• Download App
    The Focus India

    Latest News

    Indian Railways : ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलता येईल; 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास 50% परतावा; 1 एप्रिलपासून नवीन नियम

    आता तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वीपर्यंत तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकाल. यासोबतच, कन्फर्म तिकीट रद्द केल्यास मिळणाऱ्या परताव्याच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेपासून 4 ऐवजी 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास परतावा मिळेल.

    Read more

    Kim Jong Un : किम जोंग म्हणाले- अणुबॉम्ब ठेवण्याचा निर्णय योग्य होता; इराणवरील हल्ल्याने आम्हाला सत्य सिद्ध केले

    उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी देशाकडे अणुबॉम्ब असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सरकारी माध्यमांनुसार, त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले हे सिद्ध करतात की, त्यांच्या देशाचा अणुबॉम्ब ठेवण्याचा निर्णय योग्य होता.

    Read more

    Gujarat : गुजरातेत UCC विधेयक सभागृहात बहुमताने मंजूर, देशातील दुसरे राज्य बनले; विधानसभेत हलाला प्रथा, अभिनेते धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाचीही चर्चा

    गुजरात भाजपने 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले वचन आता 31 वर्षांनी पूर्ण केले आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी UCC (युनिफॉर्म सिव्हिल कोड) विधेयक सादर केले. यासोबतच उत्तराखंडनंतर UCC लागू करणारे गुजरात देशातील दुसरे राज्य बनले आहे. मुख्यमंत्र्यांनी विधेयक सादर करताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. तसेच भाजपच्या सदस्यांनी बाके वाजवून विधेयकाचे स्वागत केले. या संपूर्ण चर्चेदरम्यान हलाला प्रथा, शाहबानो प्रकरण, धर्मेंद्र यांचे दुसरे लग्न आणि श्रद्धा वालकर प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला.

    Read more

    Karnataka : कर्नाटकात पॉलिसी- मुलांचा स्क्रीन टाइम 1 तास असावा; संध्याकाळी 7 नंतर इंटरनेट बंद; 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मसुदा जारी

    कर्नाटक सरकारने मंगळवारी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या डिजिटल वापरासंदर्भात मसुदा धोरण (ड्राफ्ट पॉलिसी) जारी केले आहे. यात शिफारस करण्यात आली आहे की, अभ्यासाव्यतिरिक्त मनोरंजनासाठी स्क्रीन टाइम दररोज 1 तास

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा- धर्म बदलला तर एससी दर्जा, आरक्षण संपणार; पाद्रीची याचिका फेटाळली

    धर्मांतर आणि अनुसूचित जातीच्या (एससी) दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने व्यापक परिणाम करणारा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्म सोडून इतर धर्म (उदा. ख्रिश्चन, इस्लाम धर्म) स्वीकारत असेल तर ती ‘अनुसूचित जाती’ची सदस्य राहणार नाही. कोर्टाने म्हटले की ही वैधानिक बंदी ‘पूर्ण’ आहे आणि यात कोणत्याही अपवादाला वाव नाही.

    Read more

    35 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळायची अफवा; सरकारचा स्पष्ट शब्दांत खुलासा!!

    गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये पसरत असलेल्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते

    Read more

    Dada Bhuse : RTE विद्यार्थ्यांकडून शाळांनी कोणत्याही स्वरूपात पालकांकडून शुल्क घेऊ नये ; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची स्पष्ट भूमिका

    सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात.

    Read more

    अहिंसेच्याच्या नावाखाली काँग्रेसने हिंदूंना दुबळे आणि घाबरट बनविले; हिंदू संमेलनात शरद पोंक्षेंचे टीकास्त्र

    स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही, हिंदू बहुल भारतात हिंदुंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदुंना त्यांच्या महान वारशाची आणि अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते.

    Read more

    प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??

    प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??, असा सवाल रोहित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आणि सोशल मीडिया पोस्ट मुळे समोर आला.

    Read more

    Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल

    दिल्लीच्या सत्ताकेंद्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना आणि श्वसनासंबंधी त्रास जाणवत असल्यामुळे 79 वर्षीय सोनिया गांधी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणात ठेवण्यात आले असून सध्या

    Read more

    Maharashtra : हवामानाचा अंदाज! राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका, तर मराठवाडा-मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट

    राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता मार्च महिना संपत आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसांपासून हजेरी लावत आहे. दुसरीकडे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.

    Read more

    Chandrashekar Bawankule : तीन महिन्यांत ईटीएसद्वारे पाच वर्षांचे सर्वेक्षण ; राज्यातील अवैध दगडखाणींवर सरकारचा मोठा निर्णय

    राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दगडखाणी आणि गौण खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा करत सांगितले की, गौण खनिज क्षेत्रातील मागील पाच वर्षांतील उत्खननाचे तीन महिन्यांत ईटीएस (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट सिस्टीम) द्वारे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणानंतर अवैध उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

    Read more

    Medha Kulkarni : ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित

    राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत मंगळवारी केली. ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित करीत या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे त्यांनी म्हटले.

    Read more

    LPG Substitute : स्वयंपाकघरातील गॅसचा पर्याय बनेल इथेनॉल; सरकारकडून खास इथेनॉल-शेगड्यांची निर्मिती; एलपीजीची टंचाईमुळे निर्णय

    भारतात आता स्वयंपाकाच्या गॅसचे (LPG) अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल वापरण्याची तयारी सुरू आहे. सरकार इथेनॉल-आधारित कुकिंग स्टोव्ह (चूल) बनवण्यावर काम करत आहे.

    Read more

    अशोक खरातने आपण दैवी अवतार असल्याचं सांगत महिलांच्या योनीत बोट घातले, लघवी पाजली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती

    आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले. त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केला, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

    Read more

    पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका; नव्या वस्त्या, वसाहतींमध्ये संघाचा मोठा जनसंपर्क

    पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुण्याच्या परिसरातील नव्या वस्त्या आणि वसाहतींमध्ये मोठा जनसंपर्क साधला.

    Read more

    प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या दबावामुळेच जय पवारची पत्रकार परिषद रद्द; रोहित पवारांचा आरोप

    अजित पवार यांच्या अपघातानंतर 2 महिने झाली तरी तपास अधिकाऱ्यांकडे स्मरणपत्र दिलेले नाही, सीआयडीकडे काय चाललयं हे माहिती नाही. ⁠राज्यात आम्ही विविध ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेही झालं नाही, पण ⁠कर्नाटकमध्ये आम्ही जाऊन आलो. ⁠

    Read more

    Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर; महिला, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर!

    पुणे महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प आज महापालिकेच्या मुख्य सभेत सादर करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी १५,६६९ कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडले. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांनी यापूर्वी १३,९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते, त्यात स्थायी समितीने १,६७४ कोटी रुपयांची भर टाकून पुणेकरांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत.

    Read more

    Shankaracharya : शंकराचार्य 2.18 लाख सैनिकांची चतुरंगिणी सेना बनवतील; सेना गायी, धर्मशास्त्रे व मंदिरांचे रक्षण करेल

    वाराणसीमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी चतुरंगिणी सेना स्थापन करण्याची घोषणा केली. ते म्हणाले – चतुरंगिणी सेनेत 2 लाख 18 हजार 700 सैनिक असतील. यात देशभरातून लोक भरती होतील.

    Read more

    Ujjal Bhuyan : सुप्रीम कोर्टाचे जज म्हणाले-न्यायव्यवस्था गरजेपेक्षा जास्त कठोर होत आहे; म्हणून लोक तुरुंगात सडत आहेत

    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया म्हणाले की, न्यायव्यवस्थेचा काही भाग ‘राजापेक्षा अधिक निष्ठावान सिंड्रोम’ने ग्रासलेला आहे. म्हणजेच, हे भाग राजापेक्षाही अधिक निष्ठावान असण्याची प्रवृत्ती स्वीकारत आहेत. यामुळेच लोक महिनोनमहिने तुरुंगात सडत राहतात. न्यायमूर्ती भुईया यांनी हे विधान रविवारी बंगळुरू येथे झालेल्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान केले.

    Read more

    दैवी अवतार असल्याचे सांगून अशोक खरात कडून महिलांवर बलात्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत हादरवणारी माहिती

    आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केले, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल, असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    3000 राजमाता जिजाऊ स्मार्ट बसेसचे महाराष्ट्राला लोकार्पण; बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जीपीएस सिस्टीम सह अत्याधुनिक सोयींचा समावेश

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली आणि त्यामधून प्रवास केला.

    Read more

    Dilip Ghosh : भाजपने म्हटले- प.बंगालची स्थिती बांगलादेशसारखी; येथे मंदिर तोडणे सामान्य गोष्ट

    पश्चिम बंगालमधील नंदीग्राम येथे भगवान श्रीरामाची मूर्ती तोडल्याने वाद वाढत आहे. भाजप नेते दिलीप घोष यांनी सोमवारी सांगितले की, बंगालची अवस्था बांगलादेशसारखी झाली आहे. तेथे मंदिरे तोडणे आणि मंदिरांमध्ये चोऱ्या होणे ही सामान्य बाब आहे. हे सर्व ममता बॅनर्जींच्या संरक्षणाखाली होत आहे.

    Read more

    kerala : CPI(M) चा आरोप – निवडणूक आयोगाच्या दस्तऐवजावर भाजपचे सील; आयोगाचे स्पष्टीकरण – ही लिपिकीय चूक

    निवडणूक आयोगाच्या एका दस्तऐवजावर भाजपची सील लागलेली आढळली आहे. सीपीआय (एम) केरळने याला निवडणूक संस्थांच्या निष्पक्षतेसाठी धोका म्हटले आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर भाजपची सील होती. हा केवळ योगायोग नाही आणि यामुळे संस्थांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

    Read more

    अमेरिका – इराण युद्धाचे जगावर दुष्परिणाम; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला करून दिली वास्तवाची जाणीव!!

    अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धाचे संपूर्ण जगावर दुष्परिणाम झालेत हे युद्ध आणखी सुरू राहिले तर आणखी दुष्परिणाम होतील आणि त्याचा भारतावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होईल

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.