पीएम मोदींनी लिहिले, ‘आरोग्य पायाभूत सुविधांच्या सुधारणासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची प्रचंड क्षमता आहे आणि भारत या दिशेने कठोर परिश्रम घेत आहे.’Bill Gates praises ‘Ayushman Bharat Digital Health Mission’, PM Modi expresses gratitude
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशन’ सुरू केले.याद्वारे आरोग्य सेवा डिजिटल केल्या जातील.या मोहिमेअंतर्गत, भारतीयांचा युनिक हेल्थ आयडी तयार केला जाईल.भारताच्या या मिशनचे अमेरिकन अब्जाधीश बिल गेट्स यांनीही कौतुक केले आहे.
त्यांनी पीएम मोदींचे अभिनंदन केले, ज्यावर पीएम मोदींनीही कृतज्ञता व्यक्त केली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे कौतुक करताना बिल गेट्सने पीएम मोदींचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करताना लिहिले, ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या शुभारंभाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन. हे डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा सर्वांसाठी आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यात आणि भारताची आरोग्य ध्येये साध्य करण्याच्या दिशेने प्रगती करण्यास मदत करेल.
पीएम मोदींनी बिल गेट्स यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांचे आभारही मानले.पीएम मोदींनी लिहिले, ‘आरोग्य पायाभूत सुविधांच्या सुधारणासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची प्रचंड क्षमता आहे आणि भारत या दिशेने कठोर परिश्रम घेत आहे.’ यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये बिल गेट्स यांनी आयुषमान भारत योजनेचे कौतुक केले होते. आयुष्मान भारत योजनेचे १०० दिवस पूर्ण झाल्यावर गेट्स यांनी हे ट्विट केले.
Thank you @BillGates for the kind words on the Ayushman Bharat Digital Mission. There is immense scope in leveraging technology for betterment of health infrastructure and India is working hard in this direction. https://t.co/eprhyeAbJn — Narendra Modi (@narendramodi) September 29, 2021
Thank you @BillGates for the kind words on the Ayushman Bharat Digital Mission.
There is immense scope in leveraging technology for betterment of health infrastructure and India is working hard in this direction. https://t.co/eprhyeAbJn
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2021
त्या वेळी, सरकारी आकडेवारीमध्ये असे उघड झाले की १००दिवसात ६.८५ लाखांहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यावर बिल गेट्स यांनी स्तुती केली आणि म्हणाले की ‘१००दिवसात इतक्या लोकांना लाभ मिळाला हे पाहून खूप आनंद झाला’. आयुष्मान भारत योजना सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App