एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.
राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही.
केरळमधील मलप्पुरम येथे जप्त करण्यात आलेल्या मोठ्या बेकायदेशीर स्फोटकसाठा प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई करत केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील १९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत स्फोटकांच्या पुरवठा साखळी, वाहतूक नेटवर्क आणि संबंधित व्यक्तींबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाच दिवसांत जवळपास 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्यात आली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या तपासात ही अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि कथित महाठग सुकेश चंद्रशेखर यांना २०० कोटी रुपयांच्या खंडणी व मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पाटियाला हाऊस न्यायालयाने जॅकलिन, सुकेश चंद्रशेखर आणि अन्य १५ आरोपींविरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या बहुचर्चित प्रकरणाच्या खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वन्यजीवांचे संरक्षण त्यांच्या नैसर्गिक किंवा सध्या ज्या सुरक्षित वातावरणात ते राहत आहेत त्या ठिकाणीच होणे आवश्यक आहे. कायदेशीर परवानगीनंतर सुरक्षित आश्रयस्थानी ठेवण्यात आलेल्या प्राण्यांना पुन्हा दुसरीकडे हलवणे हे त्यांच्यावरील क्रूरतेसमान ठरू शकते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असून, पहिल्या टप्प्यात भूमीपुत्र असणाऱ्या हिंदू समाजाला राष्ट्रीय बनवावे लागेल. त्यानंतर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही आम्हाला राष्ट्रीय बनवायचे आहे,” असे प्रतिपादन सामाजिक समरसता गतीविधीचे अखिल भारतीय मंडळ सदस्य रमेश पांडव यांनी केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे.
ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्य कोणत्याही नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. गरज पडल्यास ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ राबवण्यासही सेना तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्याकडे भारताच्या संरक्षण धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आता राज्याचे 24 वे मुख्यमंत्री बनतील. बंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. 28 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे सिद्धरामय्या यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.
पश्चिम बंगाल मध्ये हल्ल्यांची नौटंकी; अभिषेक बॅनर्जी यांच्या पाठोपाठ पुढे आले कल्याण बॅनर्जी!!, हेच राजकीय वास्तव आज पश्चिम बंगाल मधून पुन्हा समोर आले.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणात १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर छापेमारी मोहीम राबवण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तब्बल १,४०० लिटर मिथेनॉल जप्त करण्यात आले आहे.
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून त्याचा थेट परिणाम अहमदाबादच्या पर्यटन आणि प्रवास उद्योगावर दिसून येत आहे. अंतिम सामना पाहण्यासाठी देशभरातून हजारो क्रिकेटप्रेमी अहमदाबादकडे रवाना होत असल्याने हॉटेलचे दर आणि विमानभाड्यात मोठी वाढ झाली आहे.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे शनिवारी हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी गेलेल्या बॅनर्जी यांच्यावर संतप्त जमावाने दगडफेक, अंडीफेक आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना, “पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी तुमच्या पक्षातील ४० आमदार का बाहेर पडले, याचा विचार करा,” असा टोला लगावला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. जरांगे यांचे आंदोलन सुरू राहिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा हाके यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार शाहू छत्रपती यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर राज्यात मोठा उद्रेक होऊ शकतो.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात त्यांचे माजी सहकारी अमोल खुने यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे, गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेत अचानक वाढ कशी झाली, याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणी खुने यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे पाटील यांनी १५ तासांनंतर मागे घेतले. सरकारसोबत झालेल्या मध्यरात्रीच्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्याने त्यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अभूतपूर्व, अशी धडक कारवाई सुरू आहे.
शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाची राष्ट्रीय प्रांत संयोजक बैठक आज श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, पुणे येथे सुरू झाली. या तीन दिवसीय राष्ट्रीय बैठकीत देशातील ४० हून अधिक प्रांतांमधून २०० पेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिनला मोठा धक्का बसला आहे. कंपनीचे महत्त्वाकांक्षी ‘न्यू ग्लेन’ हे विशाल रॉकेट फ्लोरिडातील केप कॅनव्हेरल प्रक्षेपण केंद्रावर चाचणीदरम्यान भीषण स्फोटात उद्ध्वस्त झाले. या घटनेमुळे अमेरिकेच्या चंद्र मोहिमांनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेत होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या या सामुद्रधुनीवर नियंत्रण कोणाचे राहणार, यावरून दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी कट प्रकरणात राजस्थानसह चार राज्यांत मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पहाटे NIAच्या पथकांनी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील तब्बल १२ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.
आंदोलन आणि प्रति आंदोलनांमधून भाजपच्या विरोधात पण वातावरण पेटेना; उलट सत्तेच्या पदांसाठी पवार संस्कारित नेत्यांना भाजपचीच ओढ लागल्याचे चित्र आज दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई टेक वीक 2026’ चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राज् एआय व्हिजन’ या विषयावर संवाद साधला.
विधान परिषदेवर एकाही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीने आपासांत जागावाटप करून घेतले. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आठ, राष्ट्रवादी (शप)ला तीन, तर ठाकरे सेनेला चार जागा वाट्याला आल्या.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या सूचनेनंतर राजीनामा दिला खरा, पण राज्यसभेची खासदारकी नाकारून त्यांनी कर्नाटकातल्या सत्तेच्या चाव्या स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा “डाव” खेळला.
दोन राष्ट्रीय पक्षांना भाकऱ्या फिरविण्यात यश; पण प्रादेशिक पक्षांची सत्तेत आणि विरोधातही धडपड आणि तडफड!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!, असला प्रकार आज समोर आला.
भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तोंड कडूच राहिल्याचे 26 फेब्रुवारीच्या पक्षाच्या बैठकीतून समोर आले.
बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!, हेच राजकीय चित्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात समोर आले.