
विशेष प्रतिनिधी
बीजींग – भूराजकीय फायदे मिळविण्यासाठी कोणी दहशतवादाचा आधार घेत असल्यास आमचा त्यांना ठामपणे विरोध असेल, असे चीनने स्पष्ट केले. पाकिस्तानात गेल्या महिन्यात एका बसमध्ये बाँबस्फोट होऊन १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नऊ चिनी नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यामागे भारत आणि अफगाणिस्तानचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. Pakistan targets India and Afghnistan on bus blast
हल्ल्यासाठीचे वाहन अफगाणिस्तानातून आणण्यात आले होते आणि भारताच्या ‘रॉ’ने हल्ला घडवून आणला, असा पाकिस्तानने दावा केला होता. त्यावर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी, हल्ला प्रकरणाची वेगाने चौकशी केल्याबद्दल पाकिस्तानची पाठ थोपटताना, हल्ल्याचा निषेध केला आहे.
‘दहशतवाद हा मानवजातीचा शत्रू असून राजकीय फायदे उठविण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्यास चीनचा ठाम विरोध आहे. सर्व देशांनी एकत्र येत दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा,’ असे या प्रवक्त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या आरोपांचा भारताने इन्कार केला आहे.
Pakistan targets India and Afghnistan on bus blast
महत्त्वाच्या बातम्या
- President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना संबोधन; कोरोना, कृषी, नवे संसद भवन, जम्मू-कश्मीरसह या मुद्द्यांचा उल्लेख
- World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण
- सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला
- सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही
- वीर जवान तुझे सलाम : कॅप्टन आशुतोष आणि मेजर अरुण कुमार पांडे यांना शौर्य चक्र, काश्मीरमध्ये कट्टर दहशतवाद्यांचा केला होता खात्मा