सुप्रीम कोर्टाने म्हटले- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला पालकच जबाबदार; तेच मुलांवर दबाव आणतात

वृतसंस्था

नवी दिल्ली : देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमागील सर्वात मोठे कारण म्हणजे पालकांकडून मुलांवर असलेला दबाव असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय टोकाची स्पर्धा हेही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण आहे.Supreme Court said- parents are responsible for suicide of students; They are the ones who put pressure on children

देशातील झपाट्याने विस्तारत असलेल्या कोचिंग सेंटर्सचे नियमन करण्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सोमवारी कोचिंग सेंटर्सना निर्देश देण्यास नकार दिला.



न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, बहुतेक लोक कोचिंग सेटरच्या विरोधात आहेत, परंतु तुम्ही शाळांची स्थिती पाहा. स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांना या कोचिंग सेंटर्समध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो.

14 वर्षांची मुले घरापासून दूर कोचिंग कारखान्यात जात आहेत

याचिकेत म्हटले होते की, 14 वर्षांची मुले घरापासून दूर असलेल्या कोचिंग कारखान्यांमध्ये प्रवेश घेत आहेत. येथे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जोरदार तयारी केली जाते. मुलांची मानसिक तयारी नसते. हे कलम 21 मध्ये दिलेल्या सन्माननीय जीवन जगण्याच्या अधिकाराच्याही विरुद्ध आहे.

एकट्या कोटामध्ये जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या

जानेवारी ते 28 ऑगस्टपर्यंत 24 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 13 विद्यार्थी दोन-तीन महिने ते एका वर्षापेक्षा कमी काळ कोटामध्ये होते. कोचिंग संस्थेत दीड ते पाच महिन्यांपूर्वीच सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. याशिवाय आत्महत्येच्या प्रयत्नाच्या दोन घटनाही समोर आल्या आहेत.

Supreme Court said- parents are responsible for suicide of students; They are the ones who put pressure on children

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात