वृत्तसंस्था
नागपूर : ठाकरे – पवार सरकारमध्ये परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे ही बाब निश्चितच चिंतेची आहे, असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. Maharashtra down to no. Three in FDI says RBI
फडणवीस म्हणाले, “आमची सत्ता असताना महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र मागील वर्षभरात हा क्रमांक थेट तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक होते आहे याचा आम्हाला आनंद आहे. Maharashtra down to no. Three in FDI says RBI
मुळात यातले अनेक प्रकल्पांचे एमओयू हे आमच्या काळातच झाले आहेत. मात्र आता पुन्हा ते होत आहेत हरकत नाही महाराष्ट्रासाठी जे चांगलं होते आहे त्याचा आम्हाला आनंदच आहे.”
सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही मागील चार वर्षात आपण पहिल्या क्रमांकाचे FDI चे राज्य केले होते. देशामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक चारही वर्षे महाराष्ट्रात येत होती.
Maharashtra down to no. Three in FDI says RBI
आता आरबीआयने जे आकडेवारी घोषित केली त्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे आणि त्याच्या मागे महाराष्ट्र आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App