विशेष प्रतिनिधी
चंदीगड – हरियाना सरकारने संपूर्ण राज्यात ३ मे ते नऊ मेपर्यंत एक आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन लागू केल्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले. तत्पूर्वी हरियाना सरकारने शुक्रवारी रात्री दहा ते सोमवारी पहाटे पाच पर्यंत नऊ जिल्ह्यांत विकएंड लॉकडाउन लागू केला होता. Lockdown extended in Haryana
हरियानात काल १३,३२२ नव्याने रुग्ण आढळून आले तर १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १०,४२२ रुग्ण बरे झाले आहे. संसर्ग पसरण्याचा दर ६.८९ टक्क्यांवर पोचला असून बरे होण्याचा दर घसरला आहे. तो ७८.६८ टक्क्यांवर पोचला आहे. राज्यातील १४४१ गंभीर रुग्णांपैकी १२३८ जण ऑक्सिजनवर आणि २०३ व्हेटिंलेटर सपोर्टवर आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले की, कोरोनाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा. कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी सरकार गंभीर असून परिस्थितीवर मात करत आपल्याला पुढे जायचे आहे.
या लढाईत भीतीदायक वातावरण तयार करू नये आणि सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. येत्या ९ मे पर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागू असेल, असे ते म्हणाले. दरम्यान, लॉकडाउन काळात काही क्षेत्रांना सवलत दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App