पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (आप)ही जोरदार तयारी करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे दिल्ली सरकार वृद्धांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा देत आहे, त्याचप्रमाणे गोव्यात आम आदमी पक्षाची सत्ता आल्यास हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांनाही त्यांच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडवली जाईल.AAP Delhi CM Kejriwal in Goa Says if We form govt in goa we will arrange free pilgrimage For People
वृत्तसंस्था
पणजी : पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (आप)ही जोरदार तयारी करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे दिल्ली सरकार वृद्धांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा देत आहे, त्याचप्रमाणे गोव्यात आम आदमी पक्षाची सत्ता आल्यास हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांनाही त्यांच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडवली जाईल.
If we form Govt in Goa, we will arrange free pilgrimage to Ayodhya for Hindus and to Velankanni for Christians. For Muslims, we will provide a free trip to Ajmer Sharif and to Shirdi temple for those who revere Sai Baba: Delhi CM and AAP chief Arvind Kejriwal in Goa pic.twitter.com/vFKcPYMwi4 — ANI (@ANI) November 1, 2021
If we form Govt in Goa, we will arrange free pilgrimage to Ayodhya for Hindus and to Velankanni for Christians. For Muslims, we will provide a free trip to Ajmer Sharif and to Shirdi temple for those who revere Sai Baba: Delhi CM and AAP chief Arvind Kejriwal in Goa pic.twitter.com/vFKcPYMwi4
— ANI (@ANI) November 1, 2021
अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षाचे गोव्यात सरकार आल्यास त्यांच्या पक्षाचे सरकार हिंदूंसाठी अयोध्येला आणि ख्रिश्चनांसाठी वेलंकन्नीला मोफत तीर्थयात्रेची व्यवस्था करेल. त्याचबरोबर मुस्लिमांसाठी अजमेर शरीफ आणि साईबाबांबद्दल श्रद्धा असलेल्यांसाठी शिर्डी मंदिरात मोफत प्रवासाची व्यवस्था सरकार करणार आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही काँग्रेस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी दोन्ही प्रमुख पक्षांना भ्रष्ट म्हटले. बोलले तर तुरुंगात पाठवले जाईल, हे माहीत असल्याने भाजपविरोधात बोलण्याची हिंमत काँग्रेस करत नाही, हेच कारण आहे, असे केजरीवाल म्हणाले. गेल्या 10 वर्षांच्या भाजपच्या राजवटीत काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री किंवा मंत्र्यावर एकही गुन्हा का दाखल झाला नाही?
अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की, काँग्रेस आणि भाजप दोघे मिळून भ्रष्टाचार करत आहेत. दोन्ही पक्षांनी एक गुप्त करार केला आहे. ज्याअंतर्गत ते सरकारमध्ये आल्यावर ते एकमेकांवर कारवाई करत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App