• Download App
    Sharad Pawar’ शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले - ती पेरलेली बातमी, आता कोणालाही सोबत जोडणार नाही

    Sharad Pawar’ : शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ती पेरलेली बातमी, आता कोणालाही सोबत जोडणार नाही

    Sharad Pawar’

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sharad Pawar’  महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडणार असून हा पक्ष ‘एनडीए’त (NDA) सामील होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगत पडदा टाकला आहे. “शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही केवळ एक पेरलेली बातमी असून यात कोणतेही तथ्य नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.Sharad Pawar’

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वरिष्ठ पातळीवर काही राजकीय भेटीगाठी घेतल्याचे समजते. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांवर महत्त्वाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “सध्या महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही. आम्ही आमच्यासोबत आता कोणालाही जोडणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.Sharad Pawar’



    शरद पवार यांच्या पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चा फेटाळून लावताना ते म्हणाले, “पवार यांचे आमदार किंवा खासदारही भविष्यात आम्ही फोडणार नाही.” यामुळे महायुती सध्या अंतर्गत बदलांच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

    आम्ही एनडीएला पाठिंबा देणार नाही – आमदार रोहित पवार

    दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार यांचा पक्ष थेट एनडीएत सहभागी होणार किंवा एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणार, अशा दोन प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. या सर्व वावड्यांवर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही एनडीएला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाही,” असे सांगत रोहित पवारांनी या चर्चा केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप केला.

    काही दिवसांपूर्वी होती विलीनीकरणाची चर्चा

    अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. जर शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र आले असते, तर ते ‘एनडीए’सोबत राहणार की ‘इंडिया’ आघाडीसोबत? हा प्रश्न अजित दादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला. मात्र, आता दादांच्या पश्चात जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या या ताज्या आणि महत्त्वाच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते आणि शरद पवार गट काय अंतिम निर्णय घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    भविष्यातील घडामोडींकडे राज्याचे लक्ष

    ठाकरे गटाला लागलेल्या मोठ्या गळतीनंतर विरोधकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यातच शरद पवार यांच्या पक्षाबाबत थेट मुख्यमंत्र्यांनीच दिल्लीतून भूमिका स्पष्ट केल्यामुळे या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, ‘कधी काय होईल हे सांगता येत नाही’ अशी स्थिती असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात नेमके काय घडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    Sharad Pawar’s Party Won’t Join NDA: CM Devendra Fadnavis Clarifies

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Wayanad : वायनाडमध्ये भूस्खलन, 3 मृत्यू; बोगद्याच्या मातीत वाहून आले टँकर-वाहने; अनेकजण दबले; 2024 मध्ये 400 मृत्यू झाले होते

    Monsoon Break : 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस ब्रेक मिळण्याची शक्यता; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा सल्ला

    Lonavala : लोणावळ्यात भीषण भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू