• Download App
    The Focus India

    Latest News

    EPF Interest Rate : EPF वर व्याज दर सलग तिसऱ्या वर्षी कायम; सरकारने 8.25% व्याज दराला मंजुरी दिली, याच महिन्यात PF खात्यात पैसे येऊ शकतात

    देशातील 7 कोटींहून अधिक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खातेदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफवरील 8.25 टक्के व्याजदराला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी पीएफवरील व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.

    Read more

    PM Modi : पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले- १२ वर्षांत भारताची जीडीपी दुप्पट, २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर काढले

    फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांतील भारताच्या विकास प्रवासाचा आढावा घेतला. या काळात भारताने आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचा दावा करत त्यांनी देशातील विविध क्षेत्रांतील बदलांची आकडेवारी मांडली.

    Read more

    Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?

    ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या आमदारांवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यालाच बळ देणारे वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. “ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारही शिंदे गटात येतील. एकनाथ शिंदे यांचे नियोजन नेहमीच अचूक असते,” असा दावा त्यांनी केला.

    Read more

    Sanjay Raut : ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाचा प्रतिहल्ला; आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, संजय राऊतांचा इशारा

    महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करताना राऊत यांनी आता ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.

    Read more

    Eknath Shinde : सहा खासदारांच्या बंडानंतर शिंदेंची ताकद वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नवा पॉवर सेंटर’ उदयास?

    महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा लोकसभा खासदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.

    Read more

    Sanjay Shirsat : कालच्या शिवीगाळीचाच आज स्फोट!; 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा दावा, पुढचा निर्णय शिंदे घेतील

    महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत, “काल ठाकरे गटाच्या एका नेत्याने सहा खासदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट आज झाला आहे,” असा दावा केला. या खासदारांना आता त्या पक्षात राहायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, पुढे ते कोणती भूमिका घेतात यावर सर्व चित्र अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.

    Read more

    Operation Tiger : द फोकस एक्सप्लेनर : कसे घडले ‘ऑपरेशन टायगर’? 6 खासदारांचा पत्रातून दावा- ‘शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव होता’

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाची भूमिका घेतल्याचा दावा समोर आला आहे. शिवसेना स्थापना दिनाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिल्लीतील गुप्त बैठका, लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचे सांगितले जाणारे पत्र, जयपूरपर्यंत हलवण्यात आलेले खासदार आणि पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या कथित प्रयत्नांवरून आता शिवसेनेतील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे.

    Read more

    JD Vance’ : नेतान्याहूंना अमेरिकेचा अप्रत्यक्ष इशारा? जे. डी. व्हान्स यांच्या लेबनॉन भूमिकेमुळे इस्रायलची चिंता वाढली

    पश्चिम आशियातील बदलत्या घडामोडींमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी केलेल्या विधानांमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमोर नवी कोंडी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण, लेबनॉन आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर बोलताना व्हान्स यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली असून त्यातील काही मुद्दे इस्रायलच्या भूमिकेशी विसंगत मानले जात आहेत.

    Read more

    ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा; पुढचे टार्गेट कोण??

    ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; नेमका राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा!!, यामुळे सगळ्या देशाचे राजकारण महाराष्ट्रात एकवटले.

    Read more

    US-Iran : अमेरिका-इराण कराराचा मसुदा जाहीर; होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार, ३०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक मदतीची तरतूद

    अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावानंतर दोन्ही देशांनी सामंजस्य कराराचा (एमओयू) १४ कलमी मसुदा जाहीर केला आहे. अंतिम करारावर १९ जून रोजी स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा असून, त्यापूर्वी समोर आलेल्या या मसुद्यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    Read more

    Delhi Police : दिल्लीत आयएसआयचे मोठे दहशतवादी जाळे उद्ध्वस्त; आणखी 5 आरोपी जेरबंद, अटकेतील संख्या 12 वर

    दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या दहशतवादी मॉड्यूलविरोधात मोठी कारवाई करत आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी मंगळवारी या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या संपूर्ण मॉड्यूलमधील अटक आरोपींची संख्या आता 12 वर पोहोचली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

    Read more

    शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!

    नाशिक : शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!, हेच राजकीय वास्तव बंडखोर खासदारांच्या तथाकथित लेटर बॉम्ब मधून समोर आले. उद्धव […]

    Read more

    China-Nepal : नेपाळ-चीनची वाढती जवळीक; भारतासाठी धोक्याची घंटा? हिमालयात बीजिंगचा प्रभाव का वाढतोय?

