वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रणतुंगा म्हणाले की, जय शहांचा श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर प्रभाव आहे. त्यांच्या संगनमतानेच श्रीलंकेच्या क्रिकेटची दुरवस्था झाली आहे.Serious allegations by Arjun Ranatunga- Sri Lanka Cricket Board is run by Jai Shah, Indian interference ruined our board
श्रीलंकेचा संघ भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकात 9 पैकी 7 साखळी सामने हरला आणि 10 संघांमध्ये 9व्या स्थानावर राहिला. श्रीलंकेला उपांत्य फेरी गाठण्यात मुकावे लागले आणि 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकला नाही.
1996 मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार म्हणाला – श्रीलंकेचे क्रिकेट जय शहा चालवतात. जय शहांच्या दबावामुळे आमचे क्रिकेट बोर्ड बरबाद होत आहे. एक भारतीय माणूस श्रीलंकेचे क्रिकेट उद्ध्वस्त करत आहे. ते सुद्धा फक्त वडील शक्तीशाली आहेत म्हणून. त्यांचे वडील भारताचे गृहमंत्री आहेत.
श्रीलंका बोर्डात सुरू असलेला गोंधळ
विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या खराब कामगिरीनंतर क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी 6 नोव्हेंबर रोजी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते. श्रीलंका क्रिकेटसाठी अंतरिम बोर्डही स्थापन करण्यात आले. अर्जुन रणतुंगा यांची नवीन अंतरिम मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
क्रीडामंत्र्यांच्या आदेशानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला कोर्टात जावे लागले. बोर्डाच्या अपिलावर न्यायालयाने क्रीडामंत्र्यांचा देशाचे क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय रद्द केला. म्हणजे रणतुंगा हे अंतरिम अध्यक्ष होऊ शकले नाही.
ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित केले आहे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी (10 नोव्हेंबर) श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) निलंबित केले. बोर्डात सरकारच्या हस्तक्षेपानंतर आयसीसीने त्यांचे सदस्यत्व तात्काळ काढून घेतले.
रणतुंगा हे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राहिले आहेत
अर्जुन रणतुंगा 1982 ते 2000 पर्यंत 18 वर्षे श्रीलंकेकडून खेळले. निवृत्तीनंतर ते क्रिकेट प्रशासकही झाले. 2008 ते 2009 पर्यंत ते श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. रणतुंगा राजकारणातही सक्रिय आहेत. श्रीलंका सरकारमध्ये त्यांनी चार मंत्रीपदेही भूषवली आहेत. 2018-19 मध्ये त्यांचा मंत्री म्हणून शेवटचा कार्यकाळ होता. तेव्हा ते श्रीलंकेचे नागरी विमान वाहतूक मंत्री होते.
बीसीसीआय आणि एसएलसीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही
रणतुंगाच्या आरोपांवर भारतीय क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भारतीय क्रिकेट बोर्डाला जगभरातील क्रिकेटवर वर्चस्व गाजवायचे आहे, असा आरोप रणतुंगांनी यापूर्वीही अनेकदा केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App