• Download App
    The Focus India

    Latest News

    ठाकरेंचे खासदार फोडले; पण राष्ट्रवादीतले अस्तनीतले निखारे कधी विझवणार??

    द्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यात बरेच राजकारण घडले, पण राष्ट्रवादीतले अस्तनीततले निखारे कधी विझवणार??, असा सवाल आज विधानसभेतल्या एका भाषणामुळे आला.

    Read more

    Adani Group ची गुंतवणूक नेमकी किती??, कशात??, पुढचे प्लॅन्स काय??; वाचा गौतम अदानींच्या शब्दांत!!

    अदानी समूहाने विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पे गाठले. त्यांनी गुंतवणुकीचे विक्रम केले आणि देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घातली. यासंदर्भात अदानी समूहाच्या २०२६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सविस्तर माहिती दिली.

    Read more

    Omraje Nimbalkar : खासदार निधीच्या आरोपांवर ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; मागील टर्मचा एकही पैसा अखर्चित नाही, आधी गणित समजून घ्या!

    विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली.

    Read more

    PM Modi : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, काल मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. ही बैठक महत्त्वाची आहे, कारण एक दिवस अगोदर दोन घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. मंगळवारी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राज्यसभा कार्यकाळ संपला होता आणि भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही.

    Read more

    Raj Thackeray : राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?

    पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न काढता याला मूक संमती दिली,” अशी टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

    Read more

    ED Raids : 15 लाख कोटींचा गैरव्यवहार:राजेश एक्सपोर्ट्सवर छापे, 9 ठिकाणी कारवाई, सेबीकडून निगराणी

    सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या ९ ठिकाणांवर छापे टाकले. सेबीकडून सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर कंपनीवरील पाळत वाढली आहे.

    Read more

    Indus water : सिंधू पाण्यावरून वाद; एलओसीवर पाकने 35 ड्रोन युनिट तैनात केले, एआय फेन्सिंग लावले, मुनीरकडून युद्धाचा कट

    भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखून त्यांची जमीन कोरडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी रोखल्याने पाकचे कंबरडे मोडले आहे.

    Read more

    Sana Malik : तिहेरी तलाक आणि UCC वरून विधानसभेत गदारोळ:सना मलिक म्हणाल्या- बहुपत्नीत्व केवळ मुस्लिम धर्मात नाही

    धानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत

    Read more

    Pune Fort Murder : पुण्यात सोनम रघुवंशीसारखे प्रकरण:तरुणीने प्रियकरासोबत मिळून भावी पतीला 400 फूट खोल दरीत ढकलले; नोव्हेंबरमध्ये होते लग्न

    इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडासारखेच एक प्रकरण पुण्यात समोर आले आहे. ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.

    Read more

    Qatar : कतारमधील सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; 13 जणांचा मृत्यू, यात अनेक भारतीयांचाही समावेश; 60 हून अधिक जखमी

    कतारमधील सर्वात मोठ्या रास लाफान एलएनजी कॉम्प्लेक्समध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ६६ लोक जखमी झाले आहेत.

    Read more

    इराण – अमेरिका युद्धाचा भारतावर दुष्परिणाम; पण त्याचबरोबर नव्या क्षेत्रांमध्ये झेप घ्यायची संधी; नवनिर्माणाच्या क्षेत्रात “चांदी”!!

    कुठलेही युद्ध जसे मानवाला हानी पोहोचवते तसेच ते नवनिर्माणाच्या संधी सुद्धा निर्माण करते. असेच इराण विरुद्ध अमेरिका या युद्धात सुद्धा झाले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे संपूर्ण जग इंधन टंचाईच्या विळख्यात लोटले गेले. भारतावर आर्थिक दुष्परिणाम झाला. भारतावर इंधन टंचाईचे वादळ घोंगावले. सर्वसामान्य भारतीयांना इंधन टंचाई बरोबरच महागाईला सामोरे जावे लागले. त्यातून रोजगाराच्या समस्या देखील उद्भवल्या. बचतीचे नवे मार्ग अवलंबायला लागले.

    Read more

    Kunal Shah : भारतीयाच्या हाती WhatsAppची धुरा! CREDचे संस्थापक कुणाल शाह बनणार नवे जागतिक प्रमुख; मेटाकडून 900 दशलक्ष डॉलर्सची मोठी गुंतवणूक

    जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsAppच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. मेटाने (Meta) WhatsAppचे विद्यमान प्रमुख Will Cathcart यांच्याकडून जबाबदारी काढून भारतातील प्रसिद्ध फिनटेक उद्योजक Kunal Shah यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मेटाने कुणाल शाह यांच्या CRED या कंपनीत तब्बल 900 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 8,500 कोटी रुपये) गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Lucknow : लखनऊमधील कोचिंगमध्ये ऑटोमॅटिक गेटमुळे 15 जणांचा मृत्यू; एकाच जिन्याने येण्या-जाण्याचा मार्ग; निवासी इमारतीला व्यावसायिक बनवले होते

    लखनऊ कोचिंग अग्निकांडात 15 लोकांचा बळी गेला. मरण पावलेल्यांमध्ये बहुतेक विद्यार्थी होते. हे लोक गेमिंग आणि ॲनिमेशन शिकण्यासाठी येत होते. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी सर्व विद्यार्थी दुपारच्या जेवणानंतर वर्गात होते. प्राथमिक तपासणीत असे समोर आले आहे की, इमारतीतून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग होता.

