देशातील महामार्गांवरील टोलमध्ये आजपासून वाढ

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशातील महामार्गांवरील टोलमध्ये वाढ केली आहे. वाढलेले दर १ एप्रिलपासून लागू होतील. अधिसूचनेनुसार ही वाढ १० ते ६५ रुपयांपर्यंत आहे. टक्केवारीतील ही वाढ १० ते १८ टक्क्यांपर्यंत आहे. छोट्या वाहनांसाठी किमान एकेरी टोल दरात १० रुपये वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिक वाहनांना अंतरानुसार कमाल ६५ रुपये टोल भरावा लागेल. Increase in toll on highways in the country from today

NHAI प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला टोल दरांचे पुनरावलोकन करते आणि बदलते. NHAI प्रकल्प संचालक एन.एन.गिरी यांनी टोल दरात बदल झाल्याचा दुजोरा दिला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांना महागाईचा आणखी फटका बसणार आहे.



दिल्ली-जयपूर महामार्गावरील खेरकी दौला टोल प्लाझा येथे, कार चालकांना आता एकेरी प्रवासासाठी ७० ऐवजी ८० रुपये मोजावे लागतील, तर ट्रक-बस आणि इतर मोठ्या वाहनांना २०५ ऐवजी २३५ रुपये मोजावे लागतील. देशभरातील सर्व टोलनाक्यांना या दरवाढीची माहिती देण्यात आली असून त्यानुसार सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात आले आहे.

६० किमी लांबीच्या दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवरील मोफत प्रवासाचे दिवस आता संपले आहेत. येथे १ एप्रिलपासून वाहनचालकांना टोल भरावा लागणार आहे. एवढेच नाही तर आधीच ठरलेल्या दरातही १० टक्के वाढ करण्यात आली आहे. आता कार – सराय काले खान ते काशी टोल प्लाझा पर्यंत कार-जीप चालकांना १४० ऐवजी १५५ रुपये मोजावे लागणार आहेत. इंदिरापुरम ते मेरठला जाणाऱ्या कार चालकांना काशी टोल प्लाझावर १०५ रुपये मोजावे लागतील.

Increase in toll on highways in the country from today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात