विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – तालिबान्यांच्या ताब्यातील अफगाणिस्तानातून भारताविरोधातील कोणत्याही संभाव्य दहशतवादी कारवायांच्या धोक्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनी दिला आहे.India will fight against terrorism
रावत म्हणाले, की ‘‘ अफगाणिस्तानातील सत्ता ही तालिबान्यांच्या ताब्यात जाईल याचा अंदाज आम्हाला आला होता पण ताज्या घडामोडी या आश्चगर्यचकित करणाऱ्या आहेत. मागील वीस वर्षांमध्ये या संघटनेत थोडाही बदल झालेला नाही.’’
अफगाणिस्तानातून परतणारी मंडळी तिथे तालिबान्यांकडून होणाऱ्या त्यांच्या छळाबाबत आम्हाला सांगत आहेत. मागील वीस वर्षांमध्ये त्यांच्या वर्तणुकीत काडीचाही फरक पडलेला नाही. आता त्यांचे फक्त भागीदार बदलले आहेत, असे रावत म्हणाले.
भारत दहशतवादमुक्त वातावरणासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद करत रावत म्हणाले, की ‘‘ दहशतवाद्यांच्या संभाव्य कारवायांचा वेध घेण्यासाठी ‘क्वाड’च्या सदस्य देशांनी त्याबाबत गुप्त सूचना दिल्या तर आम्ही त्याचे स्वागतच करू.’’ क्वाड संघटनेमध्ये भारतासह अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App