• Download App
    The Focus India

    Latest News

    China : चीनने 35 वर्षांत सर्वात कमी GDPचे लक्ष्य ठेवले; 2026 साठी 4.5-5% वाढीचे लक्ष्य

    चीनने 2026 साठी जीडीपी वाढीचे लक्ष्य 4.5-5% पर्यंत कमी केले आहे. 1991 नंतर चीनने आपले लक्ष्य 5% च्या खाली ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. बीजिंगमध्ये आयोजित वार्षिक संसदीय बैठक ‘टू सेशन्स’ दरम्यान, चीनचे प्रीमियर ली कियांग यांनी ही घोषणा केली.

    Read more

    Abhishek Manu Singhvi, : राज्यसभा निवडणूक: काँग्रेसने 6 उमेदवारांची घोषणा केली; अभिषेक मनु सिंघवी- फुलो देवी नेताम पुन्हा राज्यसभेत जाणार

    राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी 6 उमेदवारांची नावे जाहीर केली. तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवी आणि छत्तीसगडमधून फुलो देवी नेताम यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. दोघेही सध्या राज्यसभा खासदार आहेत.

    Read more

    PNB : PNB ने ATM मधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा 50% कमी केली; 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू

    पंजाब नॅशनल बँक (PNB) ने आपल्या निवडक डेबिट कार्ड्स (ATM कार्ड) मधून दररोज रोख रक्कम काढण्याची मर्यादा अर्धी केली आहे. नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. बँकेने हा निर्णय जोखीम नियंत्रण मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी घेतला आहे.

    Read more

    PM Modi : मोदी म्हणाले- इस्त्रायल-इराण युद्ध लवकर संपले पाहिजे, लष्करी संघर्ष कोणत्याही समस्येचे निराकरण नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत मध्य पूर्व आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध लवकर संपवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, लष्करी संघर्षातून कोणताही प्रश्न सुटू शकत नाही. भारत सर्व विवादांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील.

    Read more

    शेतकऱ्यांपासून लाडक्या बहिणींपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात दिले काय??, वाचा तपशीलवार!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

    Read more

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाळला शब्द; अर्थसंकल्पातून केली शेतकऱ्यांची कर्जमाफी!!

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा 2026 – 27 चा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र शासन संपूर्ण देशातच काय, पण जगातही Infra Man म्हणून ओळख आहे

    Read more

    आठवण अजितदादांची, पण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर छाप देवेंद्र फडणवीसांची!!

    महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आज मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्राचा 2026 – 2027 सालचा अर्थसंकल्प सादर करावा लागला.

    Read more

    Infra Man देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी नेमक्या काय घोषणा केल्या??, वाचा सविस्तर!!

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा 2026 – 27 चा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र शासन संपूर्ण देशातच काय पण जगातही Infra Man म्हणून ओळख आहे.

    Read more

    Jishnu Dev Varma : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल:7 राज्यांचे राज्यपाल, दिल्ली-लडाखचे LG बदलले

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन नियुक्त्या केल्या. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी तामिळनाडूचे माजी राज्यपाल आर.एन. रवी यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील.

    Read more

    Bombay High Court : मुंबई हायकोर्टाने म्हटले- कुठेही नमाज पठण करणे धार्मिक अधिकार नाही; सुरक्षा सर्वात आधी

    मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ नमाज पठणाची परवानगी देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि कोणत्याही ठिकाणी नमाज पठण करणे हा धार्मिक अधिकार मानला जाऊ शकत नाही.

    Read more

    Iran war effect : पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा स्थगित; सरकारचे घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य

    इराण विरोधात अमेरिका आणि इजरायलने सुरू केलेल्या आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचे वाटप थांबवण्यात आले आहे

    Read more

    Minister Pratap Sarnaik : मंत्री सरनाईकांची घोषणा- एसटी बसचालक, वाहक, कर्मचाऱ्यांना दररोज अल्कोटेस्ट सक्तीची, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालक आणि वाहकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.

    Read more

    Shinde : राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंकडून ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी, ज्योती वाघमारे यांचा अर्ज दाखल

    राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना, उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवले आहे. ज्योदी वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

    Read more

    Supriya Sule : राज्यसभा बिनविरोध होईल असे दिसतंय; शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरेंचे आभार

    राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज संध्याकाळी साडेसहा वाजता ‘मातोश्री’वर जाणार आहेत.

