पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात फक्त दोन कार; केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा घेतला “संदेश”; पण विरोधकांकडून मात्र खिल्ली!!
पश्चिम आशियातल्या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि इंधन पुरवठ्यावर दुष्परिणाम झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या देशावासीयांना इंधन बचतीचा सल्ला दिला. तो त्यांनी आज स्वतःच अंमलात आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राजधानी नवी दिल्लीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना आपल्या ताफ्यात फक्त दोनच गाड्या ठेवल्या. त्यांनी त्यांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल व्यवस्थित पाळला, पण अनावश्यक गाड्या कमी केल्या.