प्रतिनिधी
अमृतसर : अमृतपाल सिंग हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या खास आहे. यासोबतच परदेशात बसलेल्या दहशतवादी गटांशीही त्याचे संबंध आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत.Who is Amritpal Singh? How did Dubai truck driver Amritpal come in contact with ISI? Also links with foreign terrorists
तसेच त्याच्याशी संबंधित सर्व बाबींची बारकाईने तपास केला जात आहे. त्याच्या बँक खात्यातील सर्व लिंक्सचीही चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो यूकेमध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी अवतार सिंग खांडा याचा जवळचा सहकारी आहे.
बंदी घातलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलचा म्होरक्या परमजीत सिंग पम्मासोबतही त्याचे संबंध चांगले आहेत. तो शीख तरुणांना कट्टरतावादी बनवण्यासाठी वैचारिक प्रशिक्षण देतो. याशिवाय तो इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे प्रमुख लखबीर सिंग रोडे यांच्या जवळचा आहे.
हे तीन दहशतवादी पंजाबचे वातावरण बिघडवण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहेत. अमृतपाल हा दुबईत ट्रान्सपोर्टचे काम करत असताना तो रोडेचा भाऊ जसवंत याच्या संपर्कात होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचवेळी तो आयएसआयच्या जवळ आला.
त्याला आयएसआय एजंट्सनी निरपराध तरुण शिखांना धर्माच्या नावाखाली भडकवायला सांगितल्याचं समजतं. अमृतपाल सिंग गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आयएसआयच्या सांगण्यावरून भारतात आला होता. तसेच वारीस पंजाब देची सूत्रे त्याने हाती घेतली.
तिथे असतानाच त्यांनी खालसा वाहीर नावाची मोहीम चालवण्याची तयारी केली होती. याआधी वारिस पंजाब दे संस्थेचा प्रमुख दीप सिद्धू यांचा मागच्या वर्षी रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. यानंतर अमृतपालला संस्थेचे प्रमुख करण्यात आले.
अमृतपाल सिंग हा अमृतसरच्या जल्लूपूर खेडा गावचा रहिवासी आहेत. 12वी पास अमृतपाल दुबईला गेला. तो तिथे ट्रक चालवत असे. पुढे तो वाहतूक व्यवसायात उतरला. यादरम्यान तो पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेच्या संपर्कात आला.
दीप सिद्धूने 30 सप्टेंबर 2021 रोजी या संस्थेची पायाभरणी केली. शेतकरी आंदोलन आणि त्यानंतर 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात दीप सिद्धूचे नाव आले होते. 15 फेब्रुवारी 2022 रोजी दिल्लीहून पंजाबला परतत असताना दीप सिद्धूचा सोनीपतजवळ रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.
दरम्यान, अमृतपाल दुबईहून परतला आणि 29 सप्टेंबर 2022 रोजी मोगाच्या गंच रोडला पोहोचला. हे गाव जरनैलसिंग भिंद्रनवाले यांचे वडिलोपार्जित गाव आहे. स्वत:ला भिंद्रनवालेचा समर्थक म्हणून सांगणारा अमृतपाल 29 सप्टेंबर रोजी वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख बनला. यानंतर त्याने केंद्र सरकार, लष्कर, सरकारच्या यंत्रणेला आव्हान देण्यास सुरुवात केली. खलिस्तान बनवण्यासाठी तरुणांना तो आपल्या जाळ्यात ओढत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App