वृत्तसंस्था
सीतापूर : उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत लखीमपूर खीरी हिंसाचारावर लागलेले लक्ष आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीतापूरकडे वळविले आहे. कारण सीतापूरच्या सरकारी डाक बंगल्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने स्थानबद्ध करून ठेवले आहे. Congress workers turn their attention from Lakhimpur violence to Sitapur !!
प्रियंका गांधी या काल लखीमपूरकडे रवाना होत असताना त्यांना पोलिसांनी सीतापूर मध्ये डाक बंगल्यात ठेवले आहे. काल दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात विविध ठिकाणी लखीमपूरच्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ निदर्शने केली. परंतु आज सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लखीमपूरवरून वळून सीतापूरकडे लागले आहे.
#WATCH Congress workers break barriers, raise slogans in Sitapur as party leader Priyanka Gandhi Vadra remains under detention at a city guest house. She was detained yesterday while she was on her way to Lakhimpur Kheri. pic.twitter.com/UlLQNL0R8W — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 5, 2021
#WATCH Congress workers break barriers, raise slogans in Sitapur as party leader Priyanka Gandhi Vadra remains under detention at a city guest house. She was detained yesterday while she was on her way to Lakhimpur Kheri. pic.twitter.com/UlLQNL0R8W
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 5, 2021
काल रात्री पासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीतापूरच्या सरकारी डाक बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज कार्यकर्त्यांची तिथे जोरदार गर्दी झाली आहे. उत्तर प्रदेशातून विविध शहरे आणि गावांमधून काँग्रेस कार्यकर्ते सीतापूरकडे वळले आहेत. प्रियांका गांधी यांना सोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सीतापूरमध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स तोडली आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्या. याचा अर्थच असा की काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लखीमपूर हिंसाचाराकडे असण्यापेक्षा आपल्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या सुटकेकडे अधिक लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App