• Download App
    The Focus India

    Latest News

    Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जी रुग्णालयात दाखल; डोक्याला मार लागल्यानंतर रक्ताची गाठ, ममता बॅनर्जींकडून भेट

    तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्ताची गाठ झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

    Read more

    Dattatray Bharne : ‘कर्जमाफीची घोषणा लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे संकेत, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत मोठे संकेत दिले आहेत. “शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकार सकारात्मक असून याबाबत लवकरच घोषणा केली जाईल,” असे त्यांनी अहिल्यानगर येथे बोलताना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री आज चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होते. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच चोंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून आचारसंहिता असल्याने काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

    Read more

    Mahayuti : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादीला २ जागा

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक ११ जागांवर उमेदवार देणार असून शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याचे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Garib Nagar : मुंबईत दहशतवादी कटाचा मोठा खुलासा; ‘गरीब नगर’चा बदला घेण्यासाठी हल्ल्याची तयारी

    मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ‘गरीब नगर’ भागातील कारवाईचा बदला घेण्यासाठी काही संशयितांकडून दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू होती. या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

    Read more

    Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम; जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता, पेरणीसाठी शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नजर सध्या मान्सूनकडे लागली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

    Read more

    Nepal PM : ‘भारताने आमची जमीन बळकावली’; नेपाळच्या पंतप्रधानांचा आरोप, लिपुलेख वादात ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी

    भारत-नेपाळ सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी भारतावर नेपाळची जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या वादग्रस्त सीमावर्ती भागांबाबत बोलताना त्यांनी ब्रिटनने या प्रश्नात मध्यस्थी करावी, अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत-नेपाळ संबंधांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

    Read more

    एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!!

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.

    Read more

    शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा

    राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही.

    Read more

    Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई

    केरळमधील मलप्पुरम येथे जप्त करण्यात आलेल्या मोठ्या बेकायदेशीर स्फोटकसाठा प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई करत केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील १९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत स्फोटकांच्या पुरवठा साखळी, वाहतूक नेटवर्क आणि संबंधित व्यक्तींबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    गरीब नगर मधील कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान; दिल्लीत नऊ आरोपींच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा!!

    मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाच दिवसांत जवळपास 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्यात आली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या तपासात ही अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे.

    Read more

    Jacqueliene Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांना मोठा धक्का; २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

    अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि कथित महाठग सुकेश चंद्रशेखर यांना २०० कोटी रुपयांच्या खंडणी व मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पाटियाला हाऊस न्यायालयाने जॅकलिन, सुकेश चंद्रशेखर आणि अन्य १५ आरोपींविरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या बहुचर्चित प्रकरणाच्या खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Read more

    Supreme Court : वन्यजीव जंगलातच सुरक्षित; सुरक्षित वातावरणातून प्राण्यांना हटवणे म्हणजे क्रूरता, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

    वन्यजीवांचे संरक्षण त्यांच्या नैसर्गिक किंवा सध्या ज्या सुरक्षित वातावरणात ते राहत आहेत त्या ठिकाणीच होणे आवश्यक आहे. कायदेशीर परवानगीनंतर सुरक्षित आश्रयस्थानी ठेवण्यात आलेल्या प्राण्यांना पुन्हा दुसरीकडे हलवणे हे त्यांच्यावरील क्रूरतेसमान ठरू शकते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

    Read more

    देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व संघात; मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही राष्ट्रीय बनवायचेय; रमेश पांडव यांचे प्रतिपादन

    देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असून, पहिल्या टप्प्यात भूमीपुत्र असणाऱ्या हिंदू समाजाला राष्ट्रीय बनवावे लागेल. त्यानंतर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही आम्हाला राष्ट्रीय बनवायचे आहे,” असे प्रतिपादन सामाजिक समरसता गतीविधीचे अखिल भारतीय मंडळ सदस्य रमेश पांडव यांनी केले.

    Read more

    Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली

    पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Army Chief : ‘ऑपरेशन सिंदूर २.० साठीही भारतीय सेना सज्ज’; लष्करप्रमुखांचे स्पष्ट संकेत, पाकिस्तानला इशारा

    ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्य कोणत्याही नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. गरज पडल्यास ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ राबवण्यासही सेना तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्याकडे भारताच्या संरक्षण धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

    Read more

    DK Shivakumar : डीके शिवकुमार कर्नाटकचे 24 वे मुख्यमंत्री असतील; सिद्धरामय्यांनी नाव पुढे केले, त्यांचा मुलगाही मंत्री होईल

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आता राज्याचे 24 वे मुख्यमंत्री बनतील. बंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. 28 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे सिद्धरामय्या यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.

    Read more

    पश्चिम बंगाल मध्ये हल्ल्यांची नौटंकी; अभिषेक बॅनर्जी यांच्या पाठोपाठ पुढे आले कल्याण बॅनर्जी!!

    पश्चिम बंगाल मध्ये हल्ल्यांची नौटंकी; अभिषेक बॅनर्जी यांच्या पाठोपाठ पुढे आले कल्याण बॅनर्जी!!, हेच राजकीय वास्तव आज पश्चिम बंगाल मधून पुन्हा समोर आले.

    Read more

    Bhiwandi : पुणे विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर धडक कारवाई; भिवंडीत १,४०० लिटर मिथेनॉल जप्त, तुकाराम मुंढेंची मोठी मोहीम

    पुण्यातील विषारी दारू प्रकरणात १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर छापेमारी मोहीम राबवण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तब्बल १,४०० लिटर मिथेनॉल जप्त करण्यात आले आहे.

    Read more

    IPL 2026 Final Craze : IPL फायनलची उत्कंठा शिगेला, अहमदाबादेत हॉटेलचे दर तिप्पट, विमानभाडेही गगनाला भिडले

    आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून त्याचा थेट परिणाम अहमदाबादच्या पर्यटन आणि प्रवास उद्योगावर दिसून येत आहे. अंतिम सामना पाहण्यासाठी देशभरातून हजारो क्रिकेटप्रेमी अहमदाबादकडे रवाना होत असल्याने हॉटेलचे दर आणि विमानभाड्यात मोठी वाढ झाली आहे.

    Read more

    Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; दगडफेक, अंडीफेक आणि मारहाण, म्हणाले- ‘मला ठार मारण्याचाच कट होता’

    तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे शनिवारी हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी गेलेल्या बॅनर्जी यांच्यावर संतप्त जमावाने दगडफेक, अंडीफेक आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    Read more

    Navnath Ban : ‘पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी ४० आमदार का गेले ते पाहा’; नवनाथ बन यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

    भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना, “पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी तुमच्या पक्षातील ४० आमदार का बाहेर पडले, याचा विचार करा,” असा टोला लगावला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले.

    Read more

    Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाने शरद पवार गटाला धक्का; सुप्रिया सुळे म्हणाल्या- शुभेच्छा, जयंत पाटील म्हणाले- धक्कादायक निर्णय

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

    Read more

    Laxman Hake : ‘जरांगे बाजेवर बसले तर आम्ही ढेकळात बसू’; लक्ष्मण हाकेंचा इशारा, मराठा-ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. जरांगे यांचे आंदोलन सुरू राहिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा हाके यांनी दिला आहे.

    Read more

    Shahu Chhatrapati : मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका; शाहू महाराजांचा सरकारला इशारा

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार शाहू छत्रपती यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर राज्यात मोठा उद्रेक होऊ शकतो.

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.