• Download App
    The Focus India

    Latest News

    Madhya Pradesh : देशात पहिल्यांदाच वक्फ बोर्डात 2 हिंदू सदस्य; मध्य प्रदेश सरकारने मनोज मालपाणी आणि अनिमेष भार्गव यांना सदस्य बनवले

    देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम (हिंदू) सदस्यांची नियुक्ती झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने वक्फ बोर्डाची पुनर्रचना करताना इंदूरचे मनोज मालपाणी आणि गुना येथील राघौगडचे रहिवासी अनिमेष भार्गव यांना सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. यासोबतच सनवर पटेल यांची पुन्हा बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले – एका हल्ल्यात इराणी नेतृत्व संपले असते; इराण – तुमच्याकडे ना सभ्यता ना सन्मान; खामेनींच्या अंत्यसंस्काराला जनसागर

    अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी इराणचे संपूर्ण वरिष्ठ नेतृत्व उपस्थित होते आणि अमेरिकेने ठरवले असते तर एकाच हल्ल्यात त्या सर्वांचा खात्मा करता आला असता. मात्र, त्यांनी असे न करण्याचा निर्णय घेतला,

    Read more

    राम मंदिरात चोरी करणाऱ्यांना कठोरातले कठोर शासन करा; राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांचे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींना पत्र!!

    अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात चोरी करणाऱ्यांना कठोरातले कठोर शासन करा!!, अशी मागणी करणारे जाहीर पत्र राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांनी आज प्रसिद्धीला दिले.

    Read more

    अग्निवीरांना सैन्यात कायमची नोकरी; तिन्ही दलांचा सरकारकडे प्रस्ताव; सकारात्मक निर्णयाची अपेक्षा!!

    भारतीय सैन्य दले मजबूत करणाऱ्या अग्निवीरांसाठी लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही सशस्त्र सैन्य दलाने 4 वर्षांनंतर 25 % हून अधिक अग्निवीरांना नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

    Read more

    श्यामाप्रसाद मुखर्जींची 125 वी जयंती स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी ठरली सार्थक!!

    जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती आज स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी सार्थक ठरली!! कारण भारताला खंडित स्वरूपात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 79 वर्षांनी शामाप्रसाद मुखर्जींचे एक महत्त्वाचे स्वप्न त्यांच्या राज्यात साकार झाले.

    Read more

    PoK Protests : PoK मध्ये पाकिस्तानी सैन्याने लोकांवर गोळीबार केला; पाकिस्तान सरकारविरोधात 40 हजार आंदोलक जमले होते; अनेक लोक जखमी

    पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (PoK) रविवारी जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) च्या शांततापूर्ण निदर्शन रॅलीवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. एएनआयच्या वृत्तानुसार, जेएएसीने दावा केला की, अब्बासपूर येथील सरदार गुलाम हुसेन खान स्पोर्ट्स स्टेडियममध्ये सुमारे 40 हजार लोक जमले होते.

    Read more

    WhatsApp : व्हॉट्सॲप-युझरनेम वादावर उत्तर देण्याची मुदत 9 जुलैपर्यंत वाढवली; सरकारने सांगितले- यामुळे ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल अटक प्रकरणे वाढू शकतात

    इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपच्या वादग्रस्त युझरनेम फीचरवर उत्तर देण्यासाठी मेटाची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, आता कंपनीला 9 जुलैपर्यंत आपले उत्तर सादर करावे लागेल. यापूर्वी सरकारने या प्रकरणी व्हॉट्सॲपकडून 6 जुलैपर्यंत उत्तर मागितले होते.

    Read more

    Puri Gajapati : जगन्नाथ पुरीचे राजा दिब्यसिंह यांची इस्कॉनला विनंती; चुकीच्या वेळी रथयात्रा काढू नका; मंदिर प्रशासनाचा दावा – एकाच वेळी रथयात्रा काढणे अशक्य

    पुरीचे गजपती महाराज आणि श्रीजगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती (SJTMC) चे अध्यक्ष दिब्यसिंह देब यांनी इस्कॉनला चुकीच्या वेळी रथयात्रा न काढण्याचे आवाहन केले आहे. इस्कॉन अशा तारखांना यात्रेचे आयोजन करत आहे, ज्या शास्त्रानुसार नाहीत. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

    Read more

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने घटनेपूर्वी इंटरनेटवर इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती गोळा केली होती.

    Read more

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती

    आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

    Read more

    Raigad Waterfall Rescue : रायगडमध्ये धबधब्यावर अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका:वसईत 20 गाड्या बुडाल्या; मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू

    देशभरातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोर धरला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, झेनिथ धबधब्याची पाणी पातळी अचानक वाढल्याने १०० पर्यटक अडकले.

