नॉन क्रीमी लेयर नियमात मोठा बदल; सुप्रीम कोर्टाचा हजारो OBC उमेदवारांना दिलासा!!
सुप्रीम कोर्टाने OBC इतर मागासवर्गीय समाजातील नॉन क्रिमी लेयर संदर्भात आज अत्यंत महत्वाचा निर्णय दिला.
सुप्रीम कोर्टाने OBC इतर मागासवर्गीय समाजातील नॉन क्रिमी लेयर संदर्भात आज अत्यंत महत्वाचा निर्णय दिला.
सर्वोच्च न्यायालय NCERT च्या इयत्ता 8 वीच्या सामाजिक विज्ञान पुस्तकातील ‘न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार’ नावाचे उप-प्रकरण तयार करणाऱ्या टीमला हटवण्याच्या तयारीत आहे.
इराण-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज मार्ग बंद झाला आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्यानंतर भारत सुमारे 3 कोटी बॅरल कच्चे तेल रशियाकडून खरेदी करेल.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली-एनसीआर आणि देशाच्या इतर भागांमध्ये घर खरेदीदारांना फसवण्यासाठी बँका आणि विकासकांमध्ये असलेल्या संगनमताच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) फटकारले. न्यायालयाने म्हटले की, तपास लांबवल्याने फ्लॅट खरेदीदारांना आणखी त्रास होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी केरळम (केरळ) दौऱ्यावर आहेत. त्यांनी एर्नाकुलममधील कोची येथे ₹10,800 कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यानंतर एनडीएच्या एका निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी लोकसभा खासदार राहुल गांधींवर टीका केली.
आखाता मधल्या होर्मूजच्या खाडीतून प्रवास करायला भारतीय जहाजांना इराणने परवानगी दिली. त्यामुळे आखातामधून भारताकडे येणाऱ्या गॅस आणि तेलाची वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मुत्सद्देगिरी यासाठी कामी आली.
गॅस सिलेंडर साठी सामान्य माणसांची होरपळ; पण राहुल गांधींचा कट विरोधकांचे संसदेच्या पायऱ्यांवर चहा बिस्कीट खाऊन आंदोलन!!, असला प्रकार आज समोर आला.
“सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांचा 12 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. यात दोघेही टायटॅनिक चित्रपटातील प्रसिद्ध ‘किंग ऑफ द वर्ल्ड’ पोजमध्ये उभे असलेले दिसत आहेत.
विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी प्रस्ताव आणण्यासाठी खासदारांच्या सह्या गोळा केल्या आहेत. सूत्रांनुसार, हा प्रस्ताव गुरुवारी किंवा शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये (लोकसभा आणि राज्यसभा) सादर केला जाऊ शकतो.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. बारामती विमानतळावर झालेला अपघात हा घातपात होता की अपघात? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत आहेत. तसेच त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची भेट देखील घेतली आहे. आता त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी दोन महामार्गांना अजितदादांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित मानहानी प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक न्यायालयाने या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही अधिकृतपणे रद्द केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या खटल्यातील सर्व प्रक्रिया संपुष्टात आल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे यांनी दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडला आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Aditi Tatkare महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची सुरुवात करण्यात आली व […]
बुधवारी, लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठीचा अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. सभागृहाच्या कामकाजादरम्यान त्यांच्यावर भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. मराठवाड्यासाठी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर मराठा समाजाला अपेक्षित प्रमाणपत्र मिळाले नाही, तर 2029 च्या निवडणुकीत संबंधित आमदारांना पराभवाचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आसाममध्ये राज्य सरकारच्या ओरुनोडोई (अरुणोदय) योजनेअंतर्गत मंगळवारी 40 लाख महिलांच्या खात्यात 9 हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. ही योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका पात्र महिलेला दरमहा 1,250 रुपये मिळतात.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीजवळ असलेल्या खार्ग बेटाचे महत्त्व अचानक वाढले आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की ट्रम्प सरकार या बेटावर कब्जा करण्यासाठी लष्करी पर्यायांवर विचार करत आहे, कारण हे इराणच्या तेल कमाईचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटी रुपयांची आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युरोपमधल्या ऑस्ट्रिया आणि पूर्व आशियातल्या काही देशांना महाराष्ट्र आणि मागे टाकल्याचे आकडेवारीनिशी स्पष्ट केले
सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा मुद्दा चर्चेत आहे. प्रश्नपत्रिकेवर छापलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर यू-ट्यूबची लिंक उघडत आहे, जी एका इंग्रजी गाण्याची आहे. यासंबंधी अनेक व्हिडिओ आणि स्क्रीनशॉटही व्हायरल झाले आहेत. यामध्ये क्यूआर कोड स्कॅन केल्यावर यू-ट्यूबवरील गाण्याची लिंक उघडत आहे.