    Read more

    Sharad Pawar : हा प्रवास माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना

    राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेसने पाठिंबा दिला. विशेष म्हणजे तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांनी आपल्या घरूनच अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक अधिकारी पवारांच्या निवासस्थानी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    Read more

    Maharashtra Economy : आर्थिक पाहणी अहवाल- महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची 51 लाख कोटी रुपयांकडे झेप; देशामध्ये नंबर 1

    महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने ५१ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडत देशाच्या ७.४ टक्क्यांच्या तुलनेत ७.९ टक्के विकासदराची विक्रमी झेप घेतली. ५१ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणारे महाराष्ट्र देशातील नंबर १ राज्य ठरले आहे. कारण उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था २९.७८, प. बंगाल २८.८४, कर्नाटक २८.८४ तर तामिळनाडूची ३१.१९ लाख कोटी रुपयांची आहे. गुरुवारी सादर झालेल्या २०२५-२६ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकडा समोर आला.

    Read more

    Bawankule : अर्थसंकल्पीय अधिवेशन; राज्य सरकारकडून एनए टॅक्स रद्द, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

    राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहासमोर ठेवला. याचसोबत महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी विधेयकाला देखील मंजूरी देण्यात आली आहे.

    Read more

    Maharashtra Cabinet : महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी विधेयकाला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे नितेश राणे यांच्याकडून स्वागत

    आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देऊन एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर पाऊल उचलले असून, भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, हा राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता भरला उमेदवारी अर्ज; निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन प्रक्रिया केली पूर्ण

    राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळच्या उमेदवारी अर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता आपला अर्ज दाखल केला आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले- इराणने माझ्याशिवाय आपला सर्वोच्च नेता निवडू नये, अमेरिकेची भूमिका महत्त्वाची

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इराणने त्यांच्याशिवाय नवीन सर्वोच्च नेते निवडू नये. त्यांनी म्हटले आहे की नवीन नेता निवडण्यात अमेरिकेची भूमिका आवश्यक आहे आणि अमेरिकेच्या सहभागाशिवाय असे करणे वेळेचा अपव्यय ठरेल.

    Read more

    Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे जेट-इंधन मार्चमध्ये 6% महागले; रुपया घसरल्यामुळेही भारतीय विमान कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम

    भारतीय विमान वाहतूक उद्योग पुन्हा एकदा कठीण परिस्थितीतून जात आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतींमधील वाढ, डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया आणि मध्यपूर्वेतील सततचा तणाव यामुळे एअरलाईन्सच्या नफ्यावर दबाव वाढला आहे.

    Read more

    भाजपने ज्या दिवशी पवार आजोबा + नातवाला बिनविरोध राज्यसभेत पाठविले, त्याच दिवशी फडणवीस सरकारचे धर्मांतर विरोधी – लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर शिक्कामोर्तब!!

    ज्या दिवशी म्हणजेच 5 मार्च 2026 रोजी पवार कुटुंबातल्या दोघांना बिनविरोध राज्यसभेत पाठविले, त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने धर्मांतर विरोधी – लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. याच फडणवीस सरकारमध्ये बाहेरून पवार कुटुंबात आलेल्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत.

    Read more

    Pushkar Singh Dhami : बंगालमध्ये मतदान करणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका; धामी म्हणाले- SIR मधून बनावट मतदार हटवल्याने दीदी घाबरल्या

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी होळी साजरी केल्यानंतर भाजपच्या मिशनमध्ये सामील झाले आहेत. होळी साजरी केल्यानंतर मुख्यमंत्री धामी आपले कर्तव्य बजावत बंगालमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी दीदींच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले- दीदींनी घुसखोरांना येथे घुसखोरी घडवून आणली आहे.

    Read more

    Sri Lanka : भारतातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला; श्रीलंकेजवळ बुडाले; 87 सैनिकांचा मृत्यू, 32 जणांना वाचवले

    आज अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा पाचवा दिवस आहे. अमेरिकेने श्रीलंकेजवळ भारतातून परतणारी इराणी युद्धनौका आयआरआयएस देनावर हल्ला करून ती बुडवली आहे. श्रीलंकेच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत ८७ इराणी खलाशी ठार झाले आहेत.

    Read more

    Jayant Patil : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला; जयंत पाटील म्हणाले- शरद पवारांनी दिल्लीत असणे गरजेचे

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असे काही नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असे वाटत असते.

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.