Lockdown in Bihar : बिहारमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करून माहिती दिली. तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समूहाला विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी करण्यासही सांगितले आहे. Lockdown in Bihar till May 15, Information of Chief Minister Nitish Kumar on Twitter
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करून माहिती दिली. तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समूहाला विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी करण्यासही सांगितले आहे.
सोमवारी पाटणा उच्च न्यायालयाने कोरोना संसर्गाची वाढ आणि उपचारांबाबत कठोर भूमिका घेतली. कोर्टाने अॅडव्होकेट जनरल यांनी राज्य सरकारशी बोलून मंगळवारी 4 मे रोजी राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही, हे सांगण्याचे निर्देश दिले. तसेच हा निर्णय घेतला नाही तर उच्च न्यायालय कठोर निर्णय घेऊ शकते, असाही इशारा दिला होता. कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने हा प्रश्न विचारला होता.
कल सहयोगी मंत्रीगण एवं पदाधिकारियों के साथ चर्चा के बाद बिहार में फिलहाल 15 मई, 2021 तक लाॅकडाउन लागू करने का निर्णय लिया गया। इसके विस्तृत मार्गनिर्देशिका एवं अन्य गतिविधियों के संबंध में आज ही आपदा प्रबंधन समूह (Crisis management Group) को कार्रवाई करने हेतू निदेश दिया गया है। — Nitish Kumar (@NitishKumar) May 4, 2021
कल सहयोगी मंत्रीगण एवं पदाधिकारियों के साथ चर्चा के बाद बिहार में फिलहाल 15 मई, 2021 तक लाॅकडाउन लागू करने का निर्णय लिया गया। इसके विस्तृत मार्गनिर्देशिका एवं अन्य गतिविधियों के संबंध में आज ही आपदा प्रबंधन समूह (Crisis management Group) को कार्रवाई करने हेतू निदेश दिया गया है।
— Nitish Kumar (@NitishKumar) May 4, 2021
उच्च न्यायालयाने म्हटले की, आदेशानंतरही कोरोना रुग्णांसाठी उपचाराच्या सुविधा वाढविण्यात आल्या नाहीत. राज्यातील रुग्णालयांमध्ये अखंडित ऑक्सिजन पुरवठ्यासाठी कोणतीही ठोस कृती योजना नाही. केंद्राच्या कोट्यातून मिळत असलेल्या दिवसाला 194 टनाऐवजी केवळ 160 टन ऑक्सिजन उचलला जात आहे. कोरोनाच्या विस्फोटाचा सामना करण्यासाठी राज्यात कोणतीही सल्लागार समिती गठित झालेली नाही, वॉर रूमही बनलेले नाही.
सोमवारी, बिहारमध्ये कोरोनामुळे 174 जणांचा मृत्यू झाला. पाटणा येथे 42, बिहारमधील इतर जिल्ह्यात 132 जणांचा मृत्यू झाला. तथापि, आरोग्य विभागाच्या मते, राज्यात 82 जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. मगध, भोजपूर आणि सारणमध्ये कोरोनामधून 59 जणांना आपला जीव गमवावा लागला. दररोजची रुग्णसंख्या व मृत्यूंची संख्या वाढत असल्याने राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
Lockdown in Bihar till May 15, Information of Chief Minister Nitish Kumar on Twitter
महत्त्वाची बातमी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App