अकोट, अंबरनाथ मध्ये सत्तेचे समीकरण जुळले; भाजपचे AIMIM आणि काँग्रेस विरोधातले सोवळे सुद्धा नाही सुटले!!
अंबरनाथ आणि अकोट मध्ये भाजपने अनुक्रमे काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी युती केल्याने भाजप सत्तेसाठी काही करू शकतो
अंबरनाथ आणि अकोट मध्ये भाजपने अनुक्रमे काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी युती केल्याने भाजप सत्तेसाठी काही करू शकतो
नेपाळमध्ये तीन माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा, के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पक्षांकडून युतीची तयारी सुरू आहे. ही युती संसदेच्या वरच्या सभागृहातील ‘राष्ट्रीय सभा’ निवडणुकीसाठी असू शकते. या युतीमध्ये मधेस क्षेत्रातील पक्षालाही समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात मंगळवारी सुलतानपूर येथील MP/MLA न्यायालयात सुनावणी झाली. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले आहे. त्यांना 19 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 2026 मध्ये व्याजदरांमध्ये 0.50% (50 बेसिस पॉइंट्स) ची आणखी कपात करू शकते. IIFL कॅपिटलच्या ताज्या अहवालानुसार, 2025 मध्ये व्याजदरांमध्ये एकूण 1.25% कपात केल्यानंतरही केंद्रीय बँकेकडे दर कपातीसाठी जागा शिल्लक आहे. असे झाल्यास, गृह आणि वाहन कर्जाच्या ईएमआयमध्ये (EMI) आणखी घट होईल, ज्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला मोठा दिलासा मिळेल.
निवडणूक आयोगाने (EC) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, त्याला मतदार यादीचे विशेष सघन पडताळणी (SIR) करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. आयोगाने हे देखील सांगितले की, कोणताही परदेशी नागरिक मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, याची खात्री करणे ही त्याची घटनात्मक जबाबदारी आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!, असेच राजकीय चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर समोर आले.
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तर हे लष्करी युती NATO चा अंत असेल. एका टीव्ही मुलाखतीत फ्रेडरिकसन म्हणाल्या की, जर अमेरिकेने कोणत्याही NATO सदस्य देशावर लष्करी कारवाई केली, तर NATO ची संपूर्ण व्यवस्थाच संपुष्टात येईल. काहीही शिल्लक राहणार नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी त्यांच्यावर फारसे खूश नाहीत, कारण वॉशिंग्टनने रशियन तेल खरेदी केल्यामुळे दिल्लीवर ५०% शुल्क (टॅरिफ) लावले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये हाऊस रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत हे सांगितले. ट्रम्प असेही म्हणाले- पंतप्रधान मोदी स्वतः मला भेटायला आले होते. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले- सर, मी तुम्हाला भेटू शकतो का? आणि मी म्हणालो- हो.
अमेरिकन सैन्याच्या व्हेनेझुएला ऑपरेशनमध्ये पदच्युत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना बऱ्याच जखमा झाल्या आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, 69 वर्षीय फ्लोरेस जेव्हा सोमवारी न्यूयॉर्क न्यायालयात हजर झाल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दोन पट्ट्या लावलेल्या होत्या. एक पट्टी डोळ्याच्या वर आणि दुसरी कपाळावर होती.
रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. रोहित पवारांनी मतदार यादी मध्ये अचानक वाढ केली. ती वाढ करताना त्या यादीत स्वतःचे सगळे नातेवाईक घुसविले, असा आरोप करणारी याचिका क्रिकेटपटू केदार जाधव यांनी हायकोर्टात केली होती. हायकोर्टाने सकृत दर्शनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून निवडणुकीला स्थगिती दिली. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांवर पारदर्शक पद्धतीने समाधानकारक तोडगा काढत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अगस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी वकील गौतम खेतान यांच्या याचिकेवर कठोर भूमिका घेतली. न्यायालयाने याला खटल्यातून वाचण्याचा प्रयत्न म्हटले आणि याचिका फेटाळून लावली. खेतान यांनी मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या (PMLA) एका कलमाला आव्हान दिले होते.
अमेरिकेच्या फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन ॲक्ट (FARA) चे दस्तऐवज सार्वजनिक झाले आहेत. यानुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान हादरला होता.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मोहाळा (ता. अकोट) येथे एका प्रार्थना-स्थळाजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारीला दुपारी घडली. जीवघेण्या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर, मानेवर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील हिदायत पटेल यांच्यावर अकोट येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अकोला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दहा मनपात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ६८ तर मालेगावात इस्लाम पक्षाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला. त्यानंतर ७२ तासांनी विरोधकांनी त्यावर आगपाखड करत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी कधी होणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, बिनविरोधवरून सुरू झालेला वाद अजून पेटलेलाच आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट हल्ला केला.
