म्हणे, गुजरातला पळविलेल्या, मुंबईतील (कागदावरील) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची ‘अधुरी एक कहाणी..’


२७ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार, ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांच्या नियामक मंडळाचे कार्यालय’ अहमदाबादेत असेल; स्वतः आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र नव्हे! आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, मुंबईत अद्याप तरी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र झालेलेच नाही. याउलट अहमदाबादमध्ये ते २०१३ मध्येच कार्यान्वित झालेले आहे. त्यामुळे न झालेले मुंबईचे केंद्र अगोदरच आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बनविलेल्या गुजरातमध्ये पळविल्याचा आणि ते ही महाराष्ट्र दिनी हा केवळ अपप्रचार असल्याचे दिसते आहे.


सागर कारंडे

मुंबई, नवी दिल्ली : ‘महाराष्ट्रदिनी महाराष्ट्रद्रोह’…. अशा स्वरूपाच्या बातम्या १ मे रोजी दिवसभर विविध वृत्तवाहिन्या, सोशल मीडियामध्ये चालविण्यात आल्या. निमित्त होते ते मुंबईतील (कथित) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला (अहमदाबादला) “हलविण्या”च्या बातमीचे! ‘महाराष्ट्रावर अन्याय’, ‘मोदींचा महाराष्ट्रद्वेष’, ‘अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत..’, अशा स्वरूपाच्या टिप्पण्या चालू आहेत. नेमकी काय वस्तुस्थिती आहे? खरोखच महाराष्ट्रदिनीच मुंबईतून हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला पळविण्यात आले आहे काय?

जेव्हा अधिक माहिती घेतली, संदर्भ तपासले आणि संबंधित वरिष्ठ अधिकारयांशी चर्चा केली, तेव्हा अनेक गोष्टी उलगडल्या. विशेष म्हणजे, ज्या बातमीवरून मोदी आणि भाजपवर कडाडून टीका केली गेली, ती सुद्धा ‘फेक न्यूज’ असल्याचे स्पष्ट होत आहे. २७ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार, ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांच्या नियामक मंडळाचे कार्यालय’ अहमदाबादेत असेल; स्वतः आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र नव्हे! आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, मुंबईत अद्याप तरी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र झालेलेच नाही. याउलट अहमदाबादमध्ये ते २०१३ मध्येच कार्यान्वित झालेले आहे. त्यामुळे न झालेले मुंबईचे केंद्र अगोदरच (पुढील पन्नास वर्षे पुरेल एवढे) आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र तयार झालेल्या गुजरातमध्ये पळविले आणि ते ही महाराष्ट्र दिनी हा केवळ अपप्रचार असल्याचे दिसते आहे.

या प्रकरणातील काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :

  • मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र बनविण्यासाठी तत्कालीन यूपीए सरकारचा २००७मध्ये अहवाल. मात्र, त्यानुसार आघाडीच्या महाराष्ट्र सरकारकडून २०१४पर्यंत साधा प्रस्तावही दाखल नाही. यूपीए सरकारनेही केली स्वतःच्याच अहवालाकडे डोळेझाक.
  • तत्कालीन काँग्रेस सरकारच्या असहकार्यामुळे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०११ मध्ये अहमदाबादेत ‘गिफ्ट सिटी’चे (गुजरात इंटरनॅशनल फायन्सायियल टेक सिटी) काम सुरू केले आणि २०१३मध्ये पहिला टप्पा पूर्णही केला. २०१५मध्ये त्यास आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा दर्जा
  • फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५मध्ये महाराष्ट्राकडून प्रथमच अधिकृत प्रस्ताव सादर. मात्र, मुंबईत (बीकेसीत) सलग पन्नास एकर जागा न उपलब्ध झाल्याने तांत्रिक अडचण.
  • सध्या देशातील एकमेव आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे ते अहमदाबादमध्ये. त्यामुळे मुंबईचे केंद्र गुजरातला ‘हलविले’, ही केवळ हाकाटी.
  • २०१९ मध्ये संसदेने केलेल्या कायद्यानुसार, या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांसाठी जे नियामक मंडळ (Regulatory Authority) असेल त्याचे कार्यालय अहमदाबादमध्ये असेल, अशी अधिसूचना २७ एप्रिल २०२० प्रसिद्ध. म्हणजे मुंबईचे आंतरराष्ट्रीय केंद्र नव्हे, तर या केंद्रांचे नियामक मंडळ कार्यालय अहमदाबादला असेल. मुंबईचे केंद्र अजूनही फक्त कागदावरच आहे!

