आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा मोठा फटका आता भारतीय जनजीवनाला बसू लागला आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत असतानाच, दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेतून देशाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून, अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी ‘संयम आणि बचतीचा’ मार्ग स्वीकारण्यास सांगितले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे. पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय ‘ते’ पाळावे,” असे आवाहन केले आहे.