Pakistan Issues : पाक म्हणाला- आमचे पाणी रोखणाऱ्यांचे हात छाटले जातील; सिंधू जल करार अजूनही लागू, भारत एकतर्फी रद्द करू शकत नाही
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला सिंधू जल करारावरून धमकी दिली आहे. पाकिस्तानचे पर्यावरण मंत्री मुसादिक मलिक म्हणाले की, कोणी पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते हात कापून टाकू. त्यांनी दावा केला की भारत पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी रोखू इच्छितो.