    दक्षिण आशियातील बदलत्या भू-राजकीय समीकरणांमध्ये नेपाळ आणि चीन यांच्यातील वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय बनत आहे. भारत दौरा संपताच नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी चीनचा दौरा करून सीमापार रेल्वे, वीज ग्रीड आणि संपर्क प्रकल्पांना गती देण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, चीन या प्रकल्पांना आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय)चा भाग मानत आहे.

    Read more

    Akhilesh Yadav’ : उत्तर प्रदेशातही ‘ऑपरेशन’ची चर्चा? अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षात फुटीचा दावा; नेमकं काय घडलं?

    महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता उत्तर प्रदेशातील राजकारणातही मोठ्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि सुभासपा प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

    Read more

    India-UK Free : भारत-यूके मुक्त व्यापार करार 15 जुलैपासून लागू; स्कॉच, कार, सौंदर्यप्रसाधने स्वस्त होणार

    भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यात झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (एफटीए) आता 15 जुलै 2026 पासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे अंमलबजावणीची तारीख जाहीर केली असून, या करारामुळे भारत आणि यूकेमधील व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    PM Modi : जी-7 नंतर पॅरिसमध्ये मोदींचे जोरदार स्वागत; मॅक्रॉन यांच्यासोबत ‘विवाटेक 2026’मध्ये सहभाग

    फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पॅरिसमध्ये दाखल झाले. जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतल्यानंतर ते फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पोहोचले. विमानतळावर भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

    Read more

    Prakash Ambedkar : काँग्रेस भाजपचीच ‘ए टू झेड टीम’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, नांदेडमधील उदाहरण देत साधला निशाणा

    वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस ही प्रत्यक्षात भाजपचीच ‘ए टू झेड टीम’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भाजपविरोधी राजकारणाचा दावा करणारी काँग्रेस प्रत्यक्षात भाजपशी तडजोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    Naresh Mhaske : “तुमचे ‘राजे’ कधी मातोश्रीबाहेर पडले का?”; नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, 65 नगरसेवकांचाही उल्लेख

    महाराष्ट्रातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चांदरम्यान आता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांसाठी शिंदे गटाला जबाबदार धरण्यापूर्वी ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका केली.

    Read more

    “ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची “एन्ट्री”; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!

    “ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची एन्ट्री; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!, हेच राजकीय वास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार कुठल्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले.

    Read more

    1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!

    1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!, ही राजकीय घडामोड आज घडली.

    Read more

    Gen Z : ‘जेन झी’ तरुणांवर संघाचा पूर्ण विश्वास; लोकसंख्येच्या असंतुलनामुळेच 1947 मध्ये फाळणी, सध्या लोकसंख्या संतुलनाची गरज!!

    देशाच्या नव्या म्हणजेच ‘जेन झी’ पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी आहे. आजचे तरुण आपल्या परंपरा आणि भारताच्या गौरवाशी मनापासून जोडले गेले असून समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुणे येथे केले. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. त्याचवेळी श्री आंबेकर यांनी देशातल्या लोकसंख्या संतुलनाची गरज व्यक्त केली. “डेमोग्राफिक चेंज” मुळेच 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    Read more

    Bhaskar Jadhav : ‘डरो मत… जे होणार ते होणारच’:6 खासदारांच्या बंडानंतर भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डरो मत, बिलकुल डरो मत… जो होनेवाला वो होने ही वाला है,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षासाठी हा मोठा धक्का असला तरी खचून न जाता नव्याने संघटन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Arvind Sawant : ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचा पलटवार; “यशस्वी झाले असेल तर चेहरे दाखवा”, अरविंद सावंतांचे थेट आव्हान

    महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई अधिक तीव्र झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. “जर ऑपरेशन टायगर खरोखरच यशस्वी झाले असेल, तर संबंधित खासदारांचे चेहरे आणि पुरावे जनतेसमोर आणा,” असे सावंत यांनी म्हटले आहे.

    Read more

    Operation Tiger : ऑपरेशन टायगर खरोखर यशस्वी की फक्त राजकीय दबावतंत्र?; ठाकरे-शिंदे संघर्षात सस्पेन्स कायम

    महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले कथित ‘ऑपरेशन टायगर’ अद्यापही गूढतेच्या पडद्याआड आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व दावे फेटाळून लावत आपले सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे.

    Read more

    Vidhan Parishad : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान; ६ जागा बिनविरोध, २२ जूनला निकाल

    महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकांची मतमोजणी २२ जून रोजी होणार असून त्यानंतर अंतिम निकाल स्पष्ट होईल.

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.