यूच्या निषेधार्थ इन्कलाब मंच आणि जमातच्या कट्टरपंथीयांनी बेनापोलपासून भारतीय सीमेपर्यंत मोर्चा काढला. त्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशकडे देण्याची मागणी केली. दरम्यान, चट्टोग्राममध्ये, कट्टरपंथीयांनी चंद्रनाथ मंदिराबाहेर धार्मिक घोषणा दिल्या. ढाक्यामधील प्रतिष्ठित ढाकेश्वरी मंदिराच्या संरक्षणासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. कट्टरपंथीयांनी ढाक्यामधील तोफखाना रोडवरील शिल्पी गोष्ठी सांस्कृतिक केंद्रालाही घेराव घालत घोषणाबाजी केली. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी हादीचा मृतदेह सिंगापूरहून ढाका येथे आणण्यात आला. युनूस सरकारने शनिवारी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. शनिवारी हादीवर अंत्यसंस्कार केले जातील.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवारी दुपारी वार्षिक ऑनलाइन पत्रकार परिषद सुरू झाली आहे. हा पुतिन यांचा 22वा वार्षिक संवाद आहे. यावेळी ते सामान्य नागरिक आणि माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. तसेच, 2025 मधील सरकारच्या कामकाजावर आणि देशाशी संबंधित मोठ्या मुद्द्यांवर ते आपले मत मांडत आहेत.
अमेरिकेने शुक्रवारी ग्रीन कार्ड लॉटरी किंवा डायव्हर्सिटी व्हिसा (DV1) कार्यक्रम रद्द केला आहे. याच्या माध्यमातून अमेरिकेत कमी प्रतिनिधित्व असलेल्या देशांतील लोकांना ग्रीन कार्ड दिले जात असे.
पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात CBI सध्या TMC खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी लोकपालने आरोपपत्र दाखल करण्यास दिलेली मंजुरी रद्द केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करणार नाही असे म्हणणाऱ्या भाजपने काही अंशी भूमिका बदलल्याची चिन्ह दिसत असून नबाब मालिकांच्या विषय बाजूला ठेवून महायुतीचे काम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचे समोर आ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी बंगालमधील ममता सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी X वर लिहिले – पश्चिम बंगालमधील लोकांना केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे, परंतु ते तृणमूल काँग्रेसच्या गैरव्यवस्थापनामुळे त्रस्त आहेत.
गेल्या 30 दिवसांत भारतात X (पूर्वीचे ट्विटर) वर सर्वाधिक लाईक केलेल्या 10 ट्वीट्सपैकी 8 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खात्यातून आहेत. यात तो फोटो देखील समाविष्ट आहे, ज्यात मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिल्ली विमानतळावरून एकाच गाडीतून जाताना दिसत आहेत. X च्या नवीन “सर्वाधिक लाईक केलेल्या” वैशिष्ट्यानुसार, टॉप 10 मध्ये इतर कोणत्याही राजकारण्याची कोणतीही पोस्ट समाविष्ट नाही. मोदींच्या आठ पोस्टना एकूण 1,60,700 रीपोस्ट आणि 14.76 लाख लाईक्स मिळाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन करून संवाद साधला.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडिओ पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरला आहे. त्यात चव्हाणांच्या दाव्याची री ओढत पाकने भारताला अर्ध्या तासातच पाणी पाजल्याचा दावा केला जात आहे. भाजपने पाक माध्यमांचा हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते बोलतात पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेसला पाकच्या मदतीची आशा, असे भाजपने म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते.
सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच पाच वर्षे आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला यावरूनच कळते कॉंग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्षनेता होणार म्हणून बसले होते. मात्र, बिचाऱ्यांचे दुर्दैव असल्याचा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख ‘दोन शून्यांची बेरीज’ असा केला आहे. युतीचा नारळ फुटण्यापूर्वीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील अशी सद्यस्थिती आहे, असा खोचक टोला लगावत शेलार यांनी या युतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीनशी संबंधित चौकशीच्या अंतर्गत शुक्रवारी रात्री अडीच वाजता (भारतीय वेळेनुसार) तीन लाख दस्तऐवज जारी केले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता ख्रिस टकर, ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यांसारख्या दिग्गजांची छायाचित्रे समोर आली आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी सट्टेबाजी प्रकरणात माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री नेहा शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून आता त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात त्यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘ऋषभायन 2’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यानिमित्त भरवलेल्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची नावे ब्राह्मी लिपीत लिहून मांडली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘ॲन्युअल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ पूजा पद्धती नसून एक जीवनदृष्टी, विचारपद्धती आणि व्यवस्थात्मक संस्कृती आहे, ज्यामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षे अखंड टिकून आहे. भारताचा सांस्कृतिक अभिमान हा दंतकथांवर नव्हे, तर ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहे. मात्र, या अभिमानाला आत्माभिमानाचे बळ देत आधुनिक काळात नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी नमूद केले.
: पाकिस्तानने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब काढल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिजाब काढणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, ‘टॅरिफ’ हा इंग्रजीतील त्यांचा आवडता शब्द आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, याच्या मदतीने त्यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या 10 महिन्यांत जगभरातील 8 युद्धे थांबवली.
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरण्याची भाषा करणाऱ्या शरद पवारांवर पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात स्व पक्ष विलीन करण्याची वेळ आली, ती सुद्धा अमित शहांच्या परवानगीने!! अशी राजकीय परिस्थिती शरद पवारांवर आज ओढवली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये कटुता दिसून येत आहे. दरम्यान गुरुवारी दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये हास्यविनोदाची चर्चा दिसून आली.
अभिनेता आणि तमिलगा वेत्री कझगम (TVK) प्रमुख विजय यांनी गुरुवारी सांगितले की, डीएमके आणि समस्या (Problems) चांगले मित्र असल्यासारखे आहेत, दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाहीत. आता ही लढाई चांगुलपणा आणि वाईटपणा यांच्यात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमानचा दुसरा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. त्यांना सुलतान हैथम बिन तारिक यांनी ऑर्डर ऑफ ओमानने सन्मानित केले आहे.यापूर्वी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी भारत आणि ओमान यांच्यात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘ॲन्युअल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ पूजा पद्धती नसून एक जीवनदृष्टी, विचारपद्धती आणि व्यवस्थात्मक संस्कृती आहे, ज्यामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षे अखंड टिकून आहे. भारताचा सांस्कृतिक अभिमान हा दंतकथांवर नव्हे, तर ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहे. मात्र, या अभिमानाला आत्माभिमानाचे बळ देत आधुनिक काळात नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरण्याची भाषा करणाऱ्या शरद पवारांवर पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात स्व पक्ष विलीन करण्याची वेळ आली, ती सुद्धा अमित शहांच्या परवानगीने!! अशी राजकीय परिस्थिती शरद पवारांवर आज ओढवली.
संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने अनेक बिले मांडली आणि ती पास करून घेतली तरीसुद्धा काँग्रेसच्या दृष्टीने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची वेगळीच फलश्रुती झाली.
ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खोडा; मुंबईत 22 जागांचा वाटा मागून घालणार कोलदंडा!!, अशी राजकीय खेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केल्याचे समोर आले.
भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले महत्त्वाचे योगदान मान्य होते, पण त्यांना भारतरत्न किताब द्यायला विरोध होता, याचा ढळढळीत पुरावा बाकी कुठून नव्हे, तर थेट Nehru archives मधूनच समोर आला.
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा आली, पण पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात तीच नैतिकता त्यांनी खुंटीला टांगून ठेवली.नाशिक मधले मुख्यमंत्री कोट्यातून चार फ्लॅट लाटल्ययाप्रकरणी माणिकराव कोकाटेंना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना ५०००० दंड ठोठावला. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. पोलिसांनी त्या अटक वॉरंट वर कायदेशीर कार्यवाही सुरू केली. त्यामुळे भाजपने माणिकरावांवर दबाव वाढविला. या राजकीय दबावातून त्यांना राजीनामा देणे भाग पडले. तो राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला. तो राजीनामा अजितदादांनी स्वतःकडे ठेवून घेतला होता.
पवार काका – पुतण्याच्या दोन राष्ट्रवादींच्या आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पाचर; पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये घातला अडसर!!, अशी राजकीय परिस्थिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली. भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाजूला काढून ठेवल्यानंतर पवार काका – पुतण्यांचे पक्ष एक आघाडी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवतील, अशी शक्यता निर्माण झाली. कारण दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांवर तसा दबाव आणला आणि आघाडी करण्याचा आग्रह धरला. याला अपवाद फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ठरले. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यास नकार दिला. पण पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींचे बाकीचे नेते आघाडीसाठी अनुकूलच राहिले.
लोकांची मते मिळवण्यासाठी “नैसर्गिक युती” आणि सत्ता भोगण्यासाठी “महायुती”!!, ही राजकीय दुटप्पी भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये समोर आली आहे.
चार घरे लाटणाऱ्या माणिकराव कोकाटेंना एक न्याय लावून त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्याच्या आधी त्यांची मंत्रिपदाची खाती काढून घेतली.