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर खाडी देशांनी अण्वस्त्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बहरीनस्थित एका फार्मा लायझनिंग एजंटने चंदीगडमधील एका औषध कंपनीशी संपर्क साधला आहे. त्याने अण्वस्त्र आणीबाणीत उपयुक्त ठरणाऱ्या प्रुशियन ब्लू कॅप्सूलबाबत चौकशी केली आहे.
काशी येथील ऐतिहासिक मनिकर्णिका घाटाचे संवर्धनाचे काम सुरू असताना तेथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांच्या कथित तोडकामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना काही मुद्दे उपस्थित केले होते.
केंद्र सरकारने चीनसह भारतासोबत सीमा सामायिक करणाऱ्या म्हणजेच शेजारील देशांकडून येणाऱ्या परकीय थेट गुंतवणुकीच्या (FDI) नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (10 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रेस नोट 3 म्हणजेच FDI धोरणाच्या नियमांमधील बदलांना मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये शेती क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आज महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात बोलवून सन्मान केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत सुद्धा या महिलांनी आपला आत्मविश्वास न गमावता शेती क्षेत्रात बहुमूल्य योगदान केले. नवीन प्रयोग करून सगळ्या महाराष्ट्राला अनमोल प्रेरणा दिली, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व महिला शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
चीनमध्ये जिनपिंग सरकार एका नवीन कायद्याला मंजुरी देण्याच्या तयारीत आहे, ज्यात वेगवेगळ्या वांशिक गटांना (एथनिक ग्रुप्स) एकच राष्ट्रीय ओळख दिली जाईल. बीबीसीच्या अहवालानुसार, या कायद्याचे नाव ‘लॉ ऑन प्रोमोटिंग एथनिक युनिटी अँड प्रोग्रेस’ असे आहे.
काशी येथील ऐतिहासिक मनिकर्णिका घाटाचे संवर्धनाचे काम सुरू असताना तेथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांच्या कथित तोडकामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना काही मुद्दे उपस्थित केले होते.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नाही त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपचा खोडा आहे तो निघता निघत नाही, हे लक्षात आल्यावर शरद पवारांच्या गटाने वेगळाच “डाव” टाकला. रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी घेतलेल्या भेटीगाठींमधून तो समोर आला.
राहुल गांधी बड्या उद्योगपतींकडे लग्नाला नाही जात, ते शेतकरी कुटुंबाच्या लग्नात जातात, अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून “डबल गेम” समोर आली. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काल एकाच वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, पण ही भेट कशासाठी होती??, याची कारणे मात्र दोघांनी वेगवेगळी दिली.
मनसेचा आजचा वर्धापन दिन राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन साजरा केला. आजच्याच दिवशी त्यांच्या पक्षाला मराठवाड्यातल्या एका पंचायत समितीत सत्ता मिळाली.
अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांनी केलेल्या आरोपांची प्रफुल्ल पटेल यांनी साधी दखलही घेतली नाही.
ठाकरे आणि पवारांच्या मागे काँग्रेसची फरफट; 14 खासदार आणि 16 आमदार असूनही काँग्रेसला नाही किंमत!!,
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह तुतारीच्या अनावरणासाठी तब्बल 40 वर्षांनी रायगडावर गेले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या 9 मार्च 2016 रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडावर जाणार आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच सोशल मीडिया पोस्ट मधून हे जाहीर केले.