• Download App
    The Focus India

    Latest News

    Dalai Lama : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार; म्हणाले- हा मानवतेच्या सामायिक जबाबदारीचा विजय

    तिबेटी आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांना प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा सन्मान ‘बेस्ट ऑडिओबुक नरेशन’ श्रेणीमध्ये त्यांच्या ‘मेडिटेशन्स: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा’ या ऑडिओबुकसाठी प्रदान करण्यात आला आहे.

    Read more

    Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- विलीनीकरणावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही बोलू, राऊतांच्या टीकेला महत्त्व नाही

    आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एक आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी भूमिका ज्यांना सोबत यायचे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाची भूमिका ठरली, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो, विलीनीकरणाबद्दल शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतर आम्ही बोलू, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे

    Read more

    Ganesh Khankar : मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड, अमित साटम यांनी केली घोषणा

    मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच भारतीय जनता पक्षाचा गटनेता अखेर ठरला आहे. अभ्यासू आणि अनुभवी नगरसेवक गणेश खणकर यांची भाजपच्या गटनेतेपदी वर्णी लागली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आणि विषयांची सखोल जाण असलेला चेहरा म्हणून खणकर यांच्याकडे पाहिले जाते. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गणेश खणकर यांच्या गटनेतेपदी निवडीची घोषणा केली.

    Read more

    विलीनीकरणाच्या Inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलेच सगळे नेते लाभार्थी; मग story किती खरी, किती खोटी??

    दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलचे सगळे नेते लाभार्थी; त्यामुळे मग story किती खरी, किती खोटी??, असा सवाल समोर आला.

    Read more

    राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांची भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!

    राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांमध्ये भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    Rahul Gandhi : बजेट 2026- राहुल म्हणाले- युवकांना काहीच मिळाले नाह, :ममता बॅनर्जींनी म्हटले- विस्कळीत अर्थसंकल्प

    विरोधकांनी अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, हा तरुणांसाठी रोजगार देणारा अर्थसंकल्प नाही. उत्पादन क्षेत्र घसरत आहे. गुंतवणूकदार भांडवल काढून घेत आहेत. घरगुती बचतीत मोठी घट होत आहे.

    Read more

    राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पटेल नको असल्याच्या नुसत्याच पोकळ बाता; प्रत्यक्षात गुजरात्यांच्याच हातात दोन्ही राष्ट्रवादींच्या नाड्या!!

    राष्ट्रवादीचे अध्यक्षपदी पटेल नको असल्याच्या नुसत्याच पोकळ बाता; प्रत्यक्षात गुजरात्यांच्याच हातात दोन्ही राष्ट्रवादींच्या नाड्या!!

    Read more

    टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना होणार नाही; पाकिस्तान सरकारची घोषणा; बांगलादेशच्या समर्थनार्थ 15 फेब्रुवारीच्या मॅचवर बहिष्कार

    टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. दोन्ही संघ 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये एकमेकांशी भिडणार होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेत प्रवेश दिला होता. याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारताच्या विरोधात सामन्यावर बहिष्कार टाकला.

    Read more

    जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र प्रेमापोटी फडणवीसांचा प्रचाराचा त्याग, पण एकनाथ शिंदेंचा प्रचार मात्र जोरात!!

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर मित्र प्रेमापोटी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा त्याग केला, पण एकनाथ शिंदे यांच्या मात्र या निवडणुकीतला प्रचार जोरात आला.

    Read more

    Rupali Patil : रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या- अजितदादांचा अपघात की घातपात? ऐनवेळी पायलट का बदलले? पाच मृत्यू तर सहावी बॉडी कुठे!

    अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे त्यांच्या विमान अपघातामागे काही घातपात आहे का याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. तसेच अपघाताच्या दिवशी ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले असा सवालही ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.

    Read more

    यशवंत शिष्याची काय ही अवस्था??; सुनेच्या पक्षात सुद्धा विलीन होता येईना!!

    यशवंत शिष्याची काय ही अवस्था??, सुनेच्या पक्षात सुद्धा विलीन होत येईना!!, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे.

    Read more

    Budget 2026 : भारताने बांगलादेशची मदत अर्ध्यावर आणली; मालदीव-म्यानमारचा निधीही कमी केला; भूतानसाठी वाढवून ₹2,288 कोटी केले

    भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये बांगलादेशला दिल्या जाणाऱ्या मदतीत मोठी कपात केली आहे. या वर्षी बांगलादेशसाठी फक्त 60 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत, तर गेल्या वर्षी 120 कोटी रुपये दिले होते. म्हणजेच भारताने बांगलादेशची मदत निम्मी केली आहे.

    Read more

    Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार; ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा नंबर पहिला; एकनाथ शिंदेंची कोल्हापुरातून मोठी घोषणा

    एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोल्हापूरच्या कागल येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा मत पेटीत नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

    Read more

    Fadnavis : अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे:आम्हाला न सांगता विलीनीकरणाची चर्चा करतील का? – देवेंद्र फडणवीस

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. “दोन्ही पक्ष १२ फेब्रुवारीला एकत्र येणार होते,” या शरद पवार आणि जयंत पाटील यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढला आहे. “अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घेतील का?” असा थेट सवाल करत, राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भाजपशी चर्चा करणे आवश्यक असल्याची ‘अट’ मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.

    Read more

    Rohit Pawar : अजितदादांचा तेरावा झाल्यावरच राजकीय चर्चा, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहिती नव्हते, रोहित पवार यांची प्रतिक्रिया

    राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी पक्षात व पवार कुटुंबात देखील अनेक हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. परंतु, या सगळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार सावध भूमिका घेताना दिसत आहे. तसेच त्यांनी अजितदादांचा तेरावा होईपर्यंत कुठलेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    Read more

    Budget 2026 : बजेट 2026, स्वस्त-महाग- कर्करोगाची 17 औषधे स्वस्त; EV, सौर पॅनेलचे दर कमी होतील

    आज, तुमच्या ताटातील भाज्यांपासून ते हातातल्या स्मार्टफोनपर्यंत, बहुतेक गोष्टींचे दर जीएसटी कौन्सिल ठरवते. अर्थसंकल्पात तर फक्त आयात शुल्काच्या कमी-जास्त होण्यामुळे वस्तूंच्या किमती थोड्याफार वर-खाली होतात. या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले ते समजून घेऊया…

    Read more

    Maharashtra Budget 2026 : द फोकस एक्सप्लेनर : बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक, वाचा सविस्तर

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सलग नववे केंद्रीय बजेट सादर केले. ८५ मिनिटांच्या या भाषणात ‘विकसित भारत’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून, “हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे टाकलेले एक दमदार पाऊल आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

    Read more

    Budget 2026 : अर्थसंकल्पावर 10 प्रश्न, सीतारमण यांची उत्तरे, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवून सट्टेबाजीवर नियंत्रण, देशाचा आर्थिक पाया खूप मजबूत

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प 2026 सादर केला. या अर्थसंकल्पात कर्करोगावरील औषधांवरील शुल्क रद्द करण्यापासून ते शेअर बाजारात सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्यापर्यंतच्या घोषणा करण्यात आल्या.

    Read more

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- अर्थसंकल्पामुळे सुधारणांना नवीन गती मिळेल; कौशल्य, व्याप्ती आणि शाश्वतता मजबूत होईल

    पंतप्रधान मोदींनी रविवारी अर्थसंकल्पावर बोलताना सांगितले की, ‘देशात सुधारणा एक्सप्रेस धावू लागली आहे. जे बदल करण्यात आले आहेत, ते अभिव्यक्तीने भरलेल्या भारताच्या धाडसी आणि प्रतिभावान तरुणांना मोकळे आकाश देतात

    Read more

    GST Collection : जानेवारीमध्ये GST संकलन 6.2% नी वाढून ₹1.93 लाख कोटींच्या पुढे; निव्वळ महसूल 7.6% नी वाढून ₹1.70 लाख कोटी

    जानेवारी 2025 मध्ये GST संकलन 6.2% नी वाढून 1.93 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. 1 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये हा आकडा ₹1.82 लाख कोटी होता. सप्टेंबरमध्ये कमी केलेल्या कर दरांनंतरही संकलन सातत्याने वाढत आहे.

    Read more

    दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, “हा” पर्याय उपलब्ध असताना!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुराळा उडाला. आता दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही आणि झाले तर ते आपल्या अटी शर्तींवर होत नाही, हे लक्षात येताच आम्ही काय शस्त्र टाकून शरणागती पत्करायला जात नव्हतो, असा राणा भीमदेवी थाट पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आणला. जयंत पाटलांनी सुद्धा शशिकांत शिंदे यांच्या म्हणण्याला वेगळ्या शब्दांनी दुजोरा दिला, पण दोघांनीही अजित पवारांची शपथ वाहून विलीनीकरण करण्याचा आग्रह अजित पवारांचाच होता, असा वारंवार दावा केला

    Read more

    Khaby Lame : सोशल मीडिया क्रिएटर्स जगतातील मोठा करार; सर्वात महागडा इन्फ्लुएन्सर खाबी लॅमने 9 हजार कोटी रुपयांना व्यक्तिमत्त्व हक्क विकले

    सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या चेहऱ्यांपैकी एक असलेले खाबी लॅम आता एआयच्या जगात एक नवीन अध्याय लिहिणार आहेत. 2020 मध्ये ओव्हर-द-टॉप लाइफ हॅक्सवर न बोलता प्रतिक्रिया देऊन चर्चेत आलेले 25 वर्षीय लॅम आता डिजिटल ट्विनच्या माध्यमातून व्हर्च्युअल अवतारात समोर येणार आहेत.

    Read more

    Gautam Adani : अदानींनी यूएस-कोर्टाची नोटीस 15 महिन्यांनंतर स्वीकारली; फसवणुकीच्या प्रकरणात 90 दिवसांत उत्तर द्यावे लागेल

    अमेरिकन रेग्युलेटर सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन (SEC) ने दाखल केलेल्या दिवाणी फसवणूक प्रकरणात 15 महिन्यांनंतर गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी कायदेशीर नोटीस स्वीकारण्यास तयार झाले आहेत. न्यूयॉर्कमधील न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, अदानींच्या वकिलांनी रेग्युलेटरची कागदपत्रे स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे.

    Read more

    केंद्रीय अर्थसंकल्पातून विकासित भारताकडे दमदार पाऊल, महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

    पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

    Read more

    केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, देवेंद्र फडणवीसांनी उलगडले तपशील!!

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.