प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर ईडीने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असून न्यायालय त्यांना कोठडी सुनावणार आहे. त्यामुळे आता मलिक यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. जर त्यांना दीर्घकाळ कारागृहात राहावे लागले तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.ED’s allegations against Nawab Malik
याआधीही गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि बाबासाहेब भोसले या दोन माजी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. कारण कायद्यातही तशी तरतूदच आहे. एखाद्या मंत्र्याला अटक झाली तर त्याला कायद्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. वनमंत्री संजय राठोड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक केल्यावर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
तीन वाजेनंतर संजय राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील, सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटलांना म्हणाल्या- दादा आताच आपली पब्लिसिटी करून घेऊ!
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी पहाटे ताब्यात घेतले, त्यानंतर ८ तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली. या चौकशीनंतर मलिक जेव्हा ईडीच्या कार्यालयाबाहेर आले, तेव्हा त्यांना थेट जेजे रुग्णालयात वैद्यकीय चौकशीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मलिक यांनी हात उंचावत ‘झुकेंगे नही..’ असे जोरदार म्हणत माध्यमांकडे येत होते. मात्र त्याचवेळी त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानांनी त्यांना थेट गाडीत बसवून पुढे जेजे रुग्णालयात नेण्यात आले.
नवाब मालिकांवर ईडीचे आरोप
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App