    Read more

    Maharashtra Rain Fury : राज्यात पावसाचा धुमाकूळ; धरणसाठा 26 टक्क्यांवर, मुंबईत ढगफुटीसदृश परिस्थिती, अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर

    राज्यभर मान्सूनने अक्षरशः रौद्ररूप धारण केले असून सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे आणि तलाव तुडुंब भरून वाहत असून धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राज्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 26.42 टक्क्यांवर पोहोचला असून आगामी काही दिवसांत तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    Read more

    Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा तिसरा दिवस, 9 जुलैपर्यंत नोंदणी स्लॉट पूर्ण; प्रशासन म्हणाले- नोंदणी नसेल तर प्रवास टाळा

    जम्मू-काश्मीर प्रशासनाने नोंदणी न करता अमरनाथला पोहोचणाऱ्या यात्रेकरूंना त्यांची यात्रा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यास सांगितले आहे. प्रशासनानुसार, 9 जुलैपर्यंत सर्व नोंदणी स्लॉट पूर्णपणे भरले आहेत.

    Read more

    Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

    कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला.

    Read more

    BLA Claims : BLA चा दावा- हल्ल्यात 30 पाकिस्तानी जवान मारले गेले; स्फोटकांनी भरलेली गाडी शिबिरात घुसून उडवली; पाकिस्तानने दाव्याची पुष्टी केली नाही

    बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यातील जिवानी परिसरात पाकिस्तान कोस्ट गार्ड्सच्या छावणीवर हल्ला केला आहे.

    Read more

    हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; नकारात्मकतेमुळे कम्युनिस्ट संपले, सकारात्मक विचारांमुळे संघ टिकला!!

    “हिंदूंचे संघटन हे कोणाच्याही विरोधात नाही. हिंदू असण्याचा गौरव बाळगणे म्हणजे शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज उभा करणे होय. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली हिंदूंची ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे

    Read more

    Shopian Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये ‘लष्कर’चे 2 अतिरेकी ठार झाल्याचा दावा; पहलगाम हल्ल्यानंतरच्या हिट लिस्टमध्ये समावेश होता; शोपियांमध्ये 3 तास चकमक

    जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथील सैदपोरा परिसरात शनिवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची बातमी आहे. सुरक्षा दलांनी याची पुष्टी केलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (LeT) चे प्रमुख ऑपरेटिव्ह होते.

    Read more

    Ayatollah Khamenei : खामेनींच्या अंत्यसंस्काराला काळे कपडे घालून लाखो लोक पोहोचले; रक्त सांडेल, बदला-बदलाच्या घोषणा दिल्या

    इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शनिवारी तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे लाखो लोक जमले होते. शिया परंपरेनुसार काळे कपडे घातलेल्या लोकांनी छाती बडवून शोक व्यक्त केला. या सोहळ्यादरम्यान, त्यांनी “रक्त सांडेल,” “अमेरिकेचा नाश होवो,” आणि “बदला, बदला” अशा घोषणा दिल्या.

    Read more

    राम मंदिरात चोरी की दरोडा??; नृपेंद्र मिश्रांच्या वक्तव्याला आलोक कुमार यांचा छेद!!

    राम मंदिर देणगीची नुसती चोरी झाली नाही, तर तिथे लूट केली गेली आहे. दरोडा घातला गेला आहे, असा घणाघाती आरोप राम मंदिर निर्माण ट्रस्टचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी केला होता. पण नृपेंद्र मिश्रा यांचे त्या वक्तव्याला विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी आज छेद दिला.

    Read more

    राम मंदिर चोरी प्रकरण : विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत उपाध्यक्ष चंपत राय यांची उपस्थिती अपेक्षित; परिषदेचे सह – महामंत्री सुरेंद्र जैन यांचे वक्तव्य

    राम मंदिर देणगीतील कथित अफरातफर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत चंपत राय यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणे

    Read more

    Chandrima Bhattacharya : ममतांच्या जवळच्या चंद्रिमा यांनी बंगाल टीएमसी अध्यक्षपद सोडले; एक महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला होता

    तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी नियुक्तीच्या अवघ्या एका महिन्यानंतर शनिवारी पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाची इतर सर्व पदेही सोडली आहेत. त्या बंडखोर गटात सामील होण्याच्या अटकळींना वेग आला आहे.

    Read more

    Dattatray Bharne : पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

    राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

    Read more

    उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; २० पैकी किती राहणार हजर आणि किती राहणार गैरहजर??; आकड्याकडे लक्ष!!

    ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. यासोबतच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनीही थेट शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. शिवसेना शिंदे गटात दाखल होताच सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले.

    Read more

    Maharashtra Weather : आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस; बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

    महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

    Read more

    Shrikant Shinde : पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण; मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

    राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असताना, निष्ठावंतांना प्राधान्य देत ओमराजेंना ‘वेटिंग’वर ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी डॉ. श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ खासदार श्रीरंग बारणे यांची नावे आघाडीवर आहेत.

    Read more

    BAKHARLive