विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले कठोरपणे मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने १८९७ च्या साथीच्या रोग प्रतिबंधक कायद्यात अध्यादेश काढून सुधारणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ताबडतोब नवा कायदा अमलात येईल.
डॉक्टर, वैद्यकीय, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले आता कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. त्यांच्या सुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App