TMC MP Santanu Sen : राज्यसभेत आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे निवेदन फाडणारे तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) खासदार शांतनु सेन यांनी आता केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, हरदीप पुरी यांनी त्यांना अपशब्द म्हटले, ते मारहाण करणार होते, पण सहकाऱ्यांनी त्यांना वाचवले. सेन यांनी पेगॅसस मुद्द्यावर मंत्री वैष्णव यांच्या निवेदन सुरू असताना त्यांच्या भाषणाची प्रत हिसकावून फाडली. सेन यांनी असा दावा केला की, पुरी यांनी त्यांच्याकडे पाहून अभद्र हावभाव केले. tmc mp santanu sen alleges union minister hardeep singh threatened hims in rajya sabha
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेत आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे निवेदन फाडणारे तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) खासदार शांतनु सेन यांनी आता केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, हरदीप पुरी यांनी त्यांना अपशब्द म्हटले, ते मारहाण करणार होते, पण सहकाऱ्यांनी त्यांना वाचवले. सेन यांनी पेगॅसस मुद्द्यावर मंत्री वैष्णव यांच्या निवेदन सुरू असताना त्यांच्या भाषणाची प्रत हिसकावून फाडली. सेन यांनी असा दावा केला की, पुरी यांनी त्यांच्याकडे पाहून अभद्र हावभाव केले.
सेन यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, केंद्रीय मंत्र्यांनी मला धमकावले आणि माझ्याशी गैरवर्तन केले. माझे इतर सहकारी जेव्हा माझ्या बचावासाठी आले तेव्हा ते मला मारहाण करणार होते. यापूर्वी गुरुवारी जोरदार गदारोळ झाला आणि तणावाची परिस्थिती झाली होती. यानंतर मार्शल मध्ये पडले होते. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव राज्यसभेत त्यांचे निवेदन वाचत असताना तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शांतनु सेन यांनी त्यांच्या हातातून पेपर हिसकावून तो फाडला.
राज्यसभेतील कामकाजादरम्यान तृणमूलच्या सेन यांनी कागद फाडून त्याचे तुकडे हवेत भिरकावले. माहिती तंत्रज्ञान व दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव पेगासस सॉफ्टवेअरद्वारे भारतीयांची हेरगिरी केल्याच्या वृत्तांवर आणि या प्रकरणात विरोधकांच्या आरोपांवर सभागृहात निवेदन देत असताना ही घटना घडली.
दोनदा तहकूब झाल्यानंतर दुपारी अडीच वाजता सदनाचे कामकाज सुरू होताच उपाध्यक्ष हरिवंश यांनी निवेदन करण्यासाठी वैष्णव यांचे नाव पुकारले. त्याच वेळी तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य आणि काही विरोधी पक्षांचे सदस्य जवळ आले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि बहुधा मंत्र्यांच्या वक्तव्याची प्रत फाडली आणि हवेत फेकली.
कोलाहल आणि गोंधळामुळे केंद्रीय मंत्री वैष्णव त्यांचे निवेदन पूर्णपणे वाचू शकले नाहीत. म्हणून त्यांनी ते सदनाच्या पटलावर ठेवले. उपसभापती हरिवंश यांनी गोंधळ करणाऱ्या सदस्यांना अराजकीय वर्तन न करण्याची विनंती केली, परंतु त्यांचे म्हणणे कुणी ऐकले नाही, तेव्हा त्यांनी सदनाची कार्यवाही दिवसासाठी तहकूब केली.
यापूर्वीही विरोधी पक्षांनी विविध विषयांवर सदनात गोंधळ निर्माण केला होता. यामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले होते. आंदोलक विरोधी सदस्यांनी पेगॅसस हेरगिरी वादासह इतर काही मुद्द्यांवर सभागृहात घोषणाबाजी केली.
tmc mp santanu sen alleges union minister hardeep singh threatened hims in rajya sabha
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App