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांमधील तणाव खूप वाढला आहे. या संपूर्ण प्रकरणात आता कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुले आव्हान दिले आहे. पेट्रो यांनी ट्रम्प यांना सांगितले आहे की, जर हिंमत असेल तर या आणि मला पकडून दाखवा, मी इथेच आहे आणि तुमची वाट पाहत आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानाजवळ मशीद आणि कब्रस्तानला लागून असलेल्या जमिनीवरून 6 जानेवारीच्या मध्यरात्री सुमारे 1 वाजता अतिक्रमण हटवण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमसीडीने 17 बुलडोझरच्या साहाय्याने येथे बांधलेले वरात घर, डायग्नोस्टिक सेंटर, दुकाने पाडली.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे महिलांमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. विकास, संवेदनशीलता आणि जनतेशी थेट संवाद या बळावर पुण्यात शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार, असा विश्वास शिवसेनेच्या ( शिंदे गट) नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आरोप केला की, भाजप कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही, तर केवळ खोटे पसरवण्यावर विश्वास ठेवतो.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन देण्यास नकार दिला. मात्र, इतर 5 आरोपींना 12 अटींसह जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उमर आणि शरजील या प्रकरणात एक वर्षापर्यंत जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत.
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य शशी थरूर म्हणाले की, मी कधीही पक्षाच्या धोरणापासून दूर गेलो नाही. ते म्हणाले की, माझा प्रश्न आहे, मी पक्षाची धोरणे सोडली असे कोणी म्हटले? जेव्हा मी विविध विषयांवर माझे मत व्यक्त केले, तेव्हा पक्ष आणि मी एकाच धोरणावर उभे होतो.
दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या अभिभाषणाने सुरू झाले. यावेळी आम आदमी पार्टी (आप) च्या आमदारांनी गोंधळ घातला, त्यानंतर आपच्या चार आमदारांना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मध्य प्रदेशचे न्यायिक अधिकारी निर्भय सिंह सुलिया यांची बडतर्फी रद्द केली. न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना म्हटले की, फक्त चुकीचे किंवा सदोष न्यायिक आदेश पारित करण्याच्या आधारावर कोणत्याही न्यायिक अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकत नाही. खरं तर, सुलिया यांना २०१४ मध्ये सेवेतून काढण्यात आले होते. तेव्हा ते खरगोन येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावर कार्यरत होते.
सोमवारी आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील राजोल भागात कार्यरत असलेल्या ओएनजीसी तेल विहिरीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. विहिरीवर दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली.
सुरेश कलमाडी कालवश झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा विषयक आठवणी जागविल्या. कलमाडींनी पुण्यापासून दिल्लीचे राजकारण कसे हलविले होते, याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या.
अंबरनाथ आणि अकोट मध्ये भाजपने अनुक्रमे काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी युती केल्याने भाजप सत्तेसाठी काही करू शकतो
मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!, असेच राजकीय चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर समोर आले.
रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. रोहित पवारांनी मतदार यादी मध्ये अचानक वाढ केली. ती वाढ करताना त्या यादीत स्वतःचे सगळे नातेवाईक घुसविले, असा आरोप करणारी याचिका क्रिकेटपटू केदार जाधव यांनी हायकोर्टात केली होती. हायकोर्टाने सकृत दर्शनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून निवडणुकीला स्थगिती दिली. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांवर पारदर्शक पद्धतीने समाधानकारक तोडगा काढत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
सुरेश कलमाडी कालवश झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा विषयक आठवणी जागविल्या. कलमाडींनी पुण्यापासून दिल्लीचे राजकारण कसे हलविले होते, याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या.
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे आहेत, तर ते मुंबई + ठाण्यात आणि पुणे + पिंपरी चिंचवड मध्येच काय अडकलेत??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने समोर आलाय.
सुरेश कलमाडी लक्षात राहतील, ते पुण्यातल्या काँग्रेसचे अखेरचे धुरंधर नेता म्हणून!! कर्नाटकातून पुण्यात येऊन संपूर्ण पुणे शहर काँग्रेसचे नेतृत्व मिळविणे तसे सोपे नव्हते. कारण सुरेश कलमाडी ज्यावेळी पुण्यात आले, त्यावेळी पुण्याच्या काँग्रेसमध्ये मोठ्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांचे नेतृत्व तेव्हा पुण्याच्या क्षितिजात चमकत होते. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर गाडगीळ आणि टिळक हे दोघे पुण्याचे “कारभारी” होते. त्यावेळी पुण्यात काँग्रेसचे दोन गट होते. एक गट गाडगीळांचा, तर दुसरा गट टिळकांचा.
लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढल्यावर काँग्रेसवाले भडकले
गजनीच्या मोहम्मदाने पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ वर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या 1000 वर्षांमध्ये प्रचंड संघर्ष झाले. सोमनाथाचे मंदिर पुन्हा दिमाखाने उभे राहिले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास लेख लिहिला. भारतावर झालेल्या आक्रमणाची आणि भारतीयांनी संघर्ष करून मिळविलेल्या विजयाची आज आठवण करून दिली.