याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!
याला म्हणतात, Assignment based काम, असंच म्हणायची वेळ शरद पवारांनी आज घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर आली.
याला म्हणतात, Assignment based काम, असंच म्हणायची वेळ शरद पवारांनी आज घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर आली.
शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तरच शरद पवार गटाला एनडीएमध्ये सोबत घेऊ, अशी अट भाजप हायकमांडने टाकली आहे. विलीनीकरण झाले तर सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारांना केंद्रात आणि जयंत पाटील यांना राज्यात मंत्रिपद मिळेल, असे भाजपचे म्हणणे आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दिल्लीतल्या जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून काढल्याचे अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांना जाम दुःख झाले. अरविंद केजरीवालांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला, तर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारला इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शोकोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोनम वांगचुकला पोलिसांनी जंतर-मंतर वरून हलविल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली पण राष्ट्रवादीतल्या संभाव्य फुटी बद्दल मात्र प्रश्न उडवून लावून त्यांनी मौन बाळगले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांना एकत्र येण्याची ऑफर एनडीएने दिली आहे.
NCP(SP) अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत झालेल्या बदलाचे कौतुक केले. ते म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले.
सशक्त लोकशाहीत विरोधकांची सुद्धा संवाद हवा, असे पालुपद शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोलापूर दुसऱ्यांदा लावले. पण या संवादातून सगळ्या डगरींवर हात पाय ठेवण्याची सोय त्यांनी करून घेतली.
सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज सुप्रिया सुळे दुसरे करणार तरी काय??, असा सवाल त्यांच्याच एका वक्तव्यामुळे समोर आलाय.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडणार असून हा पक्ष ‘एनडीए’त (NDA) सामील होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगत पडदा टाकला आहे. “शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही केवळ एक पेरलेली बातमी असून यात कोणतेही तथ्य नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार फुटल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर राहिले. पण उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले असले तरी आमचे खासदार फुटणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
“ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची एन्ट्री; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!, हेच राजकीय वास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार कुठल्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले.
1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
रोहित पवारांनी पंढरपूर मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केले खरे पण त्याचा सरकारवर दुष्परिणाम व्हायच्या ऐवजी त्यांच्यावरच “रिव्हर्स इफेक्ट” झाला. रोहित पवारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने डायरेक्ट शरद पवारांनाच ठोकून काढायची संधी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा विक्रम मोडला. त्या पाठोपाठ भाजप मधल्या नेत्यांनी पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी यांची तुलना सुरू केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला हवा मिळाल्यानंतर काही मराठी माध्यमांनी बातम्यांचे मोठमोठे इमले उभे करायला सुरुवात केली.
खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड; यशवंत मार्गाने पवार काँग्रेस पुढे शरणागत!!, हीच राजकीय वस्तुस्थिती कालच्या घडामोडींमधून समोर आली.
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!, हीच राजकीय वस्तुस्थिती शरद पवारांच्या आजच्या भाषणातून समोर आली.
दिल्लीतल्या रस्त्यांवर पवार + ममतांचे मोठ मोठे फलक; राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या जखमेवर छिडकले नमक!!, हे राजकीय चित्र आजच्या INDI आघाडीच्या बैठकीच्या वेळी समोर आले.
: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष Sharad Pawar यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गॅसच्या किमती वाढवण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिक, महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले.
शरद पवारांनी स्थापन केलेली अखंड राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात तर फुटलीच, पण त्यांची उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस केरळ मध्ये पण फुटली. पवारांनी केलेली मोदींची स्तुती पक्षाला भोवली.
राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; तर ते लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकत नाय!!, हे राजकीय वास्तव केरळ मधल्या विधानसभा निवडणुकीनंतर समोर आले.
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडू मध्ये घडलेल्या राजकारणातून INDI आघाडी फुटली. काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांचे फाटले. द्रविड मुन्नेत्र कळघमने संसदे काँग्रेस पासून दूर बसण्याचे ठरविले. तसे पत्र सुद्धा लोकसभा अध्यक्षांना गेले.
राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी ममता बॅनर्जींना फोन केले. त्यांच्या पराभवाविषयी सांत्वन केले. त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे आश्वासन दिले, पण या सगळ्यांत शरद पवारांनी ममता बॅनर्जींना ना फोन केला, ना पश्चिम बंगालवर त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून आले. शरद पवारांचे सोडा, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ममता बॅनर्जींना पवारांच्या वतीने फोन केल्याची कुठली बातमी आली नाही. त्यामुळेच बाकीचे सगळे नेते INDI आघाडीमध्ये एकवटले असताना शरद पवार मात्र आघाडीपासून तुटले की काय?? याविषयी दाट संशय निर्माण झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर ते आता आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.