० उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक ही भाजपाशासित राज्ये आघाडीवर आहेतच; पण काँग्रेसशासित राजस्थान व पंजाबही नाही मागे
० इन्स्पेक्टर राजचा खात्मा, कामगार संघटनांवर फुली आणि कामगारांना काढून टाकण्याच्या अटी अत्यंत लवचिक!
० कामांच्या वेळा १२ तासांवर, दुकाने व आस्थापने पहाटे ते मध्यरात्रीपर्यंत चालू राहणार
सागर कारंडे
नवी दिल्ली : चीनी व्हायरसचे संकट कोसळले आणि राज्ये शोधू लागली या संकटांवर मात करण्याचे पर्याय. पहिले आव्हान संसर्ग रोखण्याचे आणि दुसरे, नोकर्या वाचविण्याचे व त्याचवेळी नव्या नोकर्या निर्माण करण्याचे.
कसे पेलायचे हे आव्हान? त्यातूनच राज्याराज्यांमध्ये जुनाट कामगार कायद्यांमध्ये क्रांतिकारी बदल करण्यास प्रारंभ झाला. सुरूवात केली ती उत्तर प्रदेशने. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका झटक्यात राज्यातील सर्व कामगार कायदे तीन वर्षांसाठी स्थगित केले. अपवाद फक्त तीन कायद्यांचा आणि चवथ्या कायद्यातील फक्त एका कलमाचा! आदित्यनाथांच्या या धाडसी निर्णयाने अनेकांना धक्काच बसला. स्वाभाविकपणे कामगार संघटनांकडून टीका सुरू झालीय, पण त्याचवेळी उद्योगांनी त्यांचे स्वागत केले आहे.
हा धाडसी निर्णय घेण्याचे कारण म्हणजे जवळपास एक कोटींच्या आसपास स्थलांतरीत मजूर आपल्या घरी म्हणजे उत्तर प्रदेशात परतण्याचा अंदाज आहे. त्यापैकी पुन्हा किती जण आणि केव्हा आपल्या मूळ रोजगाराच्या ठिकाणी जातील, याचा अंदाज नाही. या सर्वांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी अचानकपणे योगी आदित्यनाथांवर येऊन पडली आहे. पुरेसा रोजगार निर्माण झाला नाही तर सामाजिक अस्थिरता निर्माण होईल, आर्थिक चक्रे ठप्प होतील, अशी भीती आहे. त्यापार्श्वभूमीवर नवी गुंतवणूक आकर्षित करणे, विशेषतः चीनमधून भारतात येऊ पाहणारया कंपन्यांना रेड काॅर्पेट अंथरणे, त्यांच्यासाठी सुविधा देणे आणि स्वस्त मनुष्यबळाच्या मदतीने मागास उत्तर प्रदेशाचे औद्योगिकीकरण करणे, असे धोरण आदित्यनाथांचे आहे.
उत्तर प्रदेशापाठोपाठ मध्य प्रदेशनेही धाडसी निर्णय घेतले. त्यांनीही दूरगामी परिणाम करणारया दुरूस्त्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पंजाबनेही कामगार कायद्यांत सुधारणांचा झपाटा लावला आहे. विशेष म्हणजे, गुजरातचा अपवादवगळता ही राज्ये औद्योगिकदृष्ट्या मागास मानली जातात. त्यामुळेच देशाच्या औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणारया या राज्याराज्यांमधीस सुधारणांचा घेतलेला हा लेखाजोखा…
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
गुजरात
राजस्थान
कर्नाटक
(याशिवाय पंजाब, हिमाचल प्रदेशाने कामांच्या वेळा बारा तासांवर नेल्या आहेत. तर केरळने गुंतवणूकदाराने एकाच वर्षांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची हमी दिल्यास सात दिवसांत औद्योगिक परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App