• Download App
    The Focus India

    Latest News

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादीने दाखविले खायचे दात; भारतात कुराण लागू करायची सना मलिकांची मागणी; राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा!!

    महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आज खायचे दात दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी भारतात कुराण लागू करायची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी सना मलिक यांचे भाषण उचलून धरले.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल यांच्या स्कूबा डायव्हिंगवर 26 कोटी खर्चाचा दावा; काँग्रेसने म्हटले- ग्रेट निकोबार प्रकल्पावरून लक्ष विचलित करू इच्छितात

    काँग्रेस आणि भाजप यांच्यातील ग्रेट निकोबार प्रकल्पावरून सुरू असलेले राजकीय युद्ध आता राहुल गांधींच्या स्कूबा डायव्हिंगपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दावा केला की, राहुल गांधींच्या अंदमानमधील स्कूबा डायव्हिंगवर 26 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

    Read more

    Anna Hazare : माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन; नियम बदलल्याने अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

    माहितीचा अधिकार (RTI) हा शासनाने जनतेवर केलेला उपकार नसून तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, राज्य सरकारने १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेले ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ हे या कायद्याची धार बोथट करणारे आणि भ्रष्टाचाराला ढाल देणारे आहेत. प्रशासनातील ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आणि माहितीचा अधिकार वाचवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार नाही,” असा थेट आणि निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

    Read more

    Arup Roy : बंडखोरांचे ममता बॅनर्जींना सर्वात मोठे आव्हान; टीएमसीची समांतर कार्यसमिती स्थापन केली, अरूप रॉय अध्यक्ष

    विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये सुरू असलेला राजकीय विद्रोह तीव्र झाला आहे. सोमवारी बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी टीएमसीच्या समांतर कार्यसमितीची घोषणा केली. आमदार अरूप रॉय यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. याला ममता बॅनर्जींसमोरील आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे.

    Read more

    पश्चिम बंगाल मध्ये झालेली चूक काँग्रेस सुधारणार का??; उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आघाडी करणार का??

    पश्चिम बंगाल मध्ये झालेली चूक काँग्रेस सुधारणार का??; उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आघाडी करणार का??, असे दोन सवाल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यामुळे आज समोर आले.

    Read more

    ममता बॅनर्जींना बंडखोरांचा मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून डच्चू!!

    पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आधी दोन तृतीयांश पक्ष फोडला. विधानसभेतली विरोधी पक्षनेते पदाची कायदेशीर लढाई जिंकली आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला.

    Read more

    Rohit Pawar : कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल; 29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!

    राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, ही कर्जमाफी योजना पूर्णपणे फसवी आहे,” असा घणाघाती आरोप करत रोहित पवारांनी येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

    Read more

    Ramdas Kadam’ : सहा नव्हे सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार; रामदास कदम यांच्या विधानाने खळबळ, आमदारही फुटीच्या मार्गावर असल्याचा केला दावा

    शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे सहा खासदार आज अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सर्व खासदार सध्या मुंबईत दाखल झाले असून ते शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र या राजकीय घडामोडींदरम्यान शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी एक धक्कादायक खुलासा केला असून, त्यांच्या माहितीनुसार या प्रवेशासाठी केवळ सहा नव्हे, तर तब्बल सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

    Read more

    Vidhan Parishad Election Results: : विधान परिषदेत महायुतीचा महाविजय! महाविकास आघाडीचा धुव्वा; कुठे क्रॉस व्होटिंग तर कुठे बंडखोरीने फिरवली निवडणुकीची दिशा

    स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत राज्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र या निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंग, बंडखोरी, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणांनी निकालांवर मोठा प्रभाव टाकल्याचे दिसून आले.

    Read more

    Uddhav Thackeray : बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा; 27 जूनपासून पक्षबांधणीसाठी थेट मैदानात

    विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये सुरू असलेला राजकीय विद्रोह तीव्र झाला आहे. सोमवारी बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी टीएमसीच्या समांतर कार्यसमितीची घोषणा केली. आमदार अरूप रॉय यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. याला ममता बॅनर्जींसमोरील आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे.

    Read more

    Sanjay Dina Patil : त्यांना ताकदवर लोक नाही, गुलाम पाहिजे; संजय पाटलांची शिवसेना ठाकरे गटावर टीका; म्हणाले- एका व्यक्तीमुळे प्रॉब्लेम झाला

    मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण, त्यांचे नाव घेण्यास संजय पाटील यांनी टाळले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    Read more

    CM Eknath Shinde : 2022 ला चौकार मारला, आता थेट ‘सिक्सर’; हे ऑपरेशन टायगर फुलप्रूफ अन् सक्सेसफुल! एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

    आम्ही कोणतेही ‘ऑपरेशन’ अर्धवट सोडत नाही, तर ते ‘फुलप्रूफ’ करतो. 2022 मध्ये आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा चाळीस आमदारांचा चौकार मारला होता आणि आता थेट 6 खासदारांचा षटकार (सिक्सर) मारला आहे,” अशी तुफान फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला.

    Read more

    Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस? वाचा सविस्तर

    जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन राज्याच्या काही भागांत पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून सोमवारी अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सकारात्मक वातावरणातच भारतीय हवामान विभागाने आपला नवा अंदाज वर्तवला असून, त्यानुसार पुढील 48 तासांत संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    Read more

    Godzilla : गॉडझिला अल निनोमुळे भारतात दुष्काळाचा धोका वाढला; नासाने जारी केले छायाचित्र, समुद्रातील वाढत्या उष्णतेमुळे मान्सून कमकुवत झाला

    भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये दुष्काळ आणि पुराचा धोका आहे. याचे कारण अल निनोची मजबूत स्थिती आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) नुसार, पश्चिम प्रशांत महासागरात 1997 नंतर अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

    Read more

    PM Modi : ब्रह्मोसने सुसज्ज INS दूनागिरी नौदलात समाविष्ट; अँटी सबमरीन INS अग्रय, INS संशोधक यांचाही समावेश; मोदी म्हणाले- ही नव्या भारताची सर्वात मोठी ताकद

    कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्टवर तीन स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्या. देशातच डिझाइन केलेल्या आणि बनवलेल्या जहाजांच्या समावेशामुळे देशाची ऑपरेशनल क्षमता वाढेल.

    Read more

    ठाकरेंच्या ६ खासदारांचा शिंदे सेनेत प्रवेश; सर्वांना धनुष्यबाणावर निवडून आणायचे शिंदेंचे आश्वासन!!

    शिवसेनेच्या परिवारामध्ये ६ नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेतून फुटून आलेल्या खासदारांना दिला.

    Read more

    Shashi Tharoor : खेरा म्हणाले- मोदी जे बोलत नाहीत, ते थरूर ऐकतात; काँग्रेस खासदारांनी G7 परिषदेत भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले होते

    पंतप्रधान मोदींनी G7 परिषदेत भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी कौतुक केले होते. आता थरूर यांच्या पक्षाचे लोकच त्यांच्यावर टीका करत आहेत.

    Read more

    Pahalgam Attack : पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह

    काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन मैदानात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आरोपपत्राने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तपासानुसार, सीमेपलीकडून पाठवलेले ड्रोन बारामुल्ला जिल्ह्यापर्यंत शस्त्रे, दारूगोळा आणि रोख रक्कम न पकडले जाता पोहोचवण्यात यशस्वी झाले होते

    Read more

    President Zardari : भारताने म्हटले- पाक राष्ट्रपतींचे विधान द्वेष पसरवणारे:आमच्या बाबतीत हस्तक्षेप करू नका; झरदारी म्हणाले होते- वाराणसीची मशीद धोक्यात

    पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी भारताच्या मशिदीबद्दल केलेल्या भडकाऊ विधानावर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारताच्या अंतर्गत बाबींवर टिप्पणी करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही.

    Read more

    नाशिक मध्ये फुटली तब्बल 218 मते; नरेंद्र दराडे यांच्या पराभवात भाजप बरोबर राष्ट्रवादीचाही हात!!

    विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिक मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पराभव झाला. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पाडला.

    Read more

    Tamil Nadu : तामिळनाडूतील सीफूड फॅक्टरीत गॅस गळती, 2 जणांचा मृत्यू:65 पेक्षा जास्त जखमी, 9 व्हेंटिलेटरवर; मृतांमध्ये सर्व महिला

    तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात रविवारी एका सीफूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, या अपघातात 2 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर 67 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 9 जण व्हेंटिलेटरवर आहेत. वायू गळतीची घटना सेंट पीटर्स पॉल सीफूड्स एक्सपोर्ट्स युनिटमध्ये घडली.

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले– इराणने हिजबुल्लाहला थांबवावे, अन्यथा पुन्हा हल्ला करू:अमेरिका-इराण यांच्यात 82 मिनिटे चर्चा

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला लेबनॉनमधील त्यांची इस्रायल-समर्थक संघटना, हिजबुल्लाहच्या कारवाया थांबवण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर इराण हिजबुल्लाहला रोखण्यात अयशस्वी ठरला, तर अमेरिका गेल्या आठवड्यापेक्षाही अधिक तीव्र हल्ला करेल.

    Read more

    MP Nagesh Patil Ashtikar : उद्धव साहेबांवर नाराज नाही; सत्तेशिवाय कामे होत नाहीत, मतदारसंघाचा विकास आणि निधीसाठी शिंदेंसोबत जातोय- नागेश पाटील आष्टीकर

    शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची टंचाई हेच असल्याचे स्पष्ट केले आहे.

    Read more

    नाशिक मध्ये महायुतीत मिठाचा खडा; विजयी उमेदवार गोकूळ गीतेंवर माफी मागायची वेळ!!; पण शिवसेनेत प्रवेश करायचा ट्विस्ट!!

    विधान परिषद निवडणुकांचा निकाल समोर आला. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीत मिठाचा खडा पडला. त्यामुळे विजयी अपक्ष उमेदवार गोकूळ गीते यांच्यावर माफी मागायची वेळ आली.

    Read more

    MVA Boycotts : सरकारची कर्जमाफी फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा:महाविकास आघाडीची मागणी; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

    राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.

    Read more

    BAKHARLive