वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तिरंग्याची मोठी ताकद दिसून आली आहे. कारण या तिरंग्याने शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांचे प्राण वाचविले आहेत. The strength of the tricolor was seen on the battlefield; Russian and Ukrainian troops helped indian students
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. मायदेशी परतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी तिरंग्याने त्यांना कसे सुरक्षित ठेवले हे सांगितले. युक्रेन आणि रशियन सैनिकांनी तिरंगा पाहून त्यांना मदत केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. युक्रेन आणि रशियाचे सैनिक वाहनावर लावलेला तिरंगा पाहून गोळीबार थांबवत आणि वाहनांना मार्गदर्शन करत असल्याचे चित्र युद्धभूमीवर होते. केवळ तिरंग्यामुळेच सुखरूप परत येऊ शकल्याचेही भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये युक्रेनियन आणि रशियन सैनिक तिरंगा लावलेले वाहन पाहून गोळीबार थांबवत आहेत. एवढेच नाही तर भारतीय विद्यार्थ्यांनाही रस्ता दाखवला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App