    Read more

    UAE : UAE, भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करू शकते; एअर डिफेन्स सिस्टिम आकाशतीरवरही चर्चा सुरू

    भारत आणि UAE दरम्यान संरक्षण क्षेत्रात नवीन चर्चा सुरू झाली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, UAE भारताची ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करू शकते. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे.

    Read more

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादीने दाखविले खायचे दात; भारतात कुराण लागू करायची सना मलिकांची मागणी; राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा!!

    महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आज खायचे दात दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी भारतात कुराण लागू करायची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी सना मलिक यांचे भाषण उचलून धरले.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल यांच्या स्कूबा डायव्हिंगवर 26 कोटी खर्चाचा दावा; काँग्रेसने म्हटले- ग्रेट निकोबार प्रकल्पावरून लक्ष विचलित करू इच्छितात

    काँग्रेस आणि भाजप यांच्यातील ग्रेट निकोबार प्रकल्पावरून सुरू असलेले राजकीय युद्ध आता राहुल गांधींच्या स्कूबा डायव्हिंगपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दावा केला की, राहुल गांधींच्या अंदमानमधील स्कूबा डायव्हिंगवर 26 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

    Read more

    Anna Hazare : माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन; नियम बदलल्याने अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

    माहितीचा अधिकार (RTI) हा शासनाने जनतेवर केलेला उपकार नसून तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, राज्य सरकारने १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेले ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ हे या कायद्याची धार बोथट करणारे आणि भ्रष्टाचाराला ढाल देणारे आहेत. प्रशासनातील ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आणि माहितीचा अधिकार वाचवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार नाही,” असा थेट आणि निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

    Read more

    Arup Roy : बंडखोरांचे ममता बॅनर्जींना सर्वात मोठे आव्हान; टीएमसीची समांतर कार्यसमिती स्थापन केली, अरूप रॉय अध्यक्ष

    विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये सुरू असलेला राजकीय विद्रोह तीव्र झाला आहे. सोमवारी बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी टीएमसीच्या समांतर कार्यसमितीची घोषणा केली. आमदार अरूप रॉय यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. याला ममता बॅनर्जींसमोरील आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे.

    Read more

    पश्चिम बंगाल मध्ये झालेली चूक काँग्रेस सुधारणार का??; उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आघाडी करणार का??

    पश्चिम बंगाल मध्ये झालेली चूक काँग्रेस सुधारणार का??; उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आघाडी करणार का??, असे दोन सवाल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यामुळे आज समोर आले.

    Read more

    ममता बॅनर्जींना बंडखोरांचा मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून डच्चू!!

    पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आधी दोन तृतीयांश पक्ष फोडला. विधानसभेतली विरोधी पक्षनेते पदाची कायदेशीर लढाई जिंकली आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला.

    Read more

    Rohit Pawar : कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल; 29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!

    राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, ही कर्जमाफी योजना पूर्णपणे फसवी आहे,” असा घणाघाती आरोप करत रोहित पवारांनी येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

    Read more

    Ramdas Kadam’ : सहा नव्हे सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार; रामदास कदम यांच्या विधानाने खळबळ, आमदारही फुटीच्या मार्गावर असल्याचा केला दावा

    शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे सहा खासदार आज अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सर्व खासदार सध्या मुंबईत दाखल झाले असून ते शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र या राजकीय घडामोडींदरम्यान शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी एक धक्कादायक खुलासा केला असून, त्यांच्या माहितीनुसार या प्रवेशासाठी केवळ सहा नव्हे, तर तब्बल सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

    Read more

    Vidhan Parishad Election Results: : विधान परिषदेत महायुतीचा महाविजय! महाविकास आघाडीचा धुव्वा; कुठे क्रॉस व्होटिंग तर कुठे बंडखोरीने फिरवली निवडणुकीची दिशा

    स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत राज्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र या निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंग, बंडखोरी, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणांनी निकालांवर मोठा प्रभाव टाकल्याचे दिसून आले.

    Read more

    Uddhav Thackeray : बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा; 27 जूनपासून पक्षबांधणीसाठी थेट मैदानात

    विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये सुरू असलेला राजकीय विद्रोह तीव्र झाला आहे. सोमवारी बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी टीएमसीच्या समांतर कार्यसमितीची घोषणा केली. आमदार अरूप रॉय यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. याला ममता बॅनर्जींसमोरील आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे.

    Read more

    Sanjay Dina Patil : त्यांना ताकदवर लोक नाही, गुलाम पाहिजे; संजय पाटलांची शिवसेना ठाकरे गटावर टीका; म्हणाले- एका व्यक्तीमुळे प्रॉब्लेम झाला

    मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण, त्यांचे नाव घेण्यास संजय पाटील यांनी टाळले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.