• Download App
    The Focus India

    Latest News

    मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला नमाजासाठी मशिदी कमी पडताहेत, म्हणून रस्त्यावर नमाज; पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याचा कांगावा!!

    मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला माझ्यासाठी मशिदी कमी पडत आहेत म्हणून रस्त्यावर नमाज पठण करावे लागते, असा कांगावा पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याने आज केला. ज्येष्ठ वकील असलेल्या या नेत्याने अप्रत्यक्षपणे रस्त्यावरच्या नमाजाचे समर्थन केले.

    Read more

    NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या कंपनीचे अनधिकृत बांधकाम पाडले

    NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंधित कंपनीने उभारलेले अनधिकृत बांधकाम अखेर पाडण्यात आले आहे. बीड नगर परिषदेने दिलेल्या नोटिशीनंतर संबंधित कंपनीने स्वतःहून ही कारवाई केली.

    Read more

    Sunil Tatkare : पार्थ पवारांच्या सक्रियतेचे तटकरे यांनी केले स्वागत; अजितदादांच्या निधनापूर्वीच राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्याचा दावा

    विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आज अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या राजकारणातील सक्रियतेचे स्वागत करताना, अजित पवार यांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.

    Read more

    Maharashtra Govt : मराठा आंदोलनातील मृत वारसांना MIDC मध्ये नोकरी:राज्य सरकारचा शासन निर्णय जारी, जिल्हाधिकाऱ्यांना पडताळणीचे आदेश

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून पुन्हा महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. एमआयडीसी आणि विविध सरकारी संस्थांमधील रोजगार संधींमध्ये मराठा समाजातील युवकांना प्राधान्य देण्यासंदर्भात सरकारकडून काही प्रशासकीय निर्णयांची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

    Read more

    Kerala Monsoon : मान्सून 2-3 दिवसांत केरळममध्ये पोहोचेल; देशभरातील उष्णतेची लाट संपली; राजस्थानमधील 3 जिल्ह्यांमध्ये गारपीट

    भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, नैऋत्य मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांत केरळममध्ये दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये दाखल होतो, परंतु यावेळी त्याचा वेग थोडा मंद राहिला आहे.

    Read more

    MLC Elections : विधान परिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट आमनेसामने

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्यात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शन केले, तर काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी आणि जागावाटपावरील वादही समोर आले.

    Read more

    Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र? सुप्रिया सुळेंचा सरकारवर विश्वासघाताचा आरोप

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या वृत्तामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. खासदार Supriya Sule यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हा महिलांशी केलेला विश्वासघात असल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    Hormuz : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका?; इराणने अमेरिकेशी चर्चा थांबवली, होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी; ट्रम्पही आक्रमक

    इस्रायल-लेबनॉन संघर्ष पुन्हा तीव्र होत असताना मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे. इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असून जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीला पूर्णपणे बंद करण्याची धमकी दिली आहे. या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे.

    Read more

    विकसित महाराष्ट्रात एसटीचा कायापालट; सगळ्या बसगड्या 100 % ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक झाली.

    Read more

    Surya Chauhan : बकरी ईदच्या दिवशी झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असद पोलिस चकमकीत ठार; सूर्या चौहान प्रकरणाला नवे वळण

    उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अकरावीत शिकणाऱ्या सूर्या प्रताप चौहान या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असद हा पोलिस चकमकीत ठार झाला आहे. शनिवारी उशिरा रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक घडल्याचे सांगितले जात असून या घटनेमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

    Read more

    Pune Hooch Tragedy : पुणे विषारी दारू प्रकरणात दोन पोलिस अधिकारी निलंबित; आरोपींशी संबंधांचा संशय, मृतांचा आकडा २४ वर

    पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींशी त्यांचे कथित संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून विशेष तपास पथकाकडून या दुव्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा २४ वर पोहोचल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

    Read more

    ममता बॅनर्जींची विरोधात बसल्यावर वजाबाकी; राष्ट्रवादीची सत्तेच्या खुर्चीवर बसूनही वजाबाकीच!!

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सत्तेपासून दूर झाल्यानंतर विरोधात बसून वजाबाकी सुरू केली, पण सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असूनही पक्षातून वजाबाकी सुरू झाली. हे राजकीय वास्तव आज समोर आले.

    Read more

    संघ शताब्दीनिमित्त शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धा महोत्सव; दीड लाखांची बक्षिसे; १५ जुलैपर्यंत अर्जाची मुदत

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीने पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धेचे आणि महोत्सवाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत

    Read more

    Brahmos : मोठी बातमी: ब्रह्मोस-आकाशच्या जोरावर भारताची शस्त्रनिर्यात झेपावली; २१ हजार कोटींचा टप्पा पार, जगभरातून वाढली मागणी

    एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या शस्त्र आयातदार देशांपैकी असलेला भारत आता संरक्षण सामग्री निर्यातीत मोठी झेप घेत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, अकाश हवाई संरक्षण प्रणाली, पिनाका रॉकेट प्रणाली, ड्रोन आणि दारूगोळ्यांच्या वाढत्या जागतिक मागणीमुळे भारताची संरक्षण निर्यात २१ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. केंद्र सरकारने २०२९ पर्यंत हा आकडा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil : ‘काँग्रेसने तरी ओबीसींचे काय भले केले?’; वडेट्टीवारांवर जरांगेंचा पलटवार, धनंजय मुंडेंनाही दिला इशारा

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी तरी ओबीसी समाजासाठी काय केले? झोके बांधून दिले होते का?” असा सवाल करत जरांगेंनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांशी संघर्ष न करता सरकारविरोधात एकत्र लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

    Read more

    हे कसले सुरू झाले पार्थ पवार पर्व??; वजाबाकीतून पक्ष संघटनेची वाताहात झाली हेच खरे वर्म!!

    राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी काय जाहीर केली लगेच “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार नावाचे पर्व सुरू झाले

    Read more

    भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!

    भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    Wadettiwar : जरांगेंचे उपोषण संपल्यानंतर राजकारण तापले; ‘डबल ढोलकी सरकार’ म्हणत वडेट्टीवारांचा हल्लाबोल, हाकेंकडूनही तीव्र टीका

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण अवघ्या १५ तासांत मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले असले,

    Read more

    Navnath Ban : ‘अभिषेक बॅनर्जींसाठी कळवळा, पण बंगालमधील हिंसाचारावर मौन का?’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

    भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याचा निषेध करणारे राऊत, बंगालमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या वेळी गप्प का होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    Read more

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या बैठकीला आमदारांची दांडी? ८० पैकी फक्त २० आमदार उपस्थित, टीएमसीमध्ये नाराजीच्या चर्चांना उधाण

    तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या मुद्द्यावर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आक्रमक भूमिका घेत असताना पक्षातच मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणावर रणनीती ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला पक्षाच्या ८० आमदारांपैकी केवळ २० आमदार उपस्थित राहिल्याचा दावा करण्यात आला आहे.

    Read more

    भाजप – शिवसेनेचे मिळून १५ उमेदवार झटकन जाहीर; पण राष्ट्रवादीची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक!!

    भाजप आणि शिवसेना यांनी मिळून एका झटक्यात 15 उमेदवार जाहीर करून टाकले, पण राष्ट्रवादी काँग्रेसची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक झाली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे राजकीय सत्य सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड झाले.

    Read more

    Vikas Lawande : ‘सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?’; विकास लवांडेंचा गंभीर आरोप, कुटुंबालाही धोका असल्याचा दावा

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला आणि कुटुंबाला धोका असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाकडे वारंवार संरक्षणाची मागणी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने, “सरकार माझ्या हत्येची वाट पाहत आहे का?” असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला.

    Read more

    Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जी रुग्णालयात दाखल; डोक्याला मार लागल्यानंतर रक्ताची गाठ, ममता बॅनर्जींकडून भेट

    तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्ताची गाठ झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

    Read more

    Dattatray Bharne : ‘कर्जमाफीची घोषणा लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे संकेत, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत मोठे संकेत दिले आहेत. “शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकार सकारात्मक असून याबाबत लवकरच घोषणा केली जाईल,” असे त्यांनी अहिल्यानगर येथे बोलताना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री आज चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होते. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच चोंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून आचारसंहिता असल्याने काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.