उपलब्ध संशोधित माहितीनुसार, या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांचा प्रवास तब्बल १४ वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे दिसत आहे. त्याच्या प्रवाशाची ही कहाणी…

  • २००६ : एका बाजूला लंडन आणि दुसऱ्या बाजूला सिंगपूर, जेथे अशा दोन बिजनेस सेंटर्स मधल्या टाइम-झोनमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बनविल्यास त्यास असाधारण महत्व मिळेल, असा स्वरूपाचा प्रस्ताव अहमदाबादसाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडे पाठविला.
  • २००७ : तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मुंबईसाठी असे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बनविण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली.
  • २०११ : केंद्राकडून परवानगी मिळत नसल्याचे लक्षात येताच तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांनी गुजरात सरकारमार्फतच ‘गिफ्ट सिटी’च्या (गुजरात इंटरनॅशनल फायन्सायियल टेक सिटी) कामास प्रारंभ केला.
  • २०१३ : ६ कोटी २० लाख स्क्वेर-फूट बिल्ड-अप एरिया असलेल्या, ८८६ एकर मध्ये पसरलेल्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या १० टॉवर्स पैकी सगळ्यात उंच म्हणजे १२९ मीटर उंची असलेले २९ मजली आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांच्या हस्ते उदघाटनही करण्यात आले.
  • २०१४ : केंद्रात व महाराष्ट्रात सत्तांतर. गंमत म्हणजे, तोपर्यंत म्हणजे सात वर्षानंतरही मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभा करण्यासाठी अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केंद्राला सादर केलेला नव्हता. केंद्रानेही स्वतःच नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालावरील धूळ झटकण्याचे कष्ठ घेतलेले नव्हते.
  • २०१५ : केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंदर्भात ‘एसईझेड’च्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर गुजरातने ‘गिफ्ट सिटी’चा प्रस्ताव सादर केला आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुंबईचाही प्रस्ताव सादर केला. स्वाभाविकपणे, अहमदाबादच्या ‘गिफ्ट सिटी’चे काम पूर्ण झाल्याने त्यास आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा दर्जाही मिळाला.
  • २०१६ : सलग पन्नास एकर जागा हवी असल्याने ‘बीकेसी’मधील प्रस्तावात तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर करून केंद्राकडून बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे स्टेशनसह आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचाही विचार सुरू केला.
  • २०१७ : संसदेत तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले की, दोन आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांची गरज आहे का, यावर आम्ही विचार करीत आहोत. याबाबत महाराष्ट्र सरकारचा अहवाल सादर मिळालेला आहे.
  • २०१९ : अशा आर्थिक वित्तीय सेवा केंद्रांच्या नियंत्रणासाठी एक नियामक मंडळ असावे, म्हणून केंद्र सरकारने International Financial Services Centres Authority Act 2019 संसदेत पास केला. २३ डिसेंबर २०१९ रोजी त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली.
  • २७ एप्रिल २०२० : या कायद्यान्वये अधिसूचना निघाली असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांच्या नियामक मंडळाचे कार्यालय अहमदाबादमध्ये असल्याचे नमूद केले आहे.

…………………………………………………………………………………………….

‘आज गळा काढणारे सात वर्षे झोपले होते…’

आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभा करण्यासाठी अक्षरशः शून्य योगदान दिले. साधा प्रस्तावसुद्धा त्यांनी सात वर्षे म्हणजे २०१४पर्यंत सादर केला नाही. तेवढ्या वेळात गुजरातने पहिला टप्पाही पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासाठी मुंबईचा दावा हा अतिशय नैसर्गिक आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याचा पाठपुरावा केला तर निश्चितपणे मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन होऊ शकते… अजूनही वेळ गेलेली नाही.

: देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री

………………………………………………………………………………………..

वस्तुस्थिती माहित असूनही सुभाष देसाईंचे राजकारण

२०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्रात उद्योग मंत्री होते शिवसेनेचे सुभाष देसाई. आजही महाविकास आघाडीमध्येही तेच उद्योगमंत्री आहेत. त्यांना उद्योगमंत्री या नात्याने ही सगळी वस्तुस्थिती माहित असून त्यांनी केंद्रावर टीका केली. उद्योगमंत्री या नात्याने ते अजूनही फाॅलोअप करून मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र निर्माण करू शकतात. कारण देशात फक्त एकच आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असेल, असा नियम नाही.

………………………………………………………………………………………..

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात