अमेरिकेच्या भारताबरोबरील जवळीकीने इम्रान खान यांचा जळफळाट, म्हणाले सामरिक भागिदारी करायची असेल तर अमेरिकेला आठवतो भारत

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : अमेरिकेच्या भारताबरोबरील जवळीकीमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच जळफळाट झाला आहे. वीस वर्षांच्या लढाईनंतर अफगाणिस्तानात मागे ठेवलेला गोंधळ निस्तरण्यासाठीच पाकिस्तानचा उपयोग असल्याचे अमेरिकेला वाटत. सामरिक भागीदारी करायची असेल तेव्हा अमेरिकेला भारत आठवतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.Imran Khan’s rift with US over India, says US misses India if it wants to forge strategic partnership

परदेशी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान म्हणाले, अफगाणिस्तानच्या समस्येवर लष्करी तोडगा नसतानाही तो शोधण्याच्या २० वर्षांच्या प्रयत्नांनंतर तेथे जो काही गोंधळ झाला, तो काहीही करून निस्तरण्याच्या बाबतीतच पाकिस्तान उपयोगी असल्याचे मानले जाते. अमेरिकेने भारतासोबत सामरिक भागीदारी करायचे ठरवल्यापासून तो देश पाकिस्तानला वेगळी वागणूक देत आहे.



बायडेन यांनी गेल्या जानेवारीत पदभार स्वीकारल्यापासून ते इम्रान खान यांच्याशी न बोलल्याबाबत पाकिस्तान नाराज आहे. अफगाणिस्तानसारख्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात पाकिस्तानला महत्त्वाचा देश मानूनही पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संपर्क साधण्याच्या बायडेन यांच्या अनिच्छेबद्दल पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती.

Imran Khan’s rift with US over India, says US misses India if it wants to forge strategic